शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

दिशादर्शकच हेलकावत आहेत

By admin | Updated: March 31, 2016 03:33 IST

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले

- विजय बाविस्कर

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर...समाजाच्या उन्नयनाची जबाबदारी असणारे शिक्षण-साहित्यासारखे क्षेत्र म्हणजे एक प्रकारचे दिशादर्शकच. समाजाला मार्ग दाखविण्याचे काम या क्षेत्रातून होते. मात्र, या संस्थांचीच दिशा हेलकवायला लागली की एकंदर लोकशाहीचा पायाच थरथरायला लागलाय का, अशी भीती वाटल्याशिवाय राहात नाही.पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण व साहित्यासारखी क्षेत्रे वेगळ्या कारणांनी गाजत आहेत. निवडणुकीच्या पारदर्शक इतिहासावर गटबाजी, वैयक्तिक हेवे-दावे आणि गैरप्रकारांच्या आरोपांनी डाग पडत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक नुकतीच झाली. तत्कालीन कारभारी असणारेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मतभेद हे लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण. त्यामुळे त्यातही गैर नाही. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने उठलेला धुरळा पाहिल्यावर साहित्य क्षेत्रातील राजकारणावर गांभीर्याने विचार करण्याची गरज प्रतीत होते. राज्यातील साहित्यविषयक कार्य करण्यासाठी निर्माण झालेल्या या संस्थेमध्ये साहित्यिक किती हा मुद्दाच अलाहिदा. एखादा किराणा दुकानदारही रसिक वाचक असू शकतो, हे मान्य करूनही एकंदर मतदारयादी साहित्यरसिकांचे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व करते, हे कोणाला पटणे अवघडच जाते. मसापच्या या निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. जणू काही बिहारमधील एखादी निवडणूक लढवली जात आहे, अशा पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कडक शिस्त लावावी लागली. अगदी मतपत्रिकेसोबत ओळखपत्रे जोडण्याची सक्ती करावी लागली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पुण्यात घडलेला हा एक पराक्रमच म्हणायला हवा. एवढी शिस्त लावूनही अनेक आरोप झाले. पुण्याच्या साहित्यिक ओळखीपेक्षा अशी ओळख होणे, भूषणावह नाही. मसापच्या निवडणुकीतील चर्चेची धूळ खाली बसत नाही तोवर शिक्षण प्रसारक मंडळीचा प्रकार पुढे आला आहे. स.प. महाविद्यालयापासून अनेक प्रथितयश शिक्षण संस्था चालविणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळींच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी माजी अध्यक्षांना अटक होते. बोगस मतपत्रिका त्यांच्या कार्यालयात सापडतात, हा प्रकार धक्कादायक आणि क्लेशकारक आहे. अध्यक्षांना अटक करून अनेकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यातून सत्य काय ते उघडकीस येईल. मतदानाची प्रक्रियाही हा लेख सुरू असताना सुरू आहे. मतदार आपापल्या सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून मतदानही करतील. जय-पराजयही त्याप्रमाणे निश्चित होतील. पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, हेच याबाबत म्हणावे लागेल. त्यापेक्षाही लाखो विद्यार्थी ज्या संस्थेतून घडले आणि घडत आहेत. अभिमानाने आपल्या महाविद्यालयाचे नाव सांगतात. त्याच संस्थेची अशा प्रकारची बदनामी त्यांच्यासाठी किती वेदनादायक असेल? मुळात या निमित्ताने सामान्य माणसाला प्रश्न पडतो की या संस्थांमध्ये असे काय आहे की एनकेन प्रकारेण निवडणुका जिंकायच्याच. यासाठी कोणतेही गैरप्रकार करण्यास ही माणसं धजावतात. शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. सामाजिक, राजकीय गदारोळात विचारांचे, विवेकाचे अधिष्ठान देऊन समाजाला परिवर्तनाची वाट दाखविण्याचे काम त्यांनी करावे, ही रास्त अपेक्षा. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर करायचे काय? प्रकाशासाठी कोणाकडे पाहायचे. एका संस्थेपुरते, एका निवडणुकीपुरते हे प्रकार मर्यादित राहात नाहीत. स्वच्छ, पारदर्शक आणि काटेकोर निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीची पहिली अट असते. सामाजिक क्षेत्रात काम करणारे जबाबदार विचार करणारे आणि संयत असावे लागात. ते घडले नाही तर मूल्यांचाच ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. खरी भीती तीच आहे...