शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

धर्मवादानं दिली विवेकाला सोडचिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:14 IST

परंपरा म्हणजे काय आणि आधुनिकतेशी त्याची सांगड घालून बदलणाºया जगाशी सुसंगत अशी जीवनपद्धती अंगिकारता येऊ शकते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानं सुरू झालेल्या वादामुळे.

- प्रकाश बाळपरंपरा म्हणजे काय आणि आधुनिकतेशी त्याची सांगड घालून बदलणाºया जगाशी सुसंगत अशी जीवनपद्धती अंगिकारता येऊ शकते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानं सुरू झालेल्या वादामुळे.भारताची राजधानी दिल्ली हे केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांपैकी एक आहे. हिवाळ्यात या प्रदूषणाचं प्रमाण इतकं वाढतं की, दिल्ली ही एक ‘गॅस चेंबर’च बनते. श्वसनाच्या व फुफ्फुसाच्या रोगाचं दिल्लीतील प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्यापासून ते दिल्ली शेजारच्या हरियाणा व पंजाबात शेताची मशागत करण्यानं निर्माण होणारे धुराचे प्रचंड लोट राजधानीपर्यंत पोचू नयेत, यासाठी उपाययोजना करण्यापर्यंत पावलं गेली काही वर्षे टाकली जात आहेत. फटाक्यांच्या विक्रीवर बंदी हा त्यापैकीच एक उपाय आहे. फटाक्यांच्या विक्रीला बंदी घालावी अशी मागणी सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली नाही. कोणत्याही राजकीय पक्षांनीही अशी मागणी केलेली नाही किंबहुना एकही राजकीय पक्ष प्रदूषण व फटाके या प्रश्नाबाबत उघड बोलायला तयार नाही. प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेत काम करणाºया स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिला आहे.हा आदेश आल्यापासून तो ‘हिंदूविरोधी’ आहे, असा टीकेचा धुरळा उडवून देण्यात आला आहे. ‘पांचजन्य’ या संघाच्या नियतकालिकाचे माजी संपादक व राज्यसभेचे खासदार तरुण विजय यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये लिहिलेल्या लेखात ‘किताबी धर्मां’च्या चष्म्यातून हिंदू जीवनपद्धतीकडं बघण्याची जी प्रथा भारतात ख्रिश्चन मिशनरी आल्यापासून पडली आहे, तिचाच परिपाक म्हणजे हा फटाक्यावरील बंदीचा आदेश, असा अन्वयार्थही लावला आहे. साहजिकच ‘आमच्या या आदेशाला जातीय-धार्मिक रंग देण्यात येत असल्याबद्दल खंत वाटते’, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला नोंदवणं भाग पडलं आहे.येथेच नेमका परंपरा व आधुनिकता यांची सांगड कशी घालायची, हा प्रश्न निर्माण होतो. समाजात ज्या चालीरीती असतात, त्या तत्कालीन काळाच्या संदर्भात प्रचलित झालेल्या असतात. काळ बदलत असतो. समाज नव्या गोष्टी आत्मसात करीत असतो. हीच तर प्रगती असते. मानवी इतिहासाकडं नुसती एक ओझरती जरी नजर टाकली, तरी हेच निदर्शनास येईल. माणसाचा सर्व प्रयत्न हा आपलं आयुष्य सुखी-समाधानी कसं बनेल, या दृष्टीनेच असतो. जर आयुष्य निरोगी असेल, तरच हे सुख-समाधान शक्य आहे. पूर्वीच्या तुलनेत आज आयुष्यमान वाढलं आहे, ते वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळंच. यापुढं भारतासारख्या खंडप्राय देशाला तोंड द्यावं लागणार आहे, ते ‘सर्वांसाठी आरोग्य’ या संकल्पनेला.केवळ वैद्यकीयच नव्हे, तर इतर क्षेत्रातही माणसानं आपल्या प्रतिभेच्या व विद्येच्या जोरावर ही जी प्रगती केली आहे, त्याचे काही तोटेही झालेले आहेत. ‘प्रदूषण’ हवेचे, पाण्याचे, इतर सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचे, हा त्यातील सर्वात मोठा तोटा आहे. हवामान बदलाचे जे आव्हान जगापुढं उभं आहे, त्यानं विविध क्षेत्रातील प्रगतीनं निर्माण केलेल्या सुखी-समाधानी आयुष्य जगण्याच्या संधीही हिरावल्या जाण्याची शक्यता दिसू लागली आहे.हे आव्हान इतकं जबरदस्त आहे की, जगातील सर्व देश एकत्र येऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी झटत आहेत. अशा परिस्थितीत फटाक्यावरील बंदी हा ‘हिंदू धर्मावरील घाला’ ही टीका कशी काय केली जाऊ शकते?तसं बघायला गेलं तर दिवाळी हा ‘दिव्यांचा सण’ आहे. फटाके उडवून धूर निर्माण करणं व आवाजानं आसमंत दणाणून सोडणं, हे या सणात अभिप्रेतच नाही. तरीही गेल्या दोन अडीच दशकांत जास्तीत जास्त आवाजाचे आणि अधिकाधिक धूर निर्माण करणारे फटाके बाजारात येत गेले आहेत. ‘व्यापार’ हा यातील सर्वात मोठा घटक आहे. ‘फटाके उडवणं’ ही सणांतील ‘परंपरा’ बनवली गेली आहे, ती निव्वळ व्यापारीकरणामुळंच. फटाक्यांची दारू प्रथम बनवली, ती चिनी लोकांनी आणि चिनी हे अव्वल दर्जाचे व्यापारी असल्यानं त्यांनी ती जगभर नेली तशी ती भारतातही आली आणि ती मग आपली ‘परंपरा’ बनली. मात्र ही ‘परंपरा’ पाळताना आपण आपले आयुष्य धोक्यात घालत आहोत, याची जाणीव ठेवणे, हे आपल्या हिताचे आहे की नाही? शेवटी आपण निरोगी आयुष्य जगलो, तरच सुखं-समाधानानं जगू व ‘परंपरा’ पाळू शकू ना? जर आजारानं जर्जर होऊन अंथरुणाला खिळून बसलो, तर सुखं-समाधानाची राखरांगोळी होईलच, शिवाय ‘परंपरा’ पाळण्याएवढं त्राणही आपल्या अंगात उरणार नाहीत.म्हणूनच सध्याच्या आधुनिकोत्तर जगात वावरताना ‘परंपरांचा’ आशय जपतानाच त्यांच्या इतर अंगांना मुरड घालून आधुनिकतेची कास धरणं, हेच प्रगत व प्रगल्भ माणुसकीचं लक्षण आहे.दुर्दैवानं आपल्या देशातील चर्चाविश्व आता इतकं धर्मवादानं कलुषित करून टाकण्यात आलं आहे की, स्वहित काय हे समजून घेण्याचाही ‘विवेक’ आता कालबाह्य ठरू लागला आहे.

टॅग्स :diwaliदिवाळीfire crackerफटाकेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय