शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शकच हेलकावत आहेत

By admin | Updated: March 31, 2016 03:33 IST

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले

- विजय बाविस्कर

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर...समाजाच्या उन्नयनाची जबाबदारी असणारे शिक्षण-साहित्यासारखे क्षेत्र म्हणजे एक प्रकारचे दिशादर्शकच. समाजाला मार्ग दाखविण्याचे काम या क्षेत्रातून होते. मात्र, या संस्थांचीच दिशा हेलकवायला लागली की एकंदर लोकशाहीचा पायाच थरथरायला लागलाय का, अशी भीती वाटल्याशिवाय राहात नाही.पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण व साहित्यासारखी क्षेत्रे वेगळ्या कारणांनी गाजत आहेत. निवडणुकीच्या पारदर्शक इतिहासावर गटबाजी, वैयक्तिक हेवे-दावे आणि गैरप्रकारांच्या आरोपांनी डाग पडत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक नुकतीच झाली. तत्कालीन कारभारी असणारेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मतभेद हे लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण. त्यामुळे त्यातही गैर नाही. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने उठलेला धुरळा पाहिल्यावर साहित्य क्षेत्रातील राजकारणावर गांभीर्याने विचार करण्याची गरज प्रतीत होते. राज्यातील साहित्यविषयक कार्य करण्यासाठी निर्माण झालेल्या या संस्थेमध्ये साहित्यिक किती हा मुद्दाच अलाहिदा. एखादा किराणा दुकानदारही रसिक वाचक असू शकतो, हे मान्य करूनही एकंदर मतदारयादी साहित्यरसिकांचे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व करते, हे कोणाला पटणे अवघडच जाते. मसापच्या या निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. जणू काही बिहारमधील एखादी निवडणूक लढवली जात आहे, अशा पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कडक शिस्त लावावी लागली. अगदी मतपत्रिकेसोबत ओळखपत्रे जोडण्याची सक्ती करावी लागली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पुण्यात घडलेला हा एक पराक्रमच म्हणायला हवा. एवढी शिस्त लावूनही अनेक आरोप झाले. पुण्याच्या साहित्यिक ओळखीपेक्षा अशी ओळख होणे, भूषणावह नाही. मसापच्या निवडणुकीतील चर्चेची धूळ खाली बसत नाही तोवर शिक्षण प्रसारक मंडळीचा प्रकार पुढे आला आहे. स.प. महाविद्यालयापासून अनेक प्रथितयश शिक्षण संस्था चालविणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळींच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी माजी अध्यक्षांना अटक होते. बोगस मतपत्रिका त्यांच्या कार्यालयात सापडतात, हा प्रकार धक्कादायक आणि क्लेशकारक आहे. अध्यक्षांना अटक करून अनेकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यातून सत्य काय ते उघडकीस येईल. मतदानाची प्रक्रियाही हा लेख सुरू असताना सुरू आहे. मतदार आपापल्या सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून मतदानही करतील. जय-पराजयही त्याप्रमाणे निश्चित होतील. पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, हेच याबाबत म्हणावे लागेल. त्यापेक्षाही लाखो विद्यार्थी ज्या संस्थेतून घडले आणि घडत आहेत. अभिमानाने आपल्या महाविद्यालयाचे नाव सांगतात. त्याच संस्थेची अशा प्रकारची बदनामी त्यांच्यासाठी किती वेदनादायक असेल? मुळात या निमित्ताने सामान्य माणसाला प्रश्न पडतो की या संस्थांमध्ये असे काय आहे की एनकेन प्रकारेण निवडणुका जिंकायच्याच. यासाठी कोणतेही गैरप्रकार करण्यास ही माणसं धजावतात. शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. सामाजिक, राजकीय गदारोळात विचारांचे, विवेकाचे अधिष्ठान देऊन समाजाला परिवर्तनाची वाट दाखविण्याचे काम त्यांनी करावे, ही रास्त अपेक्षा. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर करायचे काय? प्रकाशासाठी कोणाकडे पाहायचे. एका संस्थेपुरते, एका निवडणुकीपुरते हे प्रकार मर्यादित राहात नाहीत. स्वच्छ, पारदर्शक आणि काटेकोर निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीची पहिली अट असते. सामाजिक क्षेत्रात काम करणारे जबाबदार विचार करणारे आणि संयत असावे लागात. ते घडले नाही तर मूल्यांचाच ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. खरी भीती तीच आहे...