शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या प्रक्षोभाकडे दुर्लक्ष नको!

By रवी ताले | Updated: January 2, 2018 00:15 IST

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यक्रमास अनुपस्थित डॉक्टरांना नक्षलवादी होण्याचा सल्ला दिला अन् पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी संतप्त शेतक-यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यक्रमास अनुपस्थित डॉक्टरांना नक्षलवादी होण्याचा सल्ला दिला अन् पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी संतप्त शेतक-यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.अहीर यांचे वक्तव्य आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. अहीर त्यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या डॉक्टरांवर चिडले होते. संतापाच्या भरात, तुम्ही नक्षलवादी व्हा, म्हणजे आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, असे बोलून ते मोकळे झाले. डॉक्टर मंडळी अहीर यांचा सल्ला नक्कीच मनावर घेणार नाही; पण बुलडाणा जिल्ह्यातील दोन घटना बघता, आदिवासींनंतर शेतकरीही नक्षलवादाच्या मार्गावर निघतात की काय, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही.ऐन रब्बी हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. त्यामुळे चिडलेल्या शेतक-यांनी चिखली तालुक्यात आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात, तर मलकापूर तालुक्यात मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.सत्ताधारी या प्रकारांना राजकीय ‘स्टंट’ अथवा शेतकºयांचा स्थानिक प्रक्षोभ संबोधून, त्याकडे दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेतील; मात्र नक्षलवादाचा प्रारंभ शेतकºयांच्या प्रक्षोभातूनच झाला होता, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नक्षलवादी चळवळ आता प्रामुख्याने घनदाट जंगलांमधील आदिवासींपुरती मर्यादित झाली असली, तरी तिचा प्रारंभ अन्यायाच्या विरोधातील शेतकºयांच्या प्रक्षोभातूनच झाला होता.आज पुन्हा एकदा महाराष्ट्र व गुजरातसारख्या तुलनात्मकरीत्या पुढारलेल्या राज्यांमधील शेतकरीही अन्यायाविरुद्ध पेटून उठताना दिसत आहेत आणि त्यातूनच मग कधी तरी बुलडाणा जिल्ह्यात घडल्या तशा जाळपोळीसारख्या घटना घडतात. सध्या तरी या घटना तुरळक स्वरूपाच्या आहेत; मात्र शेतकरी वर्गात ज्या गतीने असंतोष वाढत आहे, तो बघता अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होण्याची आणि पुढे त्यातूनच एखादे हिंसक आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडण्याच्या महावितरणच्या धोरणाच्या विरोधात असंतोष वाढू लागला आहे. शेतकरी संघटनांनी त्या विरोधात आवाज बुलंद करण्यास प्रारंभ केला आहे. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखालील किसान सभेने तर ‘पॉवर स्टेशन’ ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. हल्ली शेतकरी संघटनांमध्येही स्पर्धा वाढली आहे. मुद्यांच्या शोधात असलेल्या राजकीय पक्षांनाही शेतकरी वर्ग नेहमीच खुणावत असतो. या स्पर्धेतून उद्या एकमेकांवर मात करण्याच्या इर्षेपोटी आंदोलनांचे अधिकाधिक जहाल मार्ग शोधल्या जाण्याचा धोका नाकारता येत नाही. अशा वेळी आंदोलन नेतृत्वाच्या हातून केव्हा निसटेल आणि उग्र स्वरूप धारण करेल, हे सांगता येत नाही. सत्ताधाºयांनी या घटनाक्रमाची वेळीच योग्य ती दखल घेतली नाही, तर पश्चात्तापाची पाळी येऊ शकते. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र