शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

नाचक्की झालीच!

By admin | Updated: December 18, 2015 03:02 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या वतीने कपिल सिब्बल यांच्यासारखा तगडा वकील देऊनही आणि खुद्द सिब्बल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या वतीने कपिल सिब्बल यांच्यासारखा तगडा वकील देऊनही आणि खुद्द सिब्बल यांनी न्यायालयाला कळकळीची विनंती करुनही अखिलेश सरकारची नाचक्की अखेर टळू शकली नाही. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील रिक्त झालेले लोकआयु्क्त पद तत्काळ भरावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्या सरकारला एकदा नव्हे तीन वेळा अंतिम मुदत दिली होती. पण या मुदतीत सरकार निर्णय करु शकले नाही. त्यामुळे अखेर राज्यघटनेने बहाल केलेल्या विशेषाधिकाराचा वापर करुन सर्वोच्च न्यायालयानेच अलाहाबाद उच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्या. विरेन्द्र सिंह यांची नवे लोकआयुक्त म्हणून नियुक्ती जाहीरही करुन टाकली. गेल्या तब्बल अठरा महिन्यांपासून नियुक्तीचा घोळ सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित होता. या काळात तीनदा न्यायालयाने सरकारला अंतिम मुदत दिली होती. तरीही राज्य सरकार निर्णय करु शकले नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्या. रंजन गोगोई आणि एन.व्ही. रमण यांचे खंडपीठ अत्यंत संतप्त झाले. सरकारला आणखी थोडी मुदत मिळावी म्हणून कपिल सिब्बल यांनी केलेली रदबदली तर खंडपीठाने फेटाळलीच पण आपल्या निवाड्यात उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे झाडू नयेत ही त्यांनीच केलेली विनंतीदेखील खंडपीठाने अमान्य केली. लोकआयुक्ताच्या निवडीसाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अशा तिघांची समिती असते आणि कोणत्याही नावावर तिघांचे एकमत होणे अनिवार्य असते. परंतु ते होत नव्हते. बुधवारी अंतिम सुनावणीच्या वेळी सिब्बल यांनी खंडपीठाला पाच नावांची यादी सादर केली पण ती सादर करताना सांगितले की या पाचही नावांवर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता यांच्यात सहमती असली तरी ती नावे मुख्य न्यायाधीशांनी नाकारली आहेत. पण ती नाकारताना त्यांनी आपणहून कोणत्याही नावाची शिफारस मात्र केलेली नाही. याआधी अशीच एक यादी अखिलेश सरकारने राज्यपाल राम नाईक यांना सादर केली असता त्यातील नावांना मुख्य न्यायाधीशांची संमती नसल्याने राज्यपालांनी ती यादी परत केली होती. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता, सर्वोच्च न्यायव्यवस्थेने जरी अखिलेश सरकारला दोषी मानले असले तरी त्या दोषाशी न्यायव्यवस्थेचाही संबंध होताच. पण अखेर नाचक्की अखिलेश सरकारची झाली व ती टाळण्याचे प्रयत्नही विफल ठरले. मध्यंतरी अण्णा हजारे यांनी लोकपाल पदाच्या निर्मितासाठी मोठे आंदोनल उभे केले होते पण त्यातून लोकपाल अवतरलाच नाही. दिल्ली सरकारने तो अवतरावा म्हणून नुकताच एक निर्णय केला पण तोदेखील वादात सापडला असल्याने अशा त्रयस्थ पंचाची वाट किती खडतर असते याचा अदमास येऊ शकतो.