शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वादग्रस्त साथी

By admin | Updated: March 2, 2016 02:48 IST

एकीकडे समाजवादी साथी अशी ओळख जपत असतानाच दुसरीकडे जातीयवादाचे आरोप झेलत मुस्लीम मतपेटी भक्कम ठेवणाऱ्या निहाल अहमद मौलवी मोहम्मद उस्मान यांच्या

एकीकडे समाजवादी साथी अशी ओळख जपत असतानाच दुसरीकडे जातीयवादाचे आरोप झेलत मुस्लीम मतपेटी भक्कम ठेवणाऱ्या निहाल अहमद मौलवी मोहम्मद उस्मान यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील वादग्रस्त पर्वाची अखेर झाली आहे. तब्बल २७ वर्षे विधानसभेत मालेगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निहालभाईंनी राज्यातील ‘पुलोद’ सरकारमध्ये तंत्र व उच्च शिक्षणासह रोजगार हमी योजना मंत्री म्हणून काम केले असले आणि काही काळ विरोधी पक्ष नेते म्हणूनही भूमिका बजवली असली तरी, मालेगावलाच त्यांनी आपल्या चळवळीचे व राजकारणाचे केंद्र बनविले होते. त्यामुळे राज्यस्तरीय नेतृत्व केल्यानंतरही अखेरच्या काळात त्यांनी मालेगावचे प्रथम महापौर होण्याची संधीही घेतली. वरकरणी जातीयवादाचा विरोध करीत आपली समाजवादी भूमिका जपणाऱ्या निहालभाईंचे संपूर्ण राजकीय जीवनच संघर्षमय व वादळी राहिले आहे. विशेषत: मालेगावातील गणेशोत्सवात एका मंडळाने रस्त्यात केलेली आरास काढण्याची सूचना अमान्य केली गेल्यावर ती स्वत:हून पाडून टाकण्याच्या त्यांच्या कृतीने ते अधिक चर्चेत आले व वादग्रस्त ठरले. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर आपल्या शर्टाच्या डाव्या हाताच्या बाहीवर सतत काळीपट्टी बांधण्याच्या भूमिकेने तसेच २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यासाठी त्यांनी आंदोलन छेडल्याने त्यांच्यावरील जातीयवादाचा आरोप अधिक गहिरा झाला, पण या आरोपांची फिकीर न बाळगता त्यांनी कायम आपला मुस्लीम मतदार आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मालेगावातील हातमाग विणकर, अल्पशिक्षित व असंघटीत मुस्लीम तसेच तळागाळातील वर्गासाठी नित्यनवी आंदोलने करून रस्त्यावर उतरणाऱ्या व सायकल चालवित चर्चेत राहणाऱ्या निहालभाईंपासून त्यांच्या अखेरच्या काळात मात्र पारंपरिक मतदार दुरावल्याचे दिसून आले. विधानसभेच्या निवडणुकीसह लोकसभेची निवडणूकही लढवून पाहिलेल्या भाईंना मालेगाव महापालिकेतही अलीकडच्या काळात पिछाडीचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घोषीत करून पत्नी साजेदा व पुत्र बुलंद इक्बाल यांना आपले राजकीय वारस म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातही यश आले नाही. तरीही न खचता त्यांची समाजासाठीची चळवळ सुरूच होती. राजकारणातील यशापयशाखेरीजही मालेगाव म्हणजे निहालभाई, असे घट्ट समीकरण असलेल्या या साथीचे जन्मदिनीच जाणे म्हणूनच मालेगावकरांना चटका लावणारे ठरले आहे.