शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

भेदरलेले राईनपाडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 12:17 IST

मुले पळविणारी टोळी समजून सोलापूर जिल्ह्यातील पाच भिक्षेकऱ्यांना  जमावाने ठार करण्याचे राक्षसी क्रौर्य  ज्या गावात घडले ते राईनपाडा देशभर गाजले.

मिलिंद कुलकर्णी मुले पळविणारी टोळी समजून सोलापूर जिल्ह्यातील पाच भिक्षेकऱ्यांना  जमावाने ठार करण्याचे राक्षसी क्रौर्य  ज्या गावात घडले ते राईनपाडा देशभर गाजले.  धुळ्यापासून सुमारे ९० कि.मी.अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील राईनपाडा १२ दिवसांनंतरही भेदरलेले आहे. गावातील सुमारे ३० पुरुषांना यापूर्वीच अटक झालेली आहे; तर अटकेच्या भीतीने बहुसंख्य पुरुष मंडळी गाव सोडून पळाली आहे. ५०-६० घरांचा हा पाडा १ जुलैला जसा होता, तसाच आज ‘फ्रीज’ झाल्यासारखा आहे.  घटनेच्यावेळी रस्त्यावर पडलेल्या दुचाकी तशाच आहेत. सहा आसनी रिक्षा रस्त्यात वाट अडवून उभी आहे. प्रत्येक घरात केवळ महिला, लहान मुले आहेत. कोणतेही वाहन किंवा अनोळखी माणूस गावात आला तरी भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले जाते. विचारपूस करायची तर भाषेची अडचण जशी येते तशी भीती आहेच.  बाहेरील माणूस म्हणजे पोलीसच अशी भीती महिला व मुलांमध्ये घर करुन बसली आहे. रस्त्यांवर शुकशुकाट कायम असतो. गायी, म्हशी, बकºया, कोंबड्या हे पशुधन बेवारशासारखं गावभर फिरत आहे. चांगला पाऊस झाल्याने भात आणि नागली लागवडीची योग्य वेळ असताना एखादा-दुसरा शेतकरी शेतात अथवा रस्त्यावर बैलजोडीसह दिसतो. 

आदिवासी प्रकल्प विभागाची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा याठिकाणी आहे. ३०० विद्यार्थ्यांची निवासी तर १०० विद्यार्थ्यांची अनिवासी शिक्षणाची व्यवस्था याठिकाणी होते. लगतच्या १५-२० पाड्यांमधून आदिवासी मुले शिक्षणासाठी येतात. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील  गावात आहे. ५५ मुलांची पटसंख्या आहे. मात्र दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ७० आणि १७ मुले हजर होती. ‘त्या’ घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. आम्ही पाड्यांवर शिक्षक पाठवून समजावून सांगतो आहोत, हळूहळू पालक मुलांना पाठवू लागले आहेत, असे मुख्याध्यापक कुंवर म्हणाले. 

पोलीस दलाची व्हॅन मुख्य रस्त्यावर उभी आहे तर गावाच्या नावाच्या पाटीला पोलिसांचा सूचना फलक लावलेला आहे. १ जुलैनंतर त्या गावात झालेले हे दोन बदल...बाकी इतर पाड्यांसारखेच हे पाडे आहे. आठवड्यानंतर बससेवा सुरु झाली असली तरी प्रतिसाद कमीच आहे. रविवारी भरणारा आठवडे बाजार यावेळी भरलाच नाही. 

केंद्रीय संरक्षणराज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार डी.एस.अहिरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी याठिकाणी येऊन गेले. ज्या ग्रामपंचायत कार्यालयात पाच जणांना ठार केले; त्या खोलीला आता कुलूप आहे. दरवाजाची अगदी तळाची पाटी तुटलेली आहे; खिडक्यांची दारेही तुटलेली आहे...राक्षसीवृत्ती जागृत झालेल्या माणसांच्या क्रोैर्याच्या खुणा ती खोली अजून धारण करुन आहे...८-१० कि.मी. अंतरावर रोहोड या पाड्यात पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दूरक्षेत्र या घटनेनंतर उभारण्यात आले आहे. एक फौजदार व चार पोलीस कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले आहे. पण हे कर्मचारी सध्या आरोपींच्या शोधात फिरत आहेत.

राईनपाड्यापासून २० कि.मी.अंतरावर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याची हद्द सुरु होते. काही आरोपींना याच तालुक्यात पकडले आहे. काही आरोपी लगतची राज्ये मध्य प्रदेश आणि गुजराथमध्ये पळाली असल्याच्या संशयामुळे पोलिसांची पथके तेथे जाऊन शोध घेत आहे. 

देश व राज्यातील प्रसारमाध्यमांमध्ये राईनपाडा एकदम चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे राष्टÑीय क्रमांक सहा वरील दहिवेल या गावापासून २० कि.मी.अंतरावरील दुर्गम भागातील या गावात दूरचित्रवाहिन्यांच्या ओबी व्हॅन, पत्रकार, छायाचित्रकारांचा राबता सुरुच आहे. काकर्दा ग्रुप ग्रामपंचायतीतील हे एक गाव; परंतु आश्रमशाळेच्या तीन मजली इमारतीमुळे एखाद्या मोठ्या गावात आल्यासारखे वाटते. सगळे आधी आश्रमशाळेत पोहोचतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे ‘त्या’ घटनेविषयी चौकशी करतात. मुले आधीच भेदरलेली आणि त्यात अशा आक्रमणामुळे पार गोंधळून जातात.  राक्षसी क्रौर्याचे समर्थन कुणीच करणार नाही; आठवडे बाजार भरला असताना जमावाकडून हे कृत्य घडलेले आहे. हल्लेखोर केवळ याच गावातील नसावे. पण त्यांची ओळख पटविणे, शोधणे, अटक करणे आणि नंतर न्यायालयात खटला चालविणे या प्रक्रियेत मोठा कालावधी लागणार आहे. पण अजाणतेपण, समूह मानसिकता, अंधश्रध्दा, अफवा याच्या परिपाकातून घडलेल्या या घटनेची शिक्षा हे गाव त्या दिवसापासूनच भोगतेय...