शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

भेदरलेले राईनपाडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 12:17 IST

मुले पळविणारी टोळी समजून सोलापूर जिल्ह्यातील पाच भिक्षेकऱ्यांना  जमावाने ठार करण्याचे राक्षसी क्रौर्य  ज्या गावात घडले ते राईनपाडा देशभर गाजले.

मिलिंद कुलकर्णी मुले पळविणारी टोळी समजून सोलापूर जिल्ह्यातील पाच भिक्षेकऱ्यांना  जमावाने ठार करण्याचे राक्षसी क्रौर्य  ज्या गावात घडले ते राईनपाडा देशभर गाजले.  धुळ्यापासून सुमारे ९० कि.मी.अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील राईनपाडा १२ दिवसांनंतरही भेदरलेले आहे. गावातील सुमारे ३० पुरुषांना यापूर्वीच अटक झालेली आहे; तर अटकेच्या भीतीने बहुसंख्य पुरुष मंडळी गाव सोडून पळाली आहे. ५०-६० घरांचा हा पाडा १ जुलैला जसा होता, तसाच आज ‘फ्रीज’ झाल्यासारखा आहे.  घटनेच्यावेळी रस्त्यावर पडलेल्या दुचाकी तशाच आहेत. सहा आसनी रिक्षा रस्त्यात वाट अडवून उभी आहे. प्रत्येक घरात केवळ महिला, लहान मुले आहेत. कोणतेही वाहन किंवा अनोळखी माणूस गावात आला तरी भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले जाते. विचारपूस करायची तर भाषेची अडचण जशी येते तशी भीती आहेच.  बाहेरील माणूस म्हणजे पोलीसच अशी भीती महिला व मुलांमध्ये घर करुन बसली आहे. रस्त्यांवर शुकशुकाट कायम असतो. गायी, म्हशी, बकºया, कोंबड्या हे पशुधन बेवारशासारखं गावभर फिरत आहे. चांगला पाऊस झाल्याने भात आणि नागली लागवडीची योग्य वेळ असताना एखादा-दुसरा शेतकरी शेतात अथवा रस्त्यावर बैलजोडीसह दिसतो. 

आदिवासी प्रकल्प विभागाची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा याठिकाणी आहे. ३०० विद्यार्थ्यांची निवासी तर १०० विद्यार्थ्यांची अनिवासी शिक्षणाची व्यवस्था याठिकाणी होते. लगतच्या १५-२० पाड्यांमधून आदिवासी मुले शिक्षणासाठी येतात. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील  गावात आहे. ५५ मुलांची पटसंख्या आहे. मात्र दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ७० आणि १७ मुले हजर होती. ‘त्या’ घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. आम्ही पाड्यांवर शिक्षक पाठवून समजावून सांगतो आहोत, हळूहळू पालक मुलांना पाठवू लागले आहेत, असे मुख्याध्यापक कुंवर म्हणाले. 

पोलीस दलाची व्हॅन मुख्य रस्त्यावर उभी आहे तर गावाच्या नावाच्या पाटीला पोलिसांचा सूचना फलक लावलेला आहे. १ जुलैनंतर त्या गावात झालेले हे दोन बदल...बाकी इतर पाड्यांसारखेच हे पाडे आहे. आठवड्यानंतर बससेवा सुरु झाली असली तरी प्रतिसाद कमीच आहे. रविवारी भरणारा आठवडे बाजार यावेळी भरलाच नाही. 

केंद्रीय संरक्षणराज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार डी.एस.अहिरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी याठिकाणी येऊन गेले. ज्या ग्रामपंचायत कार्यालयात पाच जणांना ठार केले; त्या खोलीला आता कुलूप आहे. दरवाजाची अगदी तळाची पाटी तुटलेली आहे; खिडक्यांची दारेही तुटलेली आहे...राक्षसीवृत्ती जागृत झालेल्या माणसांच्या क्रोैर्याच्या खुणा ती खोली अजून धारण करुन आहे...८-१० कि.मी. अंतरावर रोहोड या पाड्यात पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दूरक्षेत्र या घटनेनंतर उभारण्यात आले आहे. एक फौजदार व चार पोलीस कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले आहे. पण हे कर्मचारी सध्या आरोपींच्या शोधात फिरत आहेत.

राईनपाड्यापासून २० कि.मी.अंतरावर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याची हद्द सुरु होते. काही आरोपींना याच तालुक्यात पकडले आहे. काही आरोपी लगतची राज्ये मध्य प्रदेश आणि गुजराथमध्ये पळाली असल्याच्या संशयामुळे पोलिसांची पथके तेथे जाऊन शोध घेत आहे. 

देश व राज्यातील प्रसारमाध्यमांमध्ये राईनपाडा एकदम चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे राष्टÑीय क्रमांक सहा वरील दहिवेल या गावापासून २० कि.मी.अंतरावरील दुर्गम भागातील या गावात दूरचित्रवाहिन्यांच्या ओबी व्हॅन, पत्रकार, छायाचित्रकारांचा राबता सुरुच आहे. काकर्दा ग्रुप ग्रामपंचायतीतील हे एक गाव; परंतु आश्रमशाळेच्या तीन मजली इमारतीमुळे एखाद्या मोठ्या गावात आल्यासारखे वाटते. सगळे आधी आश्रमशाळेत पोहोचतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे ‘त्या’ घटनेविषयी चौकशी करतात. मुले आधीच भेदरलेली आणि त्यात अशा आक्रमणामुळे पार गोंधळून जातात.  राक्षसी क्रौर्याचे समर्थन कुणीच करणार नाही; आठवडे बाजार भरला असताना जमावाकडून हे कृत्य घडलेले आहे. हल्लेखोर केवळ याच गावातील नसावे. पण त्यांची ओळख पटविणे, शोधणे, अटक करणे आणि नंतर न्यायालयात खटला चालविणे या प्रक्रियेत मोठा कालावधी लागणार आहे. पण अजाणतेपण, समूह मानसिकता, अंधश्रध्दा, अफवा याच्या परिपाकातून घडलेल्या या घटनेची शिक्षा हे गाव त्या दिवसापासूनच भोगतेय...