शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

भेदरलेले राईनपाडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 12:17 IST

मुले पळविणारी टोळी समजून सोलापूर जिल्ह्यातील पाच भिक्षेकऱ्यांना  जमावाने ठार करण्याचे राक्षसी क्रौर्य  ज्या गावात घडले ते राईनपाडा देशभर गाजले.

मिलिंद कुलकर्णी मुले पळविणारी टोळी समजून सोलापूर जिल्ह्यातील पाच भिक्षेकऱ्यांना  जमावाने ठार करण्याचे राक्षसी क्रौर्य  ज्या गावात घडले ते राईनपाडा देशभर गाजले.  धुळ्यापासून सुमारे ९० कि.मी.अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील राईनपाडा १२ दिवसांनंतरही भेदरलेले आहे. गावातील सुमारे ३० पुरुषांना यापूर्वीच अटक झालेली आहे; तर अटकेच्या भीतीने बहुसंख्य पुरुष मंडळी गाव सोडून पळाली आहे. ५०-६० घरांचा हा पाडा १ जुलैला जसा होता, तसाच आज ‘फ्रीज’ झाल्यासारखा आहे.  घटनेच्यावेळी रस्त्यावर पडलेल्या दुचाकी तशाच आहेत. सहा आसनी रिक्षा रस्त्यात वाट अडवून उभी आहे. प्रत्येक घरात केवळ महिला, लहान मुले आहेत. कोणतेही वाहन किंवा अनोळखी माणूस गावात आला तरी भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले जाते. विचारपूस करायची तर भाषेची अडचण जशी येते तशी भीती आहेच.  बाहेरील माणूस म्हणजे पोलीसच अशी भीती महिला व मुलांमध्ये घर करुन बसली आहे. रस्त्यांवर शुकशुकाट कायम असतो. गायी, म्हशी, बकºया, कोंबड्या हे पशुधन बेवारशासारखं गावभर फिरत आहे. चांगला पाऊस झाल्याने भात आणि नागली लागवडीची योग्य वेळ असताना एखादा-दुसरा शेतकरी शेतात अथवा रस्त्यावर बैलजोडीसह दिसतो. 

आदिवासी प्रकल्प विभागाची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा याठिकाणी आहे. ३०० विद्यार्थ्यांची निवासी तर १०० विद्यार्थ्यांची अनिवासी शिक्षणाची व्यवस्था याठिकाणी होते. लगतच्या १५-२० पाड्यांमधून आदिवासी मुले शिक्षणासाठी येतात. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील  गावात आहे. ५५ मुलांची पटसंख्या आहे. मात्र दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ७० आणि १७ मुले हजर होती. ‘त्या’ घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. आम्ही पाड्यांवर शिक्षक पाठवून समजावून सांगतो आहोत, हळूहळू पालक मुलांना पाठवू लागले आहेत, असे मुख्याध्यापक कुंवर म्हणाले. 

पोलीस दलाची व्हॅन मुख्य रस्त्यावर उभी आहे तर गावाच्या नावाच्या पाटीला पोलिसांचा सूचना फलक लावलेला आहे. १ जुलैनंतर त्या गावात झालेले हे दोन बदल...बाकी इतर पाड्यांसारखेच हे पाडे आहे. आठवड्यानंतर बससेवा सुरु झाली असली तरी प्रतिसाद कमीच आहे. रविवारी भरणारा आठवडे बाजार यावेळी भरलाच नाही. 

केंद्रीय संरक्षणराज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार डी.एस.अहिरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी याठिकाणी येऊन गेले. ज्या ग्रामपंचायत कार्यालयात पाच जणांना ठार केले; त्या खोलीला आता कुलूप आहे. दरवाजाची अगदी तळाची पाटी तुटलेली आहे; खिडक्यांची दारेही तुटलेली आहे...राक्षसीवृत्ती जागृत झालेल्या माणसांच्या क्रोैर्याच्या खुणा ती खोली अजून धारण करुन आहे...८-१० कि.मी. अंतरावर रोहोड या पाड्यात पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दूरक्षेत्र या घटनेनंतर उभारण्यात आले आहे. एक फौजदार व चार पोलीस कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले आहे. पण हे कर्मचारी सध्या आरोपींच्या शोधात फिरत आहेत.

राईनपाड्यापासून २० कि.मी.अंतरावर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याची हद्द सुरु होते. काही आरोपींना याच तालुक्यात पकडले आहे. काही आरोपी लगतची राज्ये मध्य प्रदेश आणि गुजराथमध्ये पळाली असल्याच्या संशयामुळे पोलिसांची पथके तेथे जाऊन शोध घेत आहे. 

देश व राज्यातील प्रसारमाध्यमांमध्ये राईनपाडा एकदम चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे राष्टÑीय क्रमांक सहा वरील दहिवेल या गावापासून २० कि.मी.अंतरावरील दुर्गम भागातील या गावात दूरचित्रवाहिन्यांच्या ओबी व्हॅन, पत्रकार, छायाचित्रकारांचा राबता सुरुच आहे. काकर्दा ग्रुप ग्रामपंचायतीतील हे एक गाव; परंतु आश्रमशाळेच्या तीन मजली इमारतीमुळे एखाद्या मोठ्या गावात आल्यासारखे वाटते. सगळे आधी आश्रमशाळेत पोहोचतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे ‘त्या’ घटनेविषयी चौकशी करतात. मुले आधीच भेदरलेली आणि त्यात अशा आक्रमणामुळे पार गोंधळून जातात.  राक्षसी क्रौर्याचे समर्थन कुणीच करणार नाही; आठवडे बाजार भरला असताना जमावाकडून हे कृत्य घडलेले आहे. हल्लेखोर केवळ याच गावातील नसावे. पण त्यांची ओळख पटविणे, शोधणे, अटक करणे आणि नंतर न्यायालयात खटला चालविणे या प्रक्रियेत मोठा कालावधी लागणार आहे. पण अजाणतेपण, समूह मानसिकता, अंधश्रध्दा, अफवा याच्या परिपाकातून घडलेल्या या घटनेची शिक्षा हे गाव त्या दिवसापासूनच भोगतेय...