शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

coronavirus: खरंच पोलिसांच्या काठीने कोरोना मरेल...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 03:55 IST

कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अजूनतरी अक्सीर इलाज सापडलेला नाही. जगभरातील शेकडो वैज्ञानिक डोळ्यांत तेल घालून कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढण्याच्या कामात गुंतले आहेत.

- नंदकिशोर पाटील (लोकमत, कार्यकारी संपादक)टिकटॉक नामक एका सोशल मीडिया अ‍ॅपवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एक मुलगा रस्त्यावर उभा राहून बराच वेळ हातवारे करत असतो. समोरून येणारा एकजण त्याला विचारतो, ‘अरे, असं काय करतोयस?’ त्यावर तो म्हणतो, ‘असे केल्याने कोरोना येत नाही.. कोरोना!’ गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या असेच काहीसे सुरू आहे. कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अजूनतरी अक्सीर इलाज सापडलेला नाही. जगभरातील शेकडो वैज्ञानिक डोळ्यांत तेल घालून कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढण्याच्या कामात गुंतले आहेत. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून लस सापडल्याची बातमी येते आणि ती वाचून आपणांस हायसे वाटते; पण आपला हा आनंद क्षणभंगुर ठरतो, कारण लगेच दुसरी बातमी येऊन धडकते, ‘कोरोनावर लस शोधणे कठीण!’ हिवताप, एचआयव्ही या रोगांवर तरी अजून कुठे लस सापडलीय. तरीही जगरहाटी चालूच आहे की! आपणही या नव्या महामारीतून वाचू, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली माणसं मग नानाप्रकारचे काढे पिऊन या लॉकडाऊनच्या काळातील एकेक दिवस ढकलत आहेत. मरण हेच अमर आहे, हे वैश्विक सत्य प्लेग, कोरोनासारख्या महामारीतून पुन्हा-पुन्हा अधोरेखीत होत असताना मरणावर विजय मिळविण्याचे प्रयत्न मानवाने थांबविले नाही. मानसिक, आर्थिक वा कौटुंबिक तणावातून होणाºया आत्महत्यादेखील या कोरोना संकटकाळात थांबलेल्या आहेत. यावरूनमानसशास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष मोठा गमतशीर आहे. त्यांच्या मते, माणसांकडे जशी संकटावर मात करण्याची वृत्ती उपजतच असते; तशी संकट ओढावून घेण्याची मानसिकता फक्त मनुष्यप्राण्यातच असते.कोविड-१९ ही वैश्विक महामारी असल्याची अधिकृत घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली त्या दिवसापासून या महामारीला रोखण्यासाठी जगभरात जे प्रयत्न सुरू आहेत, ते पाहिल्यानंतर अंधारात चाचपडताना होणारी धडपड आठवते. संगणकक्रांती आणि इंटरनेट नामक महाजालाने जग जोडले गेल्यानंतर माणसं संवादी झाली; पण सामूहिकदृष्ट्या दुरावली गेली. कोरोनाने हा दुरावा अधिकच रुंद केला. त्यातून मग फिजिकलडिस्टंसिंग आले. माणसांनी माणसांचा संपर्क टाळला, तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो, असं जगभरातील तज्ज्ञ सांगू लागल्यानंतर आपणांस आपल्याच सावलीची भीती वाटू लागली. माणसांची घरकोंडी झाली; पण सतत चार भिंतीआड राहण्याची सवय नसल्याने लॉकडाऊन तोडून माणसं घराबाहेर पडली. काहींना ते अपरिहार्य होते; पण बहुसंख्याकांना पाय मोकळे केल्यावाचून राहवेना झाले आणि तिथूनच पोलिसांची भूमिका सुरू झाली.तसेही आपल्या देशाला आपत्ती तशी पाचवीला पुजलेली. प्लेग, भूकंप, महापूर आणि त्सुनामीसारख्या विनाशकारी आपत्तींना आपण आजवर तोंड दिलेले आहे. मात्र, कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा पूर्वानुभव नसल्याने या संकटाचा सामना करताना सगळ्या यंत्रणांचा गोंधळ उडालेला दिसतो. १९९३ साली ओडिसात आलेल्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने नैसर्गिक आणि मानवी आपत्तीच्या धोक्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. मात्र एवढे पुरेसे नाही, हे २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे उघड झाले. आपत्ती निवारणासाठी राष्टÑीयस्तरावर कायदा करण्याची निकड निर्माण झाली. त्यातूनच मग २५ डिसेंबर २००५ रोजी राष्टÑीय आपत्ती निवारण कायदा झाला. जागतिक पातळीवर देखील आकस्मिक आपत्तींना तोंड देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. जगभरात एक गोष्ट निश्चित मानली गेली की, आपत्ती आल्यानंतर केल्या गेलेल्या कार्यवाहीपेक्षा धोका कमी करण्यासाठी केलेली कार्यवाही महत्त्वाची असते. कोरोनाच्याबाबतीत हेच सूत्र जगभर लागू करण्यात आले आणि त्यातून फिजिकल डिस्टंसिंग राबविण्यास सुरुवात झाली. परंतु भारतात मात्र हे शारीरिक अंतर पाळले जाते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांनाच कोरोना रखवालदारांची भूमिका देण्यात आल्याने त्यांची पुरती दमछाक झाली. महाराष्टÑात तब्बल एक हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. दुर्दैवाने काही पोलीस कर्मचारी या महामारीचे बळी ठरले. आपणांस पोलिसांची गरज भासते, कारण कोणीतरी दंडुका उगारल्याखेरीस आपण वठणीवरच येत नाही. ज्या चीन, अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाने हाहाकार माजविला, तिथे पोलिसांना ‘कोरोना स्पेशल ड्युटी’ देण्यात आल्याचे दिसून येत नाही. ज्या दिवशी आपण जबाबदार नागरिकांची भूमिका पार पाडू, त्यादिवशी पोलिसिंग थांबेल आणि कोरोनाही हद्दपार होईल!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस