शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:29 IST

जगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव.

- किशोर पाठकजगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव. मग कुठे जुळवायचा हा हिशेब! सख्खा नवरा वा बायको एकमेकांना विचारत नाहीत; आणि नात्यात न बांधलेली व्यक्ती आपल्यावर जीव टाकते हे कोणतं गणित? थोडक्यात नातं रक्तात नसतं, जीव जडवण्यावर असतं. आपण प्रत्येकाच्या कुठल्या गोष्टीवर प्रेम करतो, जीव लावतो. कुणाचा गळा, कुणाचा शस्त्रक्रिया करणारा हात, कुणाचा पळणारा पाय, कुणाचा कुंचला, कुणाच्या हातातील कला, कुणाचा शब्द... आपण म्हणतो ना तो माणूस नाही मला आवडत. पण त्याचं गाणं, कविता, अभिनय, दिग्दर्शन एकाच मुशीतून बाहेर पडलेल्या ६४ कला या सर्वांवर जीव लावता लावता आपला जीव कधी संपतो ते कळत नाही. हा जीव जडण्याचा प्रकार असतो. बघा जीव, जीवन आणि जीव लावणे एकाच शब्दाचे विराट दर्शन. आपण आपला केवढा जीव म्हणतो या एकाच जिवाने जीव लावायचा जिवात जीव असेपर्यंत जीवनात जगायचं, जीवन घडवायचं, जीव नकोसा वा हवासा होईपर्यंत व्यक्तीवर जीव लावायचा आणि शेवटी जिवाला जीव देऊन जीवन संपवायचं. हीच जीवनाची इतिकर्तव्यता. आयुष्याची चाळीस पन्नास वर्षे एकत्र जगून माणसं एकमेकांना कळत नाहीत. म्हातारपणी कळतं की हा माणूस फक्त कामाकरिता, पैशांकरिता वासनेकरिता आपला होता. अशा साठीच्या स्त्री-पुरुषांना सहवासाची निरर्थकता जाणवते तेव्हा उतारवयात एकटेपण अनुभवतांना तो वा ती आठवते. खूप छान वाटतं आठवणींनी वा वाईटही वाटतं. ही व्यक्ती आपल्याजवळ आली होती पण आपला ताठरपणा, संकोच, स्वाभिमान, स्वार्थ, सामाजिक रुढींचं जाळं या सगळ्यांनी हा वा ही लांब गेले. मग पश्चाताप त्यातूनही जळणारा जीव, कोपणारा जीव, दु:ख करणारा जीव, काठोकाठ नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न, विफलता. म्हणून आजच आपला जीव हवेत सोडा. जिवात जीव असेपर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मरताना हे राहून गेलं. ही भावना नको. हवं ते आणि हवं तेच, तसं जगा! गेलेला क्षण पुन्हा येत नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या