शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी अंक : वैचारिक आनंदसोहळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:12 IST

दिवाळी अंक हा आनंदसोहळा आहे. त्यात अनेक स्थित्यंतरे झाली तरी त्याचे महत्त्व कायम आहे. दिवाळी अंक ही अभिमानानं मिरवावी अशी मराठी परंपरा. मराठी भाषेतील सांस्कृतिक सोहळाच. मराठी भाषेने साहित्याच्या प्रांतात ही परंपरा थोडीथोडकी नव्हे गेली १०८ वर्षे निष्ठेने जतन करून ठेवली आहे.

दिवाळी अंक ही अभिमानानं मिरवावी अशी मराठी परंपरा. मराठी भाषेतील सांस्कृतिक सोहळाच. मराठी भाषेने साहित्याच्या प्रांतात ही परंपरा थोडीथोडकी नव्हे गेली १०८ वर्षे निष्ठेने जतन करून ठेवली आहे.का.र. मित्र यांनी त्यांच्या ‘मासिक मनोरंजन’चा एक विशेषांक १९०९च्या दिवाळीत प्रसिद्ध केला होता. बंगालच्या ‘बोईमेला’ या दुर्गापूजेच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेला एक बंगाली भाषेतील पूजा विशेषांक मित्र यांच्या बघण्यात आला. तो बघून महाराष्ट्रातील मोठा सण दिवाळी, तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने आपणही विशेषांक तयार करावा, अशी प्रेरणा घेऊन त्यांनी एक अंक प्रसिद्ध केला व त्याचे नामकरण ‘दिवाळी अंक’ असे केले. हाच मराठीतील पहिला दिवाळी अंक मानला जातो. आज या परंपरेला गौरवशाली असे रूप प्राप्त झाले आहे.भाषाव्यवहार जेवढा समृद्ध, तेवढी संस्कृती समृद्ध. दिवाळी अंकांच्या निमित्ताने हे साहित्यिक, सांस्कृतिक रूप समोर येतं. दिवाळी अंक हे वर्षभरातल्या उत्तम साहित्याचं शिखर मानलं जातं. प्रारंभीच्या काळात दिवाळी अंक वाङ्मयीन स्वरूपाचे होते. साहित्यप्रेमींचे सात्त्विक मनोरंजन करणे ही त्याची भूमिका होती.कालांतराने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आरोग्य, धार्मिक, पाककला, सौंदर्य, क्रीडा, चित्रपट, विनोद, साहस, बालसाहित्य इत्यादी अनेक विषय दिवाळी अंकांच्या कक्षेत येत गेले. वाचकांनी या बदलांचे मन:पूर्वक स्वागत केले.वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे दिवाळी अंकांच्या वाटचालीला व्यावसायिक स्थैर्यही मिळाले. दरवर्षी सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. दिवाळी अंकातील साहित्य पूर्वीपेक्षा अधिक समकालीन होऊ लागलं आहे. पूर्वीचे पूर्णत: वाङ्मयीन स्वरूप आता राहिलेले नाही. आता वाचकांना रस आहे तो अस्सल जीवनानुभवाचा.जातीय सलोखा, सामाजिक चळवळीतील अनुभव, साहसी उपक्र्रम, अडचणीतून मार्ग काढीत यशस्वी झालेल्या व्यक्तिमत्त्वांची ओळख, अशा साहित्याला दिवाळी अंकांमध्ये आवर्जून स्थान दिलं जातंय. दिवाळी अंकांचे स्वरूप पूर्वीपेक्षा अधिक व्यापक झाले आहे. बहुआयामी झालेले आहे.वाचकवर्गाच्या आवडीनिवडीत बदल झाला असला तरी चित्र निराशाजनक मुळीच नाही. जीवन अधिक अर्थपूर्ण रीतीनं जगायला मदत करेल, असं साहित्य देण्याचा अनेक दिवाळी अंक आवर्जून प्रयत्न करीत असतात.‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ने तर सातत्याने दर्जेदार, अनोखा मजकूर देताना दोन लाखांहून अधिक वाचक मिळवत विक्रम प्रस्थापित केला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाने दिवाळी अंकांच्या निर्मितीत सुलभीकरण आले. त्यामुळे दर्जेदार व संग्राह्य अशा दिवाळी अंकांना वेगळीच उंची प्राप्त झालेली दिसते.गेल्या १०८ वर्षांत दिवाळी अंकांचा लेटरप्रेस ते ई-दिवाळी हा प्रवास स्तिमित करणारा आहे. दिवाळी अंक हा आनंदसोहळा आहे. एक उत्सव आहे. त्यात अनेक स्थित्यंतरे झाली तरी त्याचे महत्त्व कायम राहणार आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्याला खूप काही दिले, असा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि भविष्यही तेच असणार आहे.- विजय बाविस्कर

टॅग्स :diwaliदिवाळीMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठी