शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘पाचशे’चे विमान ‘सोळाशे’त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 6:26 AM

फ्रान्सच्या सरकारला एक गुळमुुळीत व अनाकलनीय खुलासा करायला लावून मोदी सरकारने आपली अब्रू झाकली असली तरी हा प्रकार व व्यवहार साधा झाला नाही हे उघड झाले आहे

डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने फ्रान्सच्या ज्या राफेल लढाऊ विमानांची खरेदी प्रत्येकी ५०० कोटी रु. या दराने करण्याचा करार केला तेच विमान आताचे मोदी सरकार १६०० कोटी रु. दराने घेणार असेल व त्यासंबंधीची आकडेवारी संसदेला सांगायला नकार देत असेल तर ती केवळ लबाडी नसून देशाची अक्षम्य अशी फसवणूक आहे. ती करताना ‘अशा व्यवहारासंबंधी गुप्तता राखण्याचा करार भारत व फ्रान्समध्ये झाला असल्याचा’ खुलासा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागाहून केला. मात्र असे करार त्यातील लबाडी लपविण्यासाठी केले जात असतील तर ते उघड झाले पाहिजेत व त्याची गंभीर व सखोल चौकशीही झाली पाहिजे. प्रत्यक्षात ‘असा करार झालाच नाही’ अशी माहिती फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलताना त्यांना दिली व तसे त्यांनी लोकसभेत सांगितले आहे. मागाहून फ्रान्सच्या सरकारला एक गुळमुुळीत व अनाकलनीय खुलासा करायला लावून मोदी सरकारने आपली अब्रू झाकली असली तरी हा प्रकार व व्यवहार साधा झाला नाही हे उघड झाले आहे. वस्तूंच्या किमती वाढतात व बाजार दरदिवशी तेज होतो हे खरे असले तरी मनमोहनसिंगांच्या काळातले ५०० कोटी रु.चे विमान मोदींच्या काळात १६०० कोटींचे होईल ही शक्यताच वास्तवात कमी आहे. त्यामुळे असा करार या सरकारने केला असेल आणि तो ‘गुप्त’ म्हणून झाकून ठेवला जात असेल तर त्यात अपराधाखेरीज दुसरे काहीही दडले नाही असे स्पष्टपणे म्हणावे लागेल. ज्या बोफोर्स तोफांच्या सौद्यात अवघ्या ६७ कोटींचा घोटाळा झाला म्हणून राजीव गांधी व त्यांच्या सरकारला पायउतार करीपर्यंत बदनाम करण्यात आले त्या तुलनेत राफेल घोटाळा अनेक पटींनी मोठा व ताजा आहे. शिवाय तो स्वत:ला फार स्वच्छ समजणाऱ्या आताच्या सरकारने केला आहे. सरकारचा व्यवहार स्वच्छ असेल तर तो उघड का होत नाही हा प्रश्नही त्यातून पुढे येणारा आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन हे मोदींशी बोलताना एक आकडा सांगतील आणि राहुल गांधींना दुसरा आकडा सांगतील याची शक्यता कमी आहे. ती तशी असेल तर स्वत: मॅक्रॉनही यात दोषी ठरतील. फ्रान्ससारखा जागरुक व सावध लोकशाही देश तसा अध्यक्ष चालवूनही घेणार नाही. भारतात मात्र असे सारे चालते. सरकारकडून दरदिवशी एक नवी आकडेवारी जाहीर होते. देशातली माध्यमे तिच्या बातम्या बनवितात. मात्र त्यातले खरेखोटेपण तपासण्याची तसदी कुणी घेताना दिसत नाही. प्रश्न केवळ राफेल विमानाच्या खरेदीविषयी झालेल्या सौद्याचा नाही. तो देशाच्या संरक्षणाशी संबंध असणारा आहे. अशा प्रश्नाबाबत सरकारला फार स्पष्ट राहणे व त्याविषयी संसदेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. गुप्ततेविषयीचे करार याआधी कुणी केले असतील तर ते लोकशाहीविरोधी म्हणून रद्दही झाले पाहिजेत. त्यातून राहुल गांधींसारखे जबाबदार नेते प्रत्यक्ष फ्रान्सच्या अध्यक्षांचा हवाला देऊन असा करार झालाच नसल्याचे सांगत असतील तर तो या सबंध प्रकरणात झालेल्या वा होत असलेल्या लबाडीवर पांघरुण घालण्याचा प्रकार आहे असेच म्हटले पाहिजे. त्यातून आपले सरकार चालविणारे उठसूठ प्रभू रामचंद्र, हिंदू धर्म, गाई, मंदिरे आणि गंगा अशी पवित्र नावे लोकांच्या कानावर आदळत असतील तर त्याविषयीची शंका घेणे हेच मग काही सज्जनांना पाप वाटू लागते. या स्थितीत ५०० कोटींचे विमान १६०० कोटींचे कसे झाले हा प्रश्न मग कुणी विचारायचा? ज्या संसदेला सरकारला धारेवर धरता येते तिलाच ‘गुप्तते’ची गोष्ट ऐकविली जात असेल तर माध्यमे काय करणार आणि लोक तरी तशी विचारणा कुणाकडे करणार? तात्पर्य ‘आम्ही करार करू, त्यात किमती वाढवून घेऊ आणि गुप्ततेचे नाव सांगून त्याविषयी तुम्हाला काही सांगणार नाही’ हा प्रकार साध्या लबाडीचाही नाही. तो गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. त्याविषयी सरकारचा पिच्छा पुरविणे हे विरोधी पक्ष, संसद, माध्यमे व देश या साºयांचेच उत्तरदायित्व आहे. विरोधी पक्षांनी त्यासाठी संसदेत आणलेला सरकारविरोधी हक्कभंगाचा प्रस्ताव त्याचमुळे रास्त आहे आणि त्याचा पाठपुरावा अखेरपर्यंत होणे गरजेचे आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस