शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

सेन्सेक्ससारखाच कर्जमाफीचा आकडा अधूनमधून होतो कमी-जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 2:00 AM

‘कर्जासाठी आत्महत्या’, ‘मोदी सरकार’ असा मजकूर सागाच्या पानावर लिहित टिटवी (घाटंजी) येथील प्रकाश मानगावकर या तरुण शेतक-याने परवा आत्महत्या केली. आत्मसन्मान दुखावलेल्या प्रकाशच्या आत्महत्येनंतर सरकारच्या डोळ्यात ‘प्रकाश’ पडला की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही.

‘कर्जासाठी आत्महत्या’, ‘मोदी सरकार’ असा मजकूर सागाच्या पानावर लिहित टिटवी (घाटंजी) येथील प्रकाश मानगावकर या तरुण शेतक-याने परवा आत्महत्या केली. आत्मसन्मान दुखावलेल्या प्रकाशच्या आत्महत्येनंतर सरकारच्या डोळ्यात ‘प्रकाश’ पडला की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही. कारण सरकार सध्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’च्या आकडेमोडीत गर्क आहे. कर्जमाफीचा नेमका आकडा किती हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही. सेन्सेक्सचा आकडा जसा कमी जास्त होतो तसा कर्जमाफीचा आकडा अधूनमधून कमी जास्त होत असतो. तो अद्यापही स्थिरावलेला नाही. तो वाढवायचा असेल तरी उत्तर प्रदेशातील ‘योगी’फॉर्म्युला महाराष्ट्रातही अमलात आणावा लागेल. तिथे दोन ते दहा रुपये कर्जमाफीचे सर्टिफिकेट मिळविणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. हे वास्तव कानावर पडताच शेतकरी आणि जनसामान्यांच्या मुखातून ‘श्री’ हरी... ऐवढेच बाहेर पडले.मात्र कालपरवापर्यंत सरकारसाठी कायद्याची भाषा बोलणारे राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रक्ताक्षरी’ अभियानाच्या समारोप्रसंगी सरकारला शिव्या हासडल्या. शेतात रक्त आटवणाºया शेतकºयांसाठी अणे यांचे ‘ब्लडप्रेशर वाढले. त्यांनी सरकारची लायकी काढली. ‘अच्छे दिन’ आणायला पैसे लागतात. राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी ६० टक्के पैसा पगारावर व कर्ज फेडण्यासाठी जातो. उरलेले ४० टक्के जीएसटीमुळे केंद्राने नेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला केंद्राकडे भीक मागावी लागतेय, अशी सेडेतोड टीका अणे यांनी फडणवीस सरकारवर केली. अणे यांचे भाषण ऐकल्यावर विदर्भवादी भाजप नेत्यांनी ‘श्री’ हरी... म्हणत निश्चितच दीर्घ श्वास सोडला असेल. मात्र सध्या कोणत्याही निवडणुका नसल्याने स्वतंत्र विदर्भाचा ढोल वाजविणारे विदर्भवादी भाजप नेते विकासाच्या मार्गात व्यस्त आहेत. इकडे अडगळीत पडल्यासारखे वाटत असल्याने विदर्भातील निवडक काँग्रेस नेत्यांनी ‘चाय पे चर्चा’ करीत विदर्भ प्रदेश काँग्रेसचा फटाका फोडत कॉँग्रेस हायकमांडचे लक्ष वेधले आहे. विदर्भाचे नाव पुढे करीत त्यांनी प्रदेश काँग्रेसला टार्गेट केले आहे. सत्तेत कॉँग्रेस असो वा भाजप, विदर्भात केवळ मतांचे राजकारण झाले, हे येथील मतदारही जाणतो. मात्र तो सध्या महागाईने त्रस्त आहे. पेट्रोल-डिझेलच्या भडक्याने सामान्यांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढले आहे. डाळीची डोकेदुखी पुन्हा सुरू झाली आहे. अजून दसरा-दिवाळी बाकी आहे. विकासपर्वात कधी काय होईल याचा नेम नाही. मात्र शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत तर बाजार बेभाव असल्याने सामान्य माणून ‘श्री’ हरी... म्हणत गप्प आहे. या साºयात सरकार मात्र पं.दीनदयाल आयुष मधुमेह जागृती अभियानात व्यस्त आहे.