शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मध्यमवर्ग आणि महिलांना कोरोनाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 00:14 IST

कोरोनाकाळात श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, उच्च मध्यमवर्ग मध्यम वर्गात, तर मध्यमवर्ग खाली दारिद्र्यात ढकलला जात आहे!

- राही भिडे

कोरोनाची दुसरी लाट सध्या जोरात आहे. या लाटेचा नकारात्मक परिणाम भांडवली बाजारासह अन्य क्षेत्रावरही होत आहे. त्यामुळे ‘आहे रे आणि नाही रे ‘ वर्गातील दरी रुंदावते आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, उच्च मध्यमवर्ग मध्यम वर्गात जातो आहे आणि मध्यमवर्ग दारिद्र्यात ढकलला जात आहे. गरीब आणि दारिद्र्यरेषेखालच्या नागरिकांची संख्या वाढत असली, तरी सर्वात वाईट परिस्थिती मध्यमवर्गाची आणि महिलांची झाली आहे.

पहिल्या लाटेच्या वेळी संपूर्ण देशभर टाळेबंदी होती. आता महाराष्ट्रासह काही राज्ये मर्यादित टाळेबंदीच्या नावाखाली कडक निर्बंध लावत आहेत. कोरोनाच्या विळख्यात गरीब अधिक अडकले. सरकारी योजनांतून कोरोनावर उपचार केले जात नाहीत. ज्यांना विमाकवच आहे, त्यांच्यावरही कॅशलेस उपचार केले जात नाही. त्यामुळे अनेकांवर घर-दार, जमीन-जुमला, दागिने विकायचा प्रसंग येतो आहे.  या महासाथीच्या तडाख्यात भारतातील सुमारे तीन कोटी २० लाख लोक मध्यम वर्गातून बाहेर फेकले गेल्याचा अहवाल अमेरिकास्थित ‘प्यू रिसर्च सेंटर’ने प्रसिद्ध केला आहे.

कोरोना महासाथीत नोकरी जाणे, वेतन कपात होणे, इंधन दरवाढ, महागाई तसेच व्यवसाय बंद करावा लागल्याने मध्यम वर्गाला तडाखा बसला.  गरिबांच्या लोकसंख्येत सात कोटी ५० लाखांची भर पडल्याचेही हा अहवाल सांगतो. भारतात ८६ टक्के पुरुषांची आणि ९४ टक्के महिलांची मासिक कमाई दहा हजार रुपयांपेक्षा कमी आहे. शिक्षण आणि आरोग्यावर आपण सुमारे १.२५ टक्के खर्च करतो. ४० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. दरवर्षी लाखो लोकांना गंभीर आजारांसाठी औषधे घेण्यास पैसे नसतात, ते अधिक गरीब बनतात. जगातील सर्वांत गरीब देशांपैकी २६ देशांपेक्षा भारतात आठ राज्यांमध्ये सर्वांत गरीब राहातात.

कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन कमी झाले. बाजारपेठा बंद असल्यामुळे अत्यावश्यक आणि गरजेच्या वस्तूंशिवाय दुसरे काही खरेदी केले जात नाही. अशावेळी आर्थिक उतरंडीवर अगदी शेवटच्या, हातावर पोट असलेल्या व्यक्तीला त्याची झळ टाळेबंदी सुरू होताक्षणीच बसली. गेल्या महिन्यांत बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. बेरोजगारी आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. सरकारचेही आर्थिक स्रोत आटू लागले आहेत. थांबलेले अर्थचक्र गतिमान करण्यासाठी बराच वेळ खर्ची करावा लागेल आणि याच वेळेत आर्थिक विषमता वाढत जाईल. 

कोविडच्या साथीचा महिलांवर झालेला परिणाम हा पुरुषांहून कितीतरी पटीने अधिक आहे.  रोजगार, आरोग्य आणि सुरक्षा या बाबतीत त्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. अर्थचक्राला पुन्हा गती मिळत असताना, महिलांनी गमावलेले रोजगार त्यांना पुन्हा  मिळणे कठीण झाले आहे. कोविड कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी वेढलेल्या महिलांना कामावर जाणेही अवघड होऊन बसले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर अर्धी लोकसंख्या कामाविना राहील आणि देशाची उत्पादकता कमी होईल.

‘फोर्ब्स’च्या अहवालानुसार भारतात एकूण अब्जाधीशांची संख्या १४० आहे. मागील वर्षी ती १०२ होती. या सर्व अब्जाधीशांची एकूण संपत्ती सुमारे ४४.२८ लाख कोटी रुपये आहे. या अब्जाधीशांमध्ये तीन अब्जाधीशांची एकूण संपत्ती या १४० अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीपैकी २५ टक्के आहे. त्यामध्ये अंबानी आणि अदानी यांचा समावेश आहे. या अब्जाधीशांपैकी २४ अब्जाधीशांनी कोरोना साथीच्या काळात आरोग्यसेवा क्षेत्रात सर्वाधिक कमाई केली. कोरोनाने श्रीमंतांना अतिश्रीमंत करण्याचा सपाटा लावलाय, मध्यमवर्गातले लोक मात्र खाली ढकलले जात  आहेत!

बऱ्याच अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे, की कोरोनाच्या लाटेत बड्या भांडवलदारांचा नफा वाढला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या नावाने अनेक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले.  जे आधीपासून कामगार होते, त्यांचे वेतन कमी झाल्यामुळे भांडवलदारांना फायदा झाला. भारतातील गरीब- श्रीमंतांमधली दरी कोरोनाने आणखीच रुंद केली आहे!  संकटकाळात आर्थिक विषमता वाढीला लागते, असे डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद करून ठेवले होते... त्यांचे शब्द आज खरे होताना दिसत आहेत!  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत