शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शेतक-यांच्या प्रक्षोभाकडे दुर्लक्ष नको!

By रवी ताले | Updated: January 2, 2018 00:15 IST

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यक्रमास अनुपस्थित डॉक्टरांना नक्षलवादी होण्याचा सल्ला दिला अन् पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी संतप्त शेतक-यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यक्रमास अनुपस्थित डॉक्टरांना नक्षलवादी होण्याचा सल्ला दिला अन् पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी संतप्त शेतक-यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.अहीर यांचे वक्तव्य आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. अहीर त्यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या डॉक्टरांवर चिडले होते. संतापाच्या भरात, तुम्ही नक्षलवादी व्हा, म्हणजे आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, असे बोलून ते मोकळे झाले. डॉक्टर मंडळी अहीर यांचा सल्ला नक्कीच मनावर घेणार नाही; पण बुलडाणा जिल्ह्यातील दोन घटना बघता, आदिवासींनंतर शेतकरीही नक्षलवादाच्या मार्गावर निघतात की काय, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही.ऐन रब्बी हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. त्यामुळे चिडलेल्या शेतक-यांनी चिखली तालुक्यात आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात, तर मलकापूर तालुक्यात मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.सत्ताधारी या प्रकारांना राजकीय ‘स्टंट’ अथवा शेतकºयांचा स्थानिक प्रक्षोभ संबोधून, त्याकडे दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेतील; मात्र नक्षलवादाचा प्रारंभ शेतकºयांच्या प्रक्षोभातूनच झाला होता, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नक्षलवादी चळवळ आता प्रामुख्याने घनदाट जंगलांमधील आदिवासींपुरती मर्यादित झाली असली, तरी तिचा प्रारंभ अन्यायाच्या विरोधातील शेतकºयांच्या प्रक्षोभातूनच झाला होता.आज पुन्हा एकदा महाराष्ट्र व गुजरातसारख्या तुलनात्मकरीत्या पुढारलेल्या राज्यांमधील शेतकरीही अन्यायाविरुद्ध पेटून उठताना दिसत आहेत आणि त्यातूनच मग कधी तरी बुलडाणा जिल्ह्यात घडल्या तशा जाळपोळीसारख्या घटना घडतात. सध्या तरी या घटना तुरळक स्वरूपाच्या आहेत; मात्र शेतकरी वर्गात ज्या गतीने असंतोष वाढत आहे, तो बघता अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होण्याची आणि पुढे त्यातूनच एखादे हिंसक आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडण्याच्या महावितरणच्या धोरणाच्या विरोधात असंतोष वाढू लागला आहे. शेतकरी संघटनांनी त्या विरोधात आवाज बुलंद करण्यास प्रारंभ केला आहे. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखालील किसान सभेने तर ‘पॉवर स्टेशन’ ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. हल्ली शेतकरी संघटनांमध्येही स्पर्धा वाढली आहे. मुद्यांच्या शोधात असलेल्या राजकीय पक्षांनाही शेतकरी वर्ग नेहमीच खुणावत असतो. या स्पर्धेतून उद्या एकमेकांवर मात करण्याच्या इर्षेपोटी आंदोलनांचे अधिकाधिक जहाल मार्ग शोधल्या जाण्याचा धोका नाकारता येत नाही. अशा वेळी आंदोलन नेतृत्वाच्या हातून केव्हा निसटेल आणि उग्र स्वरूप धारण करेल, हे सांगता येत नाही. सत्ताधाºयांनी या घटनाक्रमाची वेळीच योग्य ती दखल घेतली नाही, तर पश्चात्तापाची पाळी येऊ शकते. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र