शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंचा अजेंडा भाजपचा, पण विरोधकांचा कोणता? अन् संजय राऊतांना सगळे कसे विसरले?

By यदू जोशी | Updated: August 26, 2022 07:29 IST

एकनाथ शिंदेंसमोर भाजपपेक्षा मोठे होण्याचे टार्गेट दिसत नाही. सध्यातरी शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचे ट्युनिंग फर्स्ट क्लास आहे!

यदु जोशीवरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

एकनाथ शिंदेंसमोर भाजपपेक्षा मोठे होण्याचे टार्गेट दिसत नाही. सध्यातरी शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे ट्युनिंग फर्स्ट क्लास आहे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा कुठलाही अजेंडा नाही. साधारणतः राजकीय नेता हा त्याच्या पक्षाचा अजेंडा चालवतो. शिंदे यांच्याकडे पूर्ण मालकी असलेला कोणताही पक्ष सध्यातरी नाही. शिवसेनेच्या मालकीचे प्रकरण न्यायालयात आणि निवडणूक आयोगात आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून किंवा दूरदृष्टीतून अजेंडा तयार होत असतो; पण शिंदे यांच्याकडे तोदेखील सध्या दिसत नाही. त्यामुळे भाजपचा अजेंडा राबविणे हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त दिसते. आणीबाणीतील बंदीवानांना मानधन पुन्हा सुरू करणे, थेट नगराध्यक्ष आणि थेट सरपंच निवडीचा निर्णय, बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती ही त्याचीच काही योजनांना गती देत मोदीमंत्राचा उच्चारही पुढच्या काळात नित्यनियमाने होत राहील. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला भाजपपेक्षा मोठे व्हावेसे वाटत होते आणि दोघांमधील संघर्षांचा मुख्य बिंदू तोच होता.

दरदिवशी कटकट करणारे ठाकरे नकोत म्हणून तर भाजपने शिंदेंना जवळ केले. डोकेदुखीच्या हिंदुत्वापेक्षा सहाकार्याचे हिंदुत्व भाजपने निवडले. शिंदेंसमोर भाजपपेक्षा मोठे होण्याचे टार्गेट दिसत नाही. शिंदे यांचा स्वतःचा अजेंडा भविष्यात येईल आणि तो भाजपला मान्य नसेल तरच दोहोंमध्ये कटूता येऊ शकेल. सध्या मात्र हनिमून पिरियड सुरू आहे. शिंदे फडणवीस यांचे ट्युनिंग फर्स्ट क्लास आहे. मुख्यमंत्र्यांवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी फडणवीस घेत आहेत.

विधानसभेतील पहिल्याच भाषणात शिंदे बोलले तेव्हा त्यांचे दमदार भाषण हे अपवाद राहील, असे मानणाऱ्यांचा अंदाज चुकला आहे. याही अधिवेशनात शिंदे यांनी विरोधकांना बरोबर टार्गेट करत बंदे मे दम है, हे दाखवले; पण विरोधकांचे काय? विरोधकांच्या आग्रही भूमिकेमुळे सभागृहाचे कामकाज बंद पडले, विरोधक हौद्यात जाऊन बसले, असे एकदाही झाले नाही. पहिल्याच अधिवेशनात सरकारला सहकार्याची भूमिका दिसली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृह एकदाही डोक्यावर घेतले गेले नाही. नवीन सरकारला ग्रेस पिरियड दिला पाहिजे, हे मान्य; पण संजय राठोड, अब्दुल सत्तार आदींबाबतची अभययोजना आणण्याचे कारण काय होते? आघाडीची एकत्रित रणनीतीच दिसत नाही.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून ठाकरे सेनेला घेरण्याचे काम काँग्रेसच्या आमदारांनी केले, अन्य मुद्द्यांवरही मतभेद दिसले, तथापि पन्नास खोके, एकदम ओक्के' या विधानसभेच्या पायऱ्यांवरील घोषणाबाजीतून शिंदेसेनेला बदनाम करण्याची संधी मात्र विरोधकांनी चांगलीच साधली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपापली स्पेस शोधत आहेत. एकत्रितपणे स्पेस निर्माण करण्याची त्यांची मानसिकता नाही. ठाकरे सरकारच्या काळात भाजपच्या आमदारांना निधी मिळत नव्हता; पक्षाचे आमदार फडणवीसांकडे जायचे, फडणवीस त्यांना सांगायचे, कळ सोसा! लाचार होण्याचे कारण नाही, आपलाही दिवस येईल।

या अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार राजीनामा उद्धवजींच्या खिशात ज्या पद्धतीने शिंदे-फडणवीसांकडे फायली घेऊन जात होते, त्यावरून कळ सोसण्याची त्यांची तयारी नाही आणि त्यांना तसे सांगणारा नेताही नाही, हेच सिद्ध होते.राऊतांच्या तपाचे फळमहाविकास आघाडी सरकारच्या शिल्पकारांपैकी एक असलेले खा. संजय राऊत यांच्या अटकेवरून एका चकार शब्दाचाही आवाज ठाकरेसेना किंवा काँग्रेस, राष्ट्रवादीने विधिमंडळात काढला नाही. राऊत यांच्या तपाला छान फळ मिळाले. त्यांचे आमदार बंधू सुनील सभागृहात का आले नाहीत, हे तपासले तर खरे कारण कळेल. संजय राऊत यांना सगळ्यांनी वाऱ्यावर का सोडले असावे? ईडीच्या डायनॉसोरला तर ते घाबरले नसतील?

सध्या विरोधकांमध्ये बहुतेक सगळेच आपापल्या बचावात लागले आहेत. त्यांना राऊतांच्या उपकारांची आठवण कशी येणार?  मोठे साहेब त्यांच्या घरी जाणार होते, एखाद्या फायलीने अडवले असेल. महाविकास आघाडीतील जे मंत्री पत्रकारांकडे ढुंकूनही बघत नव्हते, एखाद्याकडे बघितले तर तो सोन्याचा होईल, अशी भीती त्यांना वाटत होती, ते बऱ्यापैकी जमिनीवर आल्यासारखे वाटत आहेत. या बदलाचे मात्र स्वागत!

भाजपचा वॉचटॉवर मुंबईतभाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश यांचे मुख्यालय आता मुंबई केले आहे. याचा अर्थ पक्षश्रेष्ठींच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याचा थेट वॉच आता महाराष्ट्र भाजपवर असेल. तसे शिव प्रकाश यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्राबाहेरही असेल; पण दिल्लीत येणाऱ्या रिपोर्टिंगवर श्रेष्ठींना फिडबॅक देणे आणि मुंबईत बसून स्वतः माहिती घेऊन रिपोर्टिंग करणे यात फरक पडणारच. श्रेष्ठींचे एक वॉचटॉवर मुंबईत आले आहे. होशियार | चंद्रशेखर बावनकुळेजी।

राजीनामा उद्धवजींच्या खिशातभाजप-शिवसेनेचे सरकार असताना शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरायचे. एका मंत्र्याने तर एकदा राजीनाम्याचा कागद खरंच खिशातून काढून पत्रकारांना दाखवला होता. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हाच म्हणजे २९ जूनला आमदारकीचाही राजीनामा देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती; पण तो त्यांनी अद्याप दिलेला नाही. परवा ते विधानभवनात गेले तेव्हा त्यांनी हजेरी बुकात सही केली.

जाता जाताशेवटी महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडे असलेले पीए, पीएस, ओएसडी भाजपच्या मंत्र्यांनी घ्यायचे नाहीत, असा निर्णय झाला म्हणतात. बोटावर मोजण्याइतक्या दोन-तीन लोकांचे नुकसान झाले पण जुने पापी पुन्हा दिसणार नाहीत हेही बरेच म्हणायचे! त्यांना ठेवून घ्या म्हणून भाजपचे दोन मंत्री फडणवीसांकडे खेटे घालत असल्याची माहिती आहे. एका मंत्र्यांकडे गेलात तर ते बाळासाहेब थोरातांचेच ऑफीस वाटते. जुन्या पीएसला वाचविण्याची महा (जन) धडपड सुरू आहेच. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस