शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

प्रणव मुखर्जींच्या मुत्सद्दी आणि प्रगल्भ कारकिर्दीचा अस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 05:08 IST

२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात संयुक्त आघाडीच्या सरकारच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर मुखर्जी सतत दुसऱ्या स्थानावर राहिले. कॉंग्रेसचे सर्वात मुत्सद्दी आणि मुरब्बी नेते म्हणून एकाच वेळी आठ-दहा वादग्रस्त समित्यांचे ते प्रमुख असत व त्यातून योग्य राजकीय तोडगा काढत.

- डॉ. भालचंद्र मुणगेकर(माजी खासदार)प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारताच्या गेल्या साठ वर्षांतील यशस्वी, मुत्सद्दी आणि प्रगल्भ जीवनाची अखेर झाली आहे. १९६९ मध्ये बंगलोरच्या अधिवेशनात कॉँग्रेसमध्ये उभी फूट घडवून आणल्यानंतर इंदिरा गांधी यांनी, प्रणव मुखर्जी यांची राजकीय गुणवत्ता ओळखून त्यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर प्रथम राज्यसभेत निवडून आणले आणि त्याच वर्षी त्यांना शिपिंग, परिवहन व अर्थ खात्याचे उपमंत्री केले. त्यानंतर ते चार वेळा, म्हणजे एकूण पाच वेळा राज्यसभेवर निवडून गेले. २००४ व २००९ मध्ये ते दोनदा लोकसभेवर निवडून गेले.२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात संयुक्त आघाडीच्या सरकारच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर मुखर्जी सतत दुसऱ्या स्थानावर राहिले. कॉंग्रेसचे सर्वात मुत्सद्दी आणि मुरब्बी नेते म्हणून एकाच वेळी आठ-दहा वादग्रस्त समित्यांचे ते प्रमुख असत व त्यातून योग्य राजकीय तोडगा काढत.मी जुलै २००४ मध्ये योजना आयोगाचा सभासद झालो. आयोगाच्या दोन प्रकारच्या बैठका होत. एक, फक्त आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्यांची; व दुसरी, पूर्ण योजना आयोगाची. परंपरेनुसार पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्यासोबत योजना आयोगाचे सभासद असलेले जेष्ठ मंत्री उपस्थित असत. आमच्या काळात प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग, शरद पवार, पी. चिदंबरम , लालू प्रसाद यादव, इ. ज्येष्ठ मंत्री होते. अशाच एका बैठकीत त्यांचा व माझा व्यक्तिगत परिचय झाला आणि तीसुद्धा वित्तीय तूट कमी ठेवण्याच्या त्यांच्या आग्रहाच्या विरोधी मत मी मांडल्यानंतर. २२ मार्च, २०१० रोजी तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभात् पाटील यांनी माझी राज्यसभेवर नियुक्ती केली. ४ मे २०१० रोजी माझे राज्यसभेत पहिले भाषण झाले. आर्थिक विकासाच्या वेगाबरोबरच विकासाचे फायदे गरीबांपर्यंत पोचवण्यात भारत अयशस्वी ठरत आहे, असा माझा मुख्य रोख होता. त्यादिवशी राज्यसभेत वित्तीय बिलावरील चर्चेला उत्तर देताना श्री मुखर्जी म्हणाले, ‘मी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा खास उल्लेख करतो. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती ही नक्कीच राज्यसभेच्या चर्चेची गुणवत्ता आणि पातळी वाढवणारी ठरेल’ - तो माझ्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा क्षण होता. प्रणवदा व माझ्यात काहीशी अधिक जवळीक निर्माण झाली ती, ते राष्ट्रपती झाल्यानंतर. राष्ट्रपती भवनात तीन प्रसंगी आम्ही प्रत्येक वेळी कमीत कमी अर्धा तास चर्चा केली. शेवटची भेट १८ जुलै, २०१७ रोजी झाली. त्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वात शेवटची वेळ दिली. मी त्यांना माझे ‘दि इसेनशील आंबेडकर’ हे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक सप्रेम भेट दिले. त्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले आणि त्यानंतर बरोबर दीड तास अर्थव्यवस्था, राजकारण, जमातवाद, सामाजिक प्रश्न, कॉंग्रेसबाबतची चिंता अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. ‘आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होता का?’, ‘देशातील एका सर्वात मोठ्या उद्योगपतीवर आपली खास मर्जी होती का?’... असे काही अगदी वादग्रस्त व त्यांच्या अडचणीचे प्रश्न मी त्यांना विचारले. त्यांनी आपल्या पद्धतीने उत्तरे दिली. त्या चर्चेत माझ्याविषयी त्यांनी दाखवलेला विश्वास व आदर माझ्यासाठी प्रेरणादायी होता.त्यांना माझी विनम्र आदरांजली.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी