शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Coronavirus: कोरोनाकाळातील लॉक-अनलॉक बाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 05:36 IST

Coronavirus: कडक लॉकडाऊन करून सर्व व्यवहार बंद ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग पूर्णत: रोखला जातो, हा समजही योग्य नाही. कडक निर्बंधांबरोबरच मुंबई महापालिकेने किंवा पुणे शहरातील प्रशासकीय व्यवस्थेने जे प्रयत्न केले, तो मार्ग अवलंबणेदेखील आवश्यक असते. यासाठी ‘मुंबई मॉडेल’चा गौरव होऊ लागला. ते मॉडेल कायम ठेवले पाहिजे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लागू करण्यात आलेले कडक निर्बंध येत्या १ जूनपासून मागे घेऊन बाजारपेठा सुरू करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केली आहे. बाजारपेठा बंद असल्याने खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे, ही वस्तुस्थिती आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून ज्या वेगाने दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढत होता, तो पाहता कडक निर्बंध लागू करण्यावाचून पर्याय नव्हता. त्याचा परिणाम अनेक मोठ्या शहरांत सकारात्मक झाला. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर आदी शहरांत दुसऱ्या लाटेच्या संसर्गाने धुमाकूळ घातला होता. राज्यातील प्रतिदिन संसर्ग होणाऱ्यांची संख्या साठ हजारांहून अधिक झाली होती. याचा अर्थ कडक लॉकडाऊन करून सर्व व्यवहार बंद ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग पूर्णत: रोखला जातो, हा समजही योग्य नाही. कडक निर्बंधांबरोबरच मुंबई महापालिकेने किंवा पुणे शहरातील प्रशासकीय व्यवस्थेने जे प्रयत्न केले, तो मार्ग अवलंबणेदेखील आवश्यक असते. यासाठी ‘मुंबई मॉडेल’चा गौरव होऊ लागला. ते मॉडेल कायम ठेवले पाहिजे.

पुन्हा तिसरी किंवा चौथी लाट आली, तर मुंबई महापालिकेने जी यंत्रणा उभी केली आहे, त्यानुसार काम करावे लागणार आहे. तशी व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व सत्तावीस महापालिका क्षेत्रात आणि मोठ्या नगरपालिकांच्या शहरात राबविणे आवश्यक आहे. केवळ कडक निर्बंध घालून कोरोनाचा संसर्ग थांबणार नाही. जे रुग्ण उपचारासाठी बाहेर जातात, त्यांच्यावर उपचार करणारी मोठी यंत्रणा बाहेर वावरत असते, पोलीस यंत्रणा काम करीत असते. अशी अत्यावश्यक सेवा चालू असताना त्यांना मदत करणारी यंत्रणाही व्यवहारात असते. ग्रामीण भागात पशू-पक्षी सांभाळणे, शेतीची अत्यावश्यक कामे करावीच लागतात. औषधी, दूध व भाजीपाला पुरवठा करावाच लागतो. सर्व काही शंभर टक्के बंद ठेवता येत नाही. आता ‘मुंबई मॉडेल’चा स्वीकार आपण करायला हवा आणि निर्बंध पाळून व्यवहार सुरू करण्यासाठी थोडी शिथिलता देणे आवश्यक आहे. कारण व्यापार म्हणजे मॉल किंवा मोठे घाऊक व्यापारी वर्गच नव्हे; गावोगावी आणि मोठ्या शहरांतही कॉलनीत छोटा व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना उपजीविकेचे दुसरे साधन नाही. तो घाऊक बाजारपेठेतून माल आणतो आणि अक्राळविक्राळ पसरलेल्या शहरांच्या कॉलन्यांमध्ये छोटी दुकाने चालवितो, तसेच जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणाहून माल खरेदी करून गावात छोटे दुकान थाटलेला मोठा वर्ग आहे. ही सर्व साखळी जोडणारी, छोट्या वाहनांनी वाहतूक करणारी यंत्रणा आहे. त्यात कोणी मोठा किंवा श्रीमंत माणूस नाही.आजही अनेक शहरांत छकडा गाडीने मालाची वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. टेम्पो किंवा छोट्या मालगाडीने वाहतूक करणारे हमाल, मापाडी असा शहरातील असंघटित वर्ग आर्थिक पातळीवर खूपच अडचणीत आला आहे. ही संपूर्ण साखळी सुरू ठेवण्यासाठी जे काही निर्बंध असतील, त्यांची कडक अंमलबजावणी करून व्यवहार सुरू ठेवता येतील का, हे पाहिले पाहिजे. व्यापारी वर्गांच्या असोसिएशन्सनेदेखील सर्व नियमांचे पालन करून व्यवहार करण्याची ग्वाही दिली आहे. त्याचा सरकारने सहानुभूतीने विचार करावा. कारण अलीकडे आर्थिक ताण-तणावातून वैयक्तिक, तसेच संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढते आहे. त्या सर्वांची पार्श्वभूमी असंघटित क्षेत्रातील कामगार, छोटा व्यापारी किंवा वाहतूक व्यवसाय करणारा वर्ग अशी आहे. त्या सर्वांना मदत तरी किती दिली जाणार आहे? त्याचे निकष ठरविणेदेखील कठीण आहे.

राज्य शासनाकडे त्यासाठी आवश्यक निधीसुद्धा नाही.  व्यवहार सुरू ठेवण्याने आर्थिक व्यापार वाढीस लागेल आणि सरकारच्या तिजोरीत पैसादेखील यायला मदत होईल. त्यातून अत्यावश्यक सेवेवर खर्च करता येईल. काही समाजघटकांना आर्थिक मदत दिली गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानांमार्फत मोफत धान्याचेही वितरण सुरू केले आहे. हे सर्व चांगले असले तरी, आता बाधित होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था अधिक विस्तृत करून उभारणी करावी लागेल. कोरोनाशी लढा देताना अर्थव्यवस्थाही चालू दिली पाहिजे. या दोन्हींचा मेळ किंवा समन्वय घातला नाही, तर कोरोना संसर्गाचा जितका परिणाम समाजावर झाला आहे, त्यापेक्षा अधिक परिणाम अर्थव्यवस्था अडचणीत येऊन होईल. अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलिया या देशांनी हाच मार्ग अनुसरून व्यवहार सुरू केले आहेत. भारताने याकडे लक्ष न दिल्याने या देशांनी भारताशी व्यवहार रोखून ठेवले आहेत. हे आपणास फारसे परवडणारे नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस