शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: राज्य व केंद्र सरकारकडून 'असा' कारभार अपेक्षित आहे, घरकोंबडे बनण्याचा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 00:31 IST

नेतृत्वाची अपरिपक्वता, सरकारी यंत्रणांचा परस्परांशी नसणारा मेळ, रुग्णांचा शोध आणि संसर्ग रोखण्यातील कार्यक्षमतेचा अभाव अशी अनेक कारणे लॉकडाऊन अपयशी ठरण्यामागे आहेत. राज्याचे राजकीय नेतृत्व आणि प्रशासन यांची कार्यक्षमता या काळात उघडी पडली.

भारतातील लॉकडाऊनचा आज शंभरावा दिवस असेल. लॉकडाऊन हा तीन ते पाच आठवड्यांचा मामला असेल या समजुतीत प्रथम लोक होते. चाचण्या कमी असल्याने कोरोना रुग्णांची संख्याही तेव्हा कमी होती. मात्र, जशा चाचण्या वाढू लागल्या, तशी कोरोना रुग्णांची संख्या वाढली. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक आपत्तीची त्यामध्ये भर पडली. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. लॉकडाऊन उशिरा लागू करण्याची मोठी किंमत अन्य देशांना चुकवावी लागली. भारतात तसे होऊ नये म्हणून अन्य देशांच्या तुलनेत भारतातील लॉकडाऊनचे नियम अतिशय कडक ठेवण्यात आले. पहिल्या महिन्यातच संसर्गाची साखळी तोडून जगात विक्रम प्रस्थापित करण्याचे मनसुबे केंद्र सरकारचे होते. ते सफल झाले नाहीत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ल़ॉकडाऊनमुळे आटोक्यात राहिली असली, तरी लॉकडाऊनचे अन्य परिणाम जास्त तापदायक ठरू लागले.

नागरिकांचा जीव वाचविण्यास कोणतेही सरकार प्राधान्य देते. त्यानुसार लॉकडाऊन समर्थनीय ठरतो. परंतु, भारताला कोरोनाबरोबरच भूक, बेरोजगारी आणि मंद अर्थव्यवस्था यांचाही मुकाबला करायचा होता. या सर्व आघाड्यांवर एकाचवेळी लढताना केंद्र सरकारची दमछाक झाली आणि जूनच्या सुरुवातीपासून अनलॉकची भाषा सुरू झाली. देशात अनेक ठिकाणी, मोठ्या शहरांमध्येही बरीच मोकळीक मिळाली. मात्र, कोरोनाला रोखण्यात महाराष्ट्र मागेच राहिला. मुंबई, पुण्यात कोरोनाला आळा घालण्यात ठाकरे सरकारला सपशेल अपयश आले. ठाण्यासारख्या शहरात तर पुन्हा कडक ल़ॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली. मुंबई तर अजून रुग्णावस्थेत आहे. पुण्यात मात्र बरीच मोकळीक झाली. ती किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातील अन्य शहरांतही कोरोनाचा प्रसार लॉकडाऊनने रोखलेला नाही. अप्रिय वाटत असले तरी हे सत्य ठाकरे सरकारला स्वीकारावे लागेल. देशात ३१ मे रोजी एक लाख ९८ हजार रुग्ण होते.

१८ जूनपासून यामध्ये दोन लाखांवर रुग्णांची भर पडून १ जुलै रोजी ही संख्या पाच लाख ८५ हजारांवर गेली आहे. जगाच्या क्रमवारीत रशियाला मागे टाकून भारत तिसºया क्रमांकावर जात आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांची जूनमधील संख्या ही आधीच्या तीन महिन्यांतील संख्येच्या दुप्पट आहे. कन्फर्म केसेसच्या वाढीचा वेग किंचित कमी झाला ही थोडी समाधानाची बाब असली, तरी बरे होणाऱ्यांची संख्या व संसर्गित रुग्णांची संख्या यामध्ये मोठा फरक अजूनही आहे. बरे होणारे रुग्ण हे संसर्गित रुग्णसंख्येपेक्षा बरेच अधिक असतील आणि हा फरक दोन आठवडे टिकला, तर कोरोना संसर्गाच्या उच्च बिंदूवर आपण पोहोचलो आहोत असे म्हणता येईल. या बिंदूपासून अद्याप आपण बरेच दूर आहोत, हे अस्वस्थ करणारे वास्तव आहे. नेतृत्वाची अपरिपक्वता, सरकारी यंत्रणांचा परस्परांशी नसणारा मेळ, रुग्णांचा शोध व संसर्ग रोखण्यातील कार्यक्षमतेचा अभाव, अशी अनेक कारणे लॉकडाऊन अपयशी ठरण्यामागे आहेत. राज्याचे राजकीय नेतृत्व आणि प्रशासन यांची कार्यक्षमता या काळात उघडी पडली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व असताना हे व्हावे ही खेदाची बाब आहे. सुव्यवस्थित रचना आखून काम होत आहे, असा जनतेला अनुभव नाही. उलट सरकार भेदरले आहे आणि म्हणून लॉकडाऊन वाढवून किंवा अधिकाºयांच्या बदल्या करून अपयश झाकून ठेवत आहे, अशी जनतेची भावना आहे.

जनता शिस्त पाळीत नसल्याचा ठपका ठाकरे आणि मोदी या दोघांनीही ठेवला असला, तरी त्यामध्ये म्हणावे तितके तथ्य नाही. कोरोनाचा धोका लोकांनी बरोबर ओळखला आहे आणि शक्य होईल तितकी सावधानता लोक बाळगतही आहेत. नियम मोडण्याचे मुख्य कारण सरकारी आदेशांची अनिश्चितता आणि आर्थिक पेच हे आहेत, हे सरकारने लक्षात घ्यावे. कोरोनाचा धोका ओळखून त्या विषाणूचा सामना करीत आपले रोजचे आयुष्य सुलभपणे जगण्याची धडपड प्रत्येक नागरिक करीत आहे. नागरिकांच्या या धडपडीला मदत होईल असा कारभार राज्य व केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे, घरकोंबडे बनण्याचा नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवार