शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

संवाद कायम ठेवायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 03:22 IST

म्हणूनच नैराश्याचे भूत मनावर बसले की आत्महत्येचा विचार येतो आणि कोणताही विचार न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, आत्महत्या हाच शेवटचा पर्याय खरंच असतो का?

-डॉ. राजेंद्र बर्वे‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे,’ असे कवी मंगेश पाडगावकर यांनी जीवनाविषयी फार सुंदर शब्दांत लिहून ठेवले आहे. जीवन सुंदर आहे आणि ते सुंदरपणे जगायला पाहिजे, असे जेव्हा वाटते, तेव्हा नैराश्य खूप लांब पळून गेलेले असते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे नैराश्य आपली पाठ सोडत नाही, असं उगाच आपल्याला वाटते आणि माणसे या मानसिक आजारात नैराश्याच्या गर्तेत सापडतात. त्यातूनच आयुष्याकडे बघण्याची नकारात्मक भावना तयार होते. सध्याच्या पिढीला संघर्ष म्हणजे भीतीचे ओझे वाटू लागते आणि म्हणूनच नैराश्याचे भूत मनावर बसले की आत्महत्येचा विचार येतो आणि कोणताही विचार न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, आत्महत्या हाच शेवटचा पर्याय खरंच असतो का?आज दहशतवादापेक्षाही भेसूर अशी समस्या आपल्या सगळ्यांमध्ये श्वास घेत आहे ती म्हणजे आत्महत्या. दरवर्षी जगात आठ लाखांहून अधिक आत्महत्या होतात, असे आकडे सांगत असले तरी अशा गंभीर समस्येकडे सहज दुर्लक्ष केले जात आहे. ‘डिप्रेशन’ किंवा ‘नैराश्य’ हा मानसिक आजार आहे आणि त्यावर उपचार आहेत. मात्र, मुळात आजार म्हणून नैराश्येकडे पाहण्याची आपली मानसिकता नाही. भाव-भावनांनी आपले जग व्यापलं आहे. नैराश्य, औदासीन्य यांचे प्रमाण वाढत चालले आहे. आक्रमकता, विवशता, अलिप्तता, विसंवाद या विविध रूपांत त्याचे पडसाद आपल्या जीवनावर पडत असतात. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती यातनामय, व्याकुळ आणि असहाय्य अशी होते. मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्तीला योग्यवेळी, योग्य उपचार न मिळाल्याने आजार वाढत जाऊन त्याचा शेवट आत्महत्येसारख्या घटनेत होत असतो.

त्यातच आत्महत्या करण्याच्या मानसिकतेकडे विकृती म्हणून न पाहता एक मानसिक त्रास म्हणून समाजाने पाहिले पाहिजे. अतिशय असहाय्य, कोणीच मदत करू शकणार नाही, कुठलाच मार्ग उपलब्ध नाही, अशावेळी या निर्णयापर्यंत ती व्यक्ती कशी पोहोचते, हे समजावून घेणे अशावेळी जास्त गरजेचे आणि आवश्यक आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती लेचीपेची आहे, कमजोर आहे, कमकुवत आहे असे मानणे चुकीचे आहे. ती व्यक्ती एका विशिष्ट स्थितीला पोहोचलेली असते. ‘पळवाट किंवा सत्यापासून दूर जाण्याचा मार्ग’ अशा शब्दांत आत्महत्येची सर्रास केली जाणारी व्याख्या करण्याइतपत ते सोपे, सहज नसतेच. त्या स्थितीमध्ये दोन प्रकारच्या भावना त्या व्यक्तीच्या मनात असतात. ‘फ्लाईट’ म्हणजे त्या परिस्थितीतून पळ काढणे किंवा ‘फाईट’ म्हणजे परिस्थितीचा सामना करणे. अशात जर दोन्ही प्रतिसाद त्या व्यक्तीला देता आले नाहीत, तर तिसरा प्रतिसाद उमटतो तो म्हणजे या सगळ्यांचा शेवट.मुळात आत्महत्या या गरीब-श्रीमंत अशा सर्व वर्गांमध्ये होत असतात. आत्महत्येचा विचार हा मेंदूतील जैव रासायनिक बदल असतो. त्याक्षणी त्या व्यक्तीला तातडीने मदत मिळणे गरजेचे असते. मग ती व्यक्ती शेतकरी असो वा उद्योगपती..! समाजमनाच्या मानसिक स्वास्थ्याची पडझड होण्यामध्ये सामाजिक दडपणही तितकेच जबाबदार आहे. आपला आपल्याशी असणारा संवाद जेव्हा तुटतो, तेव्हा स्वत:ला कमी लेखणारा, आपल्यातीलच दोषांवर टीका करणारा त्याविषयी प्रचंड नकारात्मक होतो आणि तुकोबा म्हणतात तसे, ‘आपुलाची वाद आपणाशी’ अशी अवस्था होते. अशा परिस्थितीचे आणि त्या व्यक्तीच्या मानसिकतेचे लवकरात लवकर निदान होणे गरजेचे आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे असे विचार मनात येऊ लागल्यानंतर तत्काळ उपचारासाठी पुढाकार घेतला पाहिजे, म्हणजे हेल्पलाईन मिळायला हवी. अर्थातच त्या व्यक्तीला पुढाकार घेऊन त्याला मदत करण्यासाठी कुणीतरी असणे गरजेचे आहे. आत्महत्या करणाºया प्रत्येकाला जगायचे असतेच. त्या अखेरच्या क्षणीदेखील आशेचा सूक्ष्म किरण हवासा वाटतो. दु:खाच्या यातायातीत आपण एकटे नाही, हा विचार मनाला आधार देतो. नैराश्य हा अत्यंत गुंतागुंतीचा आजार किंवा मनोवस्था आहे. त्यामुळे त्या अवस्थेतून बाहेर पाडण्यासाठी त्याचे योग्यवेळी निदान व्हायला हवे आणि त्यावर उपचारही.
आपल्या आयुष्यात असंख्य ताण-तणाव असतात. ते सांभाळणे, त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. मनात निर्माण झालेले हे तणाव साचत गेले की, त्याचे रूपांतर चिंता, काळजी, अस्वस्थता यात होते; म्हणूनच वेळच्या वेळी अशा भावनांचा निचरा करता आला पाहिजे. सध्या स्वस्थपणे स्वत:शी विचार करण्यासही आपल्याला वेळ नाही. हा मनाशी मनाचा संवाद घडणे खूप गरजेचे आहे. हे मनाचे संतुलन राखले पाहिजे. वेळेचे व्यवस्थापन करून एकमेकांना आनंद वाटेल, असा संवाद साधायला हवा. ताण-तणाव हा आजच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. दु:ख नसेल तर आनंदाचा आस्वादही घेता येणार नाही. फक्त हे दु:ख मनाला किती लावून घ्यायचे, याचा तारतम्याने विचार करायला हवा आणि त्याकरिता स्वत:साठी दिवसातील काही मिनिटे राखून ठेवायला हवीत तसेच सामाजिक बांधीलकी जपायला हवी आणि संवाद कायम ठेवायला हवा इतकंच काय ते...!शेवटी लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे आत्महत्या हा मानसिक आजाराच्या हिमनगस्वरूपी आकाराचा फक्त एकदशांश भाग असतो. बाकीचे नऊदशांश जगामध्ये आपल्यातच असतात आणि अशांपर्यंत आपण पोहोचायला हवे, त्यांना विश्वासाने व्यक्त व्हायला त्यांना वेळ, संधी दिली पाहिजे...!(मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई)

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य