शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळळा, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

coronavirus: खरंच पोलिसांच्या काठीने कोरोना मरेल...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 03:55 IST

कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अजूनतरी अक्सीर इलाज सापडलेला नाही. जगभरातील शेकडो वैज्ञानिक डोळ्यांत तेल घालून कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढण्याच्या कामात गुंतले आहेत.

- नंदकिशोर पाटील (लोकमत, कार्यकारी संपादक)टिकटॉक नामक एका सोशल मीडिया अ‍ॅपवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एक मुलगा रस्त्यावर उभा राहून बराच वेळ हातवारे करत असतो. समोरून येणारा एकजण त्याला विचारतो, ‘अरे, असं काय करतोयस?’ त्यावर तो म्हणतो, ‘असे केल्याने कोरोना येत नाही.. कोरोना!’ गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या असेच काहीसे सुरू आहे. कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अजूनतरी अक्सीर इलाज सापडलेला नाही. जगभरातील शेकडो वैज्ञानिक डोळ्यांत तेल घालून कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढण्याच्या कामात गुंतले आहेत. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून लस सापडल्याची बातमी येते आणि ती वाचून आपणांस हायसे वाटते; पण आपला हा आनंद क्षणभंगुर ठरतो, कारण लगेच दुसरी बातमी येऊन धडकते, ‘कोरोनावर लस शोधणे कठीण!’ हिवताप, एचआयव्ही या रोगांवर तरी अजून कुठे लस सापडलीय. तरीही जगरहाटी चालूच आहे की! आपणही या नव्या महामारीतून वाचू, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली माणसं मग नानाप्रकारचे काढे पिऊन या लॉकडाऊनच्या काळातील एकेक दिवस ढकलत आहेत. मरण हेच अमर आहे, हे वैश्विक सत्य प्लेग, कोरोनासारख्या महामारीतून पुन्हा-पुन्हा अधोरेखीत होत असताना मरणावर विजय मिळविण्याचे प्रयत्न मानवाने थांबविले नाही. मानसिक, आर्थिक वा कौटुंबिक तणावातून होणाºया आत्महत्यादेखील या कोरोना संकटकाळात थांबलेल्या आहेत. यावरूनमानसशास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष मोठा गमतशीर आहे. त्यांच्या मते, माणसांकडे जशी संकटावर मात करण्याची वृत्ती उपजतच असते; तशी संकट ओढावून घेण्याची मानसिकता फक्त मनुष्यप्राण्यातच असते.कोविड-१९ ही वैश्विक महामारी असल्याची अधिकृत घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली त्या दिवसापासून या महामारीला रोखण्यासाठी जगभरात जे प्रयत्न सुरू आहेत, ते पाहिल्यानंतर अंधारात चाचपडताना होणारी धडपड आठवते. संगणकक्रांती आणि इंटरनेट नामक महाजालाने जग जोडले गेल्यानंतर माणसं संवादी झाली; पण सामूहिकदृष्ट्या दुरावली गेली. कोरोनाने हा दुरावा अधिकच रुंद केला. त्यातून मग फिजिकलडिस्टंसिंग आले. माणसांनी माणसांचा संपर्क टाळला, तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो, असं जगभरातील तज्ज्ञ सांगू लागल्यानंतर आपणांस आपल्याच सावलीची भीती वाटू लागली. माणसांची घरकोंडी झाली; पण सतत चार भिंतीआड राहण्याची सवय नसल्याने लॉकडाऊन तोडून माणसं घराबाहेर पडली. काहींना ते अपरिहार्य होते; पण बहुसंख्याकांना पाय मोकळे केल्यावाचून राहवेना झाले आणि तिथूनच पोलिसांची भूमिका सुरू झाली.तसेही आपल्या देशाला आपत्ती तशी पाचवीला पुजलेली. प्लेग, भूकंप, महापूर आणि त्सुनामीसारख्या विनाशकारी आपत्तींना आपण आजवर तोंड दिलेले आहे. मात्र, कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा पूर्वानुभव नसल्याने या संकटाचा सामना करताना सगळ्या यंत्रणांचा गोंधळ उडालेला दिसतो. १९९३ साली ओडिसात आलेल्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने नैसर्गिक आणि मानवी आपत्तीच्या धोक्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. मात्र एवढे पुरेसे नाही, हे २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे उघड झाले. आपत्ती निवारणासाठी राष्टÑीयस्तरावर कायदा करण्याची निकड निर्माण झाली. त्यातूनच मग २५ डिसेंबर २००५ रोजी राष्टÑीय आपत्ती निवारण कायदा झाला. जागतिक पातळीवर देखील आकस्मिक आपत्तींना तोंड देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. जगभरात एक गोष्ट निश्चित मानली गेली की, आपत्ती आल्यानंतर केल्या गेलेल्या कार्यवाहीपेक्षा धोका कमी करण्यासाठी केलेली कार्यवाही महत्त्वाची असते. कोरोनाच्याबाबतीत हेच सूत्र जगभर लागू करण्यात आले आणि त्यातून फिजिकल डिस्टंसिंग राबविण्यास सुरुवात झाली. परंतु भारतात मात्र हे शारीरिक अंतर पाळले जाते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांनाच कोरोना रखवालदारांची भूमिका देण्यात आल्याने त्यांची पुरती दमछाक झाली. महाराष्टÑात तब्बल एक हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. दुर्दैवाने काही पोलीस कर्मचारी या महामारीचे बळी ठरले. आपणांस पोलिसांची गरज भासते, कारण कोणीतरी दंडुका उगारल्याखेरीस आपण वठणीवरच येत नाही. ज्या चीन, अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाने हाहाकार माजविला, तिथे पोलिसांना ‘कोरोना स्पेशल ड्युटी’ देण्यात आल्याचे दिसून येत नाही. ज्या दिवशी आपण जबाबदार नागरिकांची भूमिका पार पाडू, त्यादिवशी पोलिसिंग थांबेल आणि कोरोनाही हद्दपार होईल!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस