शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

Coronavirus : कोरोनाचा फैलाव वाढतोय, शिस्त पाळा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 06:03 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. कोरोनानंतर सरकारमध्ये फारसा गोंधळ दिसत नाही. कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता अनेक कठोर निर्णय सरकारने झटपट घेतले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत तरी परिस्थिती चांगली हाताळली आहे.

कोरोनाच्या विळख्यात सध्या जवळपास संपूर्ण जग सापडले आहे. चीनमध्ये या विषाणूने प्रेतांच्या राशी रचल्या, इटलीत किड्यामुंग्यांसारखी माणसे मरत आहेत, महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही कोरोना डोळे वटारून दाखवत आहे आणि भारतातही तो हातपाय पसरत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ४१ च्या घरात पोहोचली असून, संशयितांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्याकरिता घ्यायची काळजी, याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न सरकार, माध्यमे, सामाजिक संस्था करीत आहेत. मात्र, आपल्याकडील अनेकांना या संकटाचे जराही गांभीर्य नाही. सरकारने अगोदर मनोरंजनाची केंद्रे बंद केली, शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या देऊन परीक्षा पुढे ढकलल्या, मुंबई-पुण्यात जमावबंदी लागू केली, खासगी कंपन्यांना आपल्या निम्म्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले. आता तर सर्व सरकारी कार्यालयांत आवश्यक तेवढेच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.मात्र, अनेक जणांना कोरोनाची आपत्ती ही सोशल मीडियावर चहाटळ विनोद चघळण्याची संधी अथवा लोकांमध्ये अनाठायी घबराट निर्माण करणाºया कंड्या पिकवण्याची विकृत संधी वाटत आहे, हे दुर्दैव आहे. अशा संकटाच्या प्रसंगी अफवा पसरवणारी बनावट सरकारी परिपत्रके तयार करणारे किंवा बनावट व्हिडीओ तयार करणारे यांना कठोरात कठोर शासन करणारा कायदा करण्याची गरज आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने लोकांनी घरात बसावे व घरून काम करावे, अशी विनंती सरकार करीत आहे. मात्र, तरीही तोंडावर मास्क चढवून आणि हातावर तथाकथित सॅनिटायझर शिंपडून आपण कोरोनाची पर्वा करीत नाही, अशा आविर्भावात अनेक जण फिरत आहेत. विदेशवारी करून आलेल्या व संशयित रुग्ण असलेल्या हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्या काहींनी, तर रुग्णालयातून पळ काढून निघून जाण्याची तसेच देशाच्या काही भागात फेरफटका मारून येण्याची बेफिकिरी दाखवली आहे. वेगवेगळ्या शहरांत संशयित रुग्ण किंवा विदेशवारी करून आलेल्यांचे नातलग यांच्याकरिता विलगीकरण कक्ष उभारण्याकरिता एखादी शासकीय किंवा खासगी इमारत संपादित करण्याच्या प्रयत्नात स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी खोडा घातला आहे. आमच्या लोकवस्तीत विलगीकरण कक्ष नको, अशी चक्क उफराटी भूमिका त्यांनी घेतली आहे.

एकीकडे लोकांचे अज्ञान व अरेरावी यांचे संकट आहे, तर दुसरीकडे काही ‘देशद्रोही’ मास्क, सॅनिटायझर यांचा काळाबाजार करीत आहेत, तर काही चक्क बनावट वस्तू बाजारात विकून बक्कळ कमाई करीत आहेत. त्यांच्यावर छापे घालून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला जात आहे. देशावर आपत्ती आली असताना पैसे कमावण्याचा विचार करणारी ही विषवल्ली देशात सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करून शेकडो माणसे मारणा-या अतिरेक्यांपेक्षा वेगळी नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी दोन हात करताना मूढ जनता व लुटारू मनोवृत्तीची मंडळी यांचाही सामना दुसरीकडे करायचा आहे.माध्यमांनीही या काळात अधिक जबाबदारीने वागायला हवे. केवळ स्पर्धेपायी भलत्यासलत्या बातम्या दिल्या तर त्यामुळे संभ्रम वाढतो. मुंबईतील मध्य व पश्चिम रेल्वेची लोकलसेवा, मेट्रोसेवा तसेच बेस्टची बससेवा बंद करण्यात येणार, अशा बातम्या सकाळपासून सर्व वाहिन्यांवर दिल्या जात होत्या. वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांसोबत बोलून लोकलसेवा बंद करणे अनिवार्य असल्याचे भासवण्याचा प्रयत्न काही माध्यमांनी केला. मुंबईतील लोकलसेवा बंद केल्यास हाहाकार उडेल. कारण अनेक शहरांना जोडणारी पर्यायी व्यवस्था नाही. सरकारनेही रेल्वेसेवा बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संकटाचे गांभीर्य न ओळखता लोक विनाकारण लोकलमधून फिरत राहिले व कोरोनाचे संकट न होवो; पण गहिरे झाले तर रेल्वे बंद करण्याखेरीज पर्याय राहणार नाही. पुढील काही दिवस तोंडावर मास्क बांधून, पचापच न थुंकता, घरातच अधिक काळ राहिलो आणि परस्परांना केवळ हात जोडून नमस्कार केला, तरच कोरोनाचा फैलाव आटोक्यात येईल आणि एक गंभीर संकट परतावून लावण्यात आपण नक्की यशस्वी होऊ.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार