शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

वादग्रस्त साथी

By admin | Updated: March 2, 2016 02:48 IST

एकीकडे समाजवादी साथी अशी ओळख जपत असतानाच दुसरीकडे जातीयवादाचे आरोप झेलत मुस्लीम मतपेटी भक्कम ठेवणाऱ्या निहाल अहमद मौलवी मोहम्मद उस्मान यांच्या

एकीकडे समाजवादी साथी अशी ओळख जपत असतानाच दुसरीकडे जातीयवादाचे आरोप झेलत मुस्लीम मतपेटी भक्कम ठेवणाऱ्या निहाल अहमद मौलवी मोहम्मद उस्मान यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील वादग्रस्त पर्वाची अखेर झाली आहे. तब्बल २७ वर्षे विधानसभेत मालेगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निहालभाईंनी राज्यातील ‘पुलोद’ सरकारमध्ये तंत्र व उच्च शिक्षणासह रोजगार हमी योजना मंत्री म्हणून काम केले असले आणि काही काळ विरोधी पक्ष नेते म्हणूनही भूमिका बजवली असली तरी, मालेगावलाच त्यांनी आपल्या चळवळीचे व राजकारणाचे केंद्र बनविले होते. त्यामुळे राज्यस्तरीय नेतृत्व केल्यानंतरही अखेरच्या काळात त्यांनी मालेगावचे प्रथम महापौर होण्याची संधीही घेतली. वरकरणी जातीयवादाचा विरोध करीत आपली समाजवादी भूमिका जपणाऱ्या निहालभाईंचे संपूर्ण राजकीय जीवनच संघर्षमय व वादळी राहिले आहे. विशेषत: मालेगावातील गणेशोत्सवात एका मंडळाने रस्त्यात केलेली आरास काढण्याची सूचना अमान्य केली गेल्यावर ती स्वत:हून पाडून टाकण्याच्या त्यांच्या कृतीने ते अधिक चर्चेत आले व वादग्रस्त ठरले. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर आपल्या शर्टाच्या डाव्या हाताच्या बाहीवर सतत काळीपट्टी बांधण्याच्या भूमिकेने तसेच २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यासाठी त्यांनी आंदोलन छेडल्याने त्यांच्यावरील जातीयवादाचा आरोप अधिक गहिरा झाला, पण या आरोपांची फिकीर न बाळगता त्यांनी कायम आपला मुस्लीम मतदार आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मालेगावातील हातमाग विणकर, अल्पशिक्षित व असंघटीत मुस्लीम तसेच तळागाळातील वर्गासाठी नित्यनवी आंदोलने करून रस्त्यावर उतरणाऱ्या व सायकल चालवित चर्चेत राहणाऱ्या निहालभाईंपासून त्यांच्या अखेरच्या काळात मात्र पारंपरिक मतदार दुरावल्याचे दिसून आले. विधानसभेच्या निवडणुकीसह लोकसभेची निवडणूकही लढवून पाहिलेल्या भाईंना मालेगाव महापालिकेतही अलीकडच्या काळात पिछाडीचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घोषीत करून पत्नी साजेदा व पुत्र बुलंद इक्बाल यांना आपले राजकीय वारस म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातही यश आले नाही. तरीही न खचता त्यांची समाजासाठीची चळवळ सुरूच होती. राजकारणातील यशापयशाखेरीजही मालेगाव म्हणजे निहालभाई, असे घट्ट समीकरण असलेल्या या साथीचे जन्मदिनीच जाणे म्हणूनच मालेगावकरांना चटका लावणारे ठरले आहे.