शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शकच हेलकावत आहेत

By admin | Updated: March 31, 2016 03:33 IST

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले

- विजय बाविस्कर

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर...समाजाच्या उन्नयनाची जबाबदारी असणारे शिक्षण-साहित्यासारखे क्षेत्र म्हणजे एक प्रकारचे दिशादर्शकच. समाजाला मार्ग दाखविण्याचे काम या क्षेत्रातून होते. मात्र, या संस्थांचीच दिशा हेलकवायला लागली की एकंदर लोकशाहीचा पायाच थरथरायला लागलाय का, अशी भीती वाटल्याशिवाय राहात नाही.पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण व साहित्यासारखी क्षेत्रे वेगळ्या कारणांनी गाजत आहेत. निवडणुकीच्या पारदर्शक इतिहासावर गटबाजी, वैयक्तिक हेवे-दावे आणि गैरप्रकारांच्या आरोपांनी डाग पडत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक नुकतीच झाली. तत्कालीन कारभारी असणारेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मतभेद हे लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण. त्यामुळे त्यातही गैर नाही. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने उठलेला धुरळा पाहिल्यावर साहित्य क्षेत्रातील राजकारणावर गांभीर्याने विचार करण्याची गरज प्रतीत होते. राज्यातील साहित्यविषयक कार्य करण्यासाठी निर्माण झालेल्या या संस्थेमध्ये साहित्यिक किती हा मुद्दाच अलाहिदा. एखादा किराणा दुकानदारही रसिक वाचक असू शकतो, हे मान्य करूनही एकंदर मतदारयादी साहित्यरसिकांचे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व करते, हे कोणाला पटणे अवघडच जाते. मसापच्या या निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. जणू काही बिहारमधील एखादी निवडणूक लढवली जात आहे, अशा पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कडक शिस्त लावावी लागली. अगदी मतपत्रिकेसोबत ओळखपत्रे जोडण्याची सक्ती करावी लागली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पुण्यात घडलेला हा एक पराक्रमच म्हणायला हवा. एवढी शिस्त लावूनही अनेक आरोप झाले. पुण्याच्या साहित्यिक ओळखीपेक्षा अशी ओळख होणे, भूषणावह नाही. मसापच्या निवडणुकीतील चर्चेची धूळ खाली बसत नाही तोवर शिक्षण प्रसारक मंडळीचा प्रकार पुढे आला आहे. स.प. महाविद्यालयापासून अनेक प्रथितयश शिक्षण संस्था चालविणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळींच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी माजी अध्यक्षांना अटक होते. बोगस मतपत्रिका त्यांच्या कार्यालयात सापडतात, हा प्रकार धक्कादायक आणि क्लेशकारक आहे. अध्यक्षांना अटक करून अनेकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यातून सत्य काय ते उघडकीस येईल. मतदानाची प्रक्रियाही हा लेख सुरू असताना सुरू आहे. मतदार आपापल्या सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून मतदानही करतील. जय-पराजयही त्याप्रमाणे निश्चित होतील. पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, हेच याबाबत म्हणावे लागेल. त्यापेक्षाही लाखो विद्यार्थी ज्या संस्थेतून घडले आणि घडत आहेत. अभिमानाने आपल्या महाविद्यालयाचे नाव सांगतात. त्याच संस्थेची अशा प्रकारची बदनामी त्यांच्यासाठी किती वेदनादायक असेल? मुळात या निमित्ताने सामान्य माणसाला प्रश्न पडतो की या संस्थांमध्ये असे काय आहे की एनकेन प्रकारेण निवडणुका जिंकायच्याच. यासाठी कोणतेही गैरप्रकार करण्यास ही माणसं धजावतात. शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. सामाजिक, राजकीय गदारोळात विचारांचे, विवेकाचे अधिष्ठान देऊन समाजाला परिवर्तनाची वाट दाखविण्याचे काम त्यांनी करावे, ही रास्त अपेक्षा. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर करायचे काय? प्रकाशासाठी कोणाकडे पाहायचे. एका संस्थेपुरते, एका निवडणुकीपुरते हे प्रकार मर्यादित राहात नाहीत. स्वच्छ, पारदर्शक आणि काटेकोर निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीची पहिली अट असते. सामाजिक क्षेत्रात काम करणारे जबाबदार विचार करणारे आणि संयत असावे लागात. ते घडले नाही तर मूल्यांचाच ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. खरी भीती तीच आहे...