शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

भाष्य - जन्मदात्यांची निष्ठूरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:17 AM

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच.

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच. अशा खडतर प्रसंगातून सहीसलामत मार्ग काढणे म्हणजेच जीवनाच्या कसोटीला उतरणे होय. जन्मदाते इतके निष्ठूर होण्याची आणि टोकाचे पाऊल उचलण्याची ही घटना तशी पहिल्यांदाच घडली असे नव्हे. कल्याण येथील घटनेच्या तीन दिवस आधी नगर जिल्ह्यातील पोखरी बाळेश्वरच्या सोंडवस्तीत पत्नी माहेरी गेलेली असताना चिमुकला मुलगा व मुलीचा गळा आवळून अशोक फटांगरे नामक पित्याने खून केला व स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी २०१६ साली यवतमाळमध्ये कौटुंबिक कलहातून तीन मुलांसह पित्याने आत्महत्या तर एप्रिल २०१७ मध्ये नाशिकरोड येथेही याच कारणाने दोन मुलांचा गळा आवळून सुनील बेलदार या पित्याने स्वत:ला जाळून आत्महत्या केली होती. अशा प्रकारात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. कर्ज आणि कलह या गोष्टी ‘घरोघरी मातीच्या चुली’ याप्रमाणे प्रत्येक घरी आहेत, म्हणून काय प्रत्येक जण इतक्या टोकाची भूमिका घेत नसतो. एकीकडे मूलबाळ होत नसलेले दाम्पत्य वंध्यत्व निवारणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती असताना, दुसरीकडे आपल्या सोन्यासारख्या मुलांचा निष्ठूरपणे गळा आवळून, जाळून आणि भोजनात विष कालवून त्यांचा जीव घेतला जातो, यास काय म्हणावे? माता-पिता मग ते कोणतेही असोत, त्यांना केवळ जन्म देण्याचा अधिकार असतो, जीव घेण्याचा नव्हे. त्यांच्या बिकट परिस्थितीची, कर्जाची आणि कलहाची शिक्षा त्या निष्पाप कळ्यांच्या माथी मारणे हे केवळ निष्ठूरतेचेच नव्हे, तर विकृत मनोवृत्तीचे लक्षण मानायला हवे. मानवी जन्म मिळणे हे इतर जीवसृष्टीमध्ये भाग्याचे मानले जाते. त्यामुळे त्या चिमुकल्यांना जीवनाचा आनंद उपभोगण्याचा, आयुष्य म्हणजे नेमके काय असते, हे अनुभवण्याचा पूर्ण अधिकार असतो. जीवनाचा अर्थ उमगण्याच्या आतच त्यांना मृत्यू नावाच्या काळोखी खोल दरीत कायमचे लोटले जाणे आणि तेही जन्मदात्यांच्या हाताने, यासारखा दैवदुर्विलास दुसरा कोणता असूच शकत नाही. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा