शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एकाधिकारी सरन्यायाधीश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 00:32 IST

भारतीय राज्यघटनेत सरन्यायाधीशांचे नेमके स्थान काय? त्यांचे अधिकार काय? उच्च घटनात्मक पदाची बूज राखून सरन्यायाधीश नेहमीच आपले अधिकार वापरताना सचोटीने आणि निष्पक्षतेने वागतील, असा विश्वास टाकला जाऊ शकतो का? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचा काटेकोर आधार न घेता सोईस्करपणावर भर दिल्याचे दिसते.

भारतीय राज्यघटनेत सरन्यायाधीशांचे नेमके स्थान काय? त्यांचे अधिकार काय? उच्च घटनात्मक पदाची बूज राखून सरन्यायाधीश नेहमीच आपले अधिकार वापरताना सचोटीने आणि निष्पक्षतेने वागतील, असा विश्वास टाकला जाऊ शकतो का? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचा काटेकोर आधार न घेता सोईस्करपणावर भर दिल्याचे दिसते. ‘भारताचे सरन्यायाधीश’ असे पदनाम असले तरी देशातील संपूर्ण न्यायव्यवस्थेचे प्रमुखत्व राज्यघटनेने त्यांना दिलेले नाही. राज्यघटना एवढेच म्हणते की, देशाचे जे सर्वोच्च न्यायालय असेल त्यात सरन्यायाधीशांसह इतर न्यायाधीश असतील. इतर न्यायाधीश व सरन्यायाधीश यांचे नाते श्रेष्ठ-कनिष्ठाचे नाही. न्यायिक कामाच्या बाबतीत सरन्यायाधीशांना समकक्षांमधील प्रथम (‘फर्स्ट अमंग्न्स्ट इक्वल्स’) असे म्हटले जाते. म्हणजे न्यायनिवाडा करताना ते इतर न्यायाधीशांप्रमाणेच एक असतात. न्यायालयीन प्रकरणांच्या निवाड्यासाठी खंडपीठे स्थापन करणे व विविध प्रकारच्या प्रकरणांचे खंडपीठांमध्ये वाटप करणे याचे अधिकार सरन्यायाधीशांना दिलेले आहेत. या बाबतीत सरन्यायाधीशांना ‘मास्टर आॅफ दी रोस्टर’ असे म्हटले जाते. कामाचे वाटप करणे व न्यायाधीश निवडीच्या बाबतीत राष्ट्रपतींना सल्ला देणे ही दोन्ही सरन्यायाधीशांची प्रशासकीय कामे आहेत. ही दोन्ही कामे करताना सरन्यायाधीशांचे अधिकार काय यासंबंधीच्या वादांवर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल परस्परविरोधी आहेत. राष्ट्रपतींना सल्ला देण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना एकट्याला नाही. त्यांनी अन्य चार ज्येष्ठ न्यायाधीशांना सोबत घेऊन हे काम करायला हवे, असे म्हणून न्यायालयाने ‘कॉलेजियम’ची व्यवस्था प्रस्थापित केली. हे करताना सरन्यायाधीशांच्या सचोटी व निष्पक्षतेवर शंका घेतली गेली. दुसरीकडे ‘मास्टर आॅफ दी रोस्टर’ म्हणून सरन्यायाधीशांचे अधिकार ठरविताना याच्या नेमके विरुद्ध गृहितक वापरले गेले. कामाचे वाटप व खंडपीठांची रचना करताना सरन्यायाधीश पक्षपाताने किंवा पूर्वग्रहाने वागतील, अशी शंकासुद्धा घेतली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने ठरविले. वस्तुत: सरन्यायाधीशांनी पदाची शपथ घेताना त्या पदाची जबाबदारी न्यायबुद्धीने पार पाडीन, अशी ग्वाही दिलेली असताना असा भेदभाव करण्याची गरज नाही. पण ते केले गेले. कारण न्यायाधीश निवडीचे निर्णायक अधिकार न्यायसंस्थेकडे घेण्यासाठी ‘कॉलेजियम’ आणले गेले व त्यात सरन्यायाधीशांच्या अधिकारांचाही संकोच केला गेला. अशीच ‘कॉलेजियम’ची पद्धत कामाचे वाटप व खंडपीठांची रचना यासाठीही वापरावी, यासाठीची याचिका फेटाळताना मात्र तसे केले तर अनागोंदी माजेल, असा बागुलबुवा उभा केला गेला. आधी स्वत:च दिलेला निकाल घशात अडकण्याची वेळ आल्यावर एका बोेटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्याची हातचलाखी करण्याखेरीज पर्यायही नव्हता. पण हे करताना न्यायालयास मोठी कसरत करावी लागली. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ‘मास्टर आॅफ दी रोस्टर’ म्हणून सर्वाधिकार देणारा एक निकाल पूर्वी दिला गेला होता. तेच तत्त्व सरन्यायाधीशांनाही लागू करण्यासाठी पाच, तीन व दोन न्यायाधीशांच्या खंडपीठांनी त्याच क्रमाने निकाल दिले. अशा प्रकारे ‘मास्टर आॅफ दी रोस्टर’चा एकाधिकार सरन्यायाधीशांना बहाल केला गेला. राज्यघटनेचा नेमका अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे. तो वापरताना राज्यघटना हवी तशी वाकवून सर्वोच्च न्यायालयाने स्वत:चे व सरन्यायाधीशांचे अधिकार बळकट करून घेतले, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnewsबातम्या