शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

प्रणव मुखर्जींच्या मुत्सद्दी आणि प्रगल्भ कारकिर्दीचा अस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 05:08 IST

२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात संयुक्त आघाडीच्या सरकारच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर मुखर्जी सतत दुसऱ्या स्थानावर राहिले. कॉंग्रेसचे सर्वात मुत्सद्दी आणि मुरब्बी नेते म्हणून एकाच वेळी आठ-दहा वादग्रस्त समित्यांचे ते प्रमुख असत व त्यातून योग्य राजकीय तोडगा काढत.

- डॉ. भालचंद्र मुणगेकर(माजी खासदार)प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारताच्या गेल्या साठ वर्षांतील यशस्वी, मुत्सद्दी आणि प्रगल्भ जीवनाची अखेर झाली आहे. १९६९ मध्ये बंगलोरच्या अधिवेशनात कॉँग्रेसमध्ये उभी फूट घडवून आणल्यानंतर इंदिरा गांधी यांनी, प्रणव मुखर्जी यांची राजकीय गुणवत्ता ओळखून त्यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर प्रथम राज्यसभेत निवडून आणले आणि त्याच वर्षी त्यांना शिपिंग, परिवहन व अर्थ खात्याचे उपमंत्री केले. त्यानंतर ते चार वेळा, म्हणजे एकूण पाच वेळा राज्यसभेवर निवडून गेले. २००४ व २००९ मध्ये ते दोनदा लोकसभेवर निवडून गेले.२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात संयुक्त आघाडीच्या सरकारच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर मुखर्जी सतत दुसऱ्या स्थानावर राहिले. कॉंग्रेसचे सर्वात मुत्सद्दी आणि मुरब्बी नेते म्हणून एकाच वेळी आठ-दहा वादग्रस्त समित्यांचे ते प्रमुख असत व त्यातून योग्य राजकीय तोडगा काढत.मी जुलै २००४ मध्ये योजना आयोगाचा सभासद झालो. आयोगाच्या दोन प्रकारच्या बैठका होत. एक, फक्त आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्यांची; व दुसरी, पूर्ण योजना आयोगाची. परंपरेनुसार पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्यासोबत योजना आयोगाचे सभासद असलेले जेष्ठ मंत्री उपस्थित असत. आमच्या काळात प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग, शरद पवार, पी. चिदंबरम , लालू प्रसाद यादव, इ. ज्येष्ठ मंत्री होते. अशाच एका बैठकीत त्यांचा व माझा व्यक्तिगत परिचय झाला आणि तीसुद्धा वित्तीय तूट कमी ठेवण्याच्या त्यांच्या आग्रहाच्या विरोधी मत मी मांडल्यानंतर. २२ मार्च, २०१० रोजी तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभात् पाटील यांनी माझी राज्यसभेवर नियुक्ती केली. ४ मे २०१० रोजी माझे राज्यसभेत पहिले भाषण झाले. आर्थिक विकासाच्या वेगाबरोबरच विकासाचे फायदे गरीबांपर्यंत पोचवण्यात भारत अयशस्वी ठरत आहे, असा माझा मुख्य रोख होता. त्यादिवशी राज्यसभेत वित्तीय बिलावरील चर्चेला उत्तर देताना श्री मुखर्जी म्हणाले, ‘मी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा खास उल्लेख करतो. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती ही नक्कीच राज्यसभेच्या चर्चेची गुणवत्ता आणि पातळी वाढवणारी ठरेल’ - तो माझ्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा क्षण होता. प्रणवदा व माझ्यात काहीशी अधिक जवळीक निर्माण झाली ती, ते राष्ट्रपती झाल्यानंतर. राष्ट्रपती भवनात तीन प्रसंगी आम्ही प्रत्येक वेळी कमीत कमी अर्धा तास चर्चा केली. शेवटची भेट १८ जुलै, २०१७ रोजी झाली. त्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वात शेवटची वेळ दिली. मी त्यांना माझे ‘दि इसेनशील आंबेडकर’ हे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक सप्रेम भेट दिले. त्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले आणि त्यानंतर बरोबर दीड तास अर्थव्यवस्था, राजकारण, जमातवाद, सामाजिक प्रश्न, कॉंग्रेसबाबतची चिंता अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. ‘आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होता का?’, ‘देशातील एका सर्वात मोठ्या उद्योगपतीवर आपली खास मर्जी होती का?’... असे काही अगदी वादग्रस्त व त्यांच्या अडचणीचे प्रश्न मी त्यांना विचारले. त्यांनी आपल्या पद्धतीने उत्तरे दिली. त्या चर्चेत माझ्याविषयी त्यांनी दाखवलेला विश्वास व आदर माझ्यासाठी प्रेरणादायी होता.त्यांना माझी विनम्र आदरांजली.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी