शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

वादग्रस्त साथी

By admin | Updated: March 2, 2016 02:48 IST

एकीकडे समाजवादी साथी अशी ओळख जपत असतानाच दुसरीकडे जातीयवादाचे आरोप झेलत मुस्लीम मतपेटी भक्कम ठेवणाऱ्या निहाल अहमद मौलवी मोहम्मद उस्मान यांच्या

एकीकडे समाजवादी साथी अशी ओळख जपत असतानाच दुसरीकडे जातीयवादाचे आरोप झेलत मुस्लीम मतपेटी भक्कम ठेवणाऱ्या निहाल अहमद मौलवी मोहम्मद उस्मान यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील वादग्रस्त पर्वाची अखेर झाली आहे. तब्बल २७ वर्षे विधानसभेत मालेगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निहालभाईंनी राज्यातील ‘पुलोद’ सरकारमध्ये तंत्र व उच्च शिक्षणासह रोजगार हमी योजना मंत्री म्हणून काम केले असले आणि काही काळ विरोधी पक्ष नेते म्हणूनही भूमिका बजवली असली तरी, मालेगावलाच त्यांनी आपल्या चळवळीचे व राजकारणाचे केंद्र बनविले होते. त्यामुळे राज्यस्तरीय नेतृत्व केल्यानंतरही अखेरच्या काळात त्यांनी मालेगावचे प्रथम महापौर होण्याची संधीही घेतली. वरकरणी जातीयवादाचा विरोध करीत आपली समाजवादी भूमिका जपणाऱ्या निहालभाईंचे संपूर्ण राजकीय जीवनच संघर्षमय व वादळी राहिले आहे. विशेषत: मालेगावातील गणेशोत्सवात एका मंडळाने रस्त्यात केलेली आरास काढण्याची सूचना अमान्य केली गेल्यावर ती स्वत:हून पाडून टाकण्याच्या त्यांच्या कृतीने ते अधिक चर्चेत आले व वादग्रस्त ठरले. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर आपल्या शर्टाच्या डाव्या हाताच्या बाहीवर सतत काळीपट्टी बांधण्याच्या भूमिकेने तसेच २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यासाठी त्यांनी आंदोलन छेडल्याने त्यांच्यावरील जातीयवादाचा आरोप अधिक गहिरा झाला, पण या आरोपांची फिकीर न बाळगता त्यांनी कायम आपला मुस्लीम मतदार आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मालेगावातील हातमाग विणकर, अल्पशिक्षित व असंघटीत मुस्लीम तसेच तळागाळातील वर्गासाठी नित्यनवी आंदोलने करून रस्त्यावर उतरणाऱ्या व सायकल चालवित चर्चेत राहणाऱ्या निहालभाईंपासून त्यांच्या अखेरच्या काळात मात्र पारंपरिक मतदार दुरावल्याचे दिसून आले. विधानसभेच्या निवडणुकीसह लोकसभेची निवडणूकही लढवून पाहिलेल्या भाईंना मालेगाव महापालिकेतही अलीकडच्या काळात पिछाडीचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घोषीत करून पत्नी साजेदा व पुत्र बुलंद इक्बाल यांना आपले राजकीय वारस म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातही यश आले नाही. तरीही न खचता त्यांची समाजासाठीची चळवळ सुरूच होती. राजकारणातील यशापयशाखेरीजही मालेगाव म्हणजे निहालभाई, असे घट्ट समीकरण असलेल्या या साथीचे जन्मदिनीच जाणे म्हणूनच मालेगावकरांना चटका लावणारे ठरले आहे.