शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:29 IST

जगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव.

- किशोर पाठकजगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव. मग कुठे जुळवायचा हा हिशेब! सख्खा नवरा वा बायको एकमेकांना विचारत नाहीत; आणि नात्यात न बांधलेली व्यक्ती आपल्यावर जीव टाकते हे कोणतं गणित? थोडक्यात नातं रक्तात नसतं, जीव जडवण्यावर असतं. आपण प्रत्येकाच्या कुठल्या गोष्टीवर प्रेम करतो, जीव लावतो. कुणाचा गळा, कुणाचा शस्त्रक्रिया करणारा हात, कुणाचा पळणारा पाय, कुणाचा कुंचला, कुणाच्या हातातील कला, कुणाचा शब्द... आपण म्हणतो ना तो माणूस नाही मला आवडत. पण त्याचं गाणं, कविता, अभिनय, दिग्दर्शन एकाच मुशीतून बाहेर पडलेल्या ६४ कला या सर्वांवर जीव लावता लावता आपला जीव कधी संपतो ते कळत नाही. हा जीव जडण्याचा प्रकार असतो. बघा जीव, जीवन आणि जीव लावणे एकाच शब्दाचे विराट दर्शन. आपण आपला केवढा जीव म्हणतो या एकाच जिवाने जीव लावायचा जिवात जीव असेपर्यंत जीवनात जगायचं, जीवन घडवायचं, जीव नकोसा वा हवासा होईपर्यंत व्यक्तीवर जीव लावायचा आणि शेवटी जिवाला जीव देऊन जीवन संपवायचं. हीच जीवनाची इतिकर्तव्यता. आयुष्याची चाळीस पन्नास वर्षे एकत्र जगून माणसं एकमेकांना कळत नाहीत. म्हातारपणी कळतं की हा माणूस फक्त कामाकरिता, पैशांकरिता वासनेकरिता आपला होता. अशा साठीच्या स्त्री-पुरुषांना सहवासाची निरर्थकता जाणवते तेव्हा उतारवयात एकटेपण अनुभवतांना तो वा ती आठवते. खूप छान वाटतं आठवणींनी वा वाईटही वाटतं. ही व्यक्ती आपल्याजवळ आली होती पण आपला ताठरपणा, संकोच, स्वाभिमान, स्वार्थ, सामाजिक रुढींचं जाळं या सगळ्यांनी हा वा ही लांब गेले. मग पश्चाताप त्यातूनही जळणारा जीव, कोपणारा जीव, दु:ख करणारा जीव, काठोकाठ नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न, विफलता. म्हणून आजच आपला जीव हवेत सोडा. जिवात जीव असेपर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मरताना हे राहून गेलं. ही भावना नको. हवं ते आणि हवं तेच, तसं जगा! गेलेला क्षण पुन्हा येत नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या