शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एकाधिकारी सरन्यायाधीश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 00:32 IST

भारतीय राज्यघटनेत सरन्यायाधीशांचे नेमके स्थान काय? त्यांचे अधिकार काय? उच्च घटनात्मक पदाची बूज राखून सरन्यायाधीश नेहमीच आपले अधिकार वापरताना सचोटीने आणि निष्पक्षतेने वागतील, असा विश्वास टाकला जाऊ शकतो का? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचा काटेकोर आधार न घेता सोईस्करपणावर भर दिल्याचे दिसते.

भारतीय राज्यघटनेत सरन्यायाधीशांचे नेमके स्थान काय? त्यांचे अधिकार काय? उच्च घटनात्मक पदाची बूज राखून सरन्यायाधीश नेहमीच आपले अधिकार वापरताना सचोटीने आणि निष्पक्षतेने वागतील, असा विश्वास टाकला जाऊ शकतो का? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचा काटेकोर आधार न घेता सोईस्करपणावर भर दिल्याचे दिसते. ‘भारताचे सरन्यायाधीश’ असे पदनाम असले तरी देशातील संपूर्ण न्यायव्यवस्थेचे प्रमुखत्व राज्यघटनेने त्यांना दिलेले नाही. राज्यघटना एवढेच म्हणते की, देशाचे जे सर्वोच्च न्यायालय असेल त्यात सरन्यायाधीशांसह इतर न्यायाधीश असतील. इतर न्यायाधीश व सरन्यायाधीश यांचे नाते श्रेष्ठ-कनिष्ठाचे नाही. न्यायिक कामाच्या बाबतीत सरन्यायाधीशांना समकक्षांमधील प्रथम (‘फर्स्ट अमंग्न्स्ट इक्वल्स’) असे म्हटले जाते. म्हणजे न्यायनिवाडा करताना ते इतर न्यायाधीशांप्रमाणेच एक असतात. न्यायालयीन प्रकरणांच्या निवाड्यासाठी खंडपीठे स्थापन करणे व विविध प्रकारच्या प्रकरणांचे खंडपीठांमध्ये वाटप करणे याचे अधिकार सरन्यायाधीशांना दिलेले आहेत. या बाबतीत सरन्यायाधीशांना ‘मास्टर आॅफ दी रोस्टर’ असे म्हटले जाते. कामाचे वाटप करणे व न्यायाधीश निवडीच्या बाबतीत राष्ट्रपतींना सल्ला देणे ही दोन्ही सरन्यायाधीशांची प्रशासकीय कामे आहेत. ही दोन्ही कामे करताना सरन्यायाधीशांचे अधिकार काय यासंबंधीच्या वादांवर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल परस्परविरोधी आहेत. राष्ट्रपतींना सल्ला देण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना एकट्याला नाही. त्यांनी अन्य चार ज्येष्ठ न्यायाधीशांना सोबत घेऊन हे काम करायला हवे, असे म्हणून न्यायालयाने ‘कॉलेजियम’ची व्यवस्था प्रस्थापित केली. हे करताना सरन्यायाधीशांच्या सचोटी व निष्पक्षतेवर शंका घेतली गेली. दुसरीकडे ‘मास्टर आॅफ दी रोस्टर’ म्हणून सरन्यायाधीशांचे अधिकार ठरविताना याच्या नेमके विरुद्ध गृहितक वापरले गेले. कामाचे वाटप व खंडपीठांची रचना करताना सरन्यायाधीश पक्षपाताने किंवा पूर्वग्रहाने वागतील, अशी शंकासुद्धा घेतली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने ठरविले. वस्तुत: सरन्यायाधीशांनी पदाची शपथ घेताना त्या पदाची जबाबदारी न्यायबुद्धीने पार पाडीन, अशी ग्वाही दिलेली असताना असा भेदभाव करण्याची गरज नाही. पण ते केले गेले. कारण न्यायाधीश निवडीचे निर्णायक अधिकार न्यायसंस्थेकडे घेण्यासाठी ‘कॉलेजियम’ आणले गेले व त्यात सरन्यायाधीशांच्या अधिकारांचाही संकोच केला गेला. अशीच ‘कॉलेजियम’ची पद्धत कामाचे वाटप व खंडपीठांची रचना यासाठीही वापरावी, यासाठीची याचिका फेटाळताना मात्र तसे केले तर अनागोंदी माजेल, असा बागुलबुवा उभा केला गेला. आधी स्वत:च दिलेला निकाल घशात अडकण्याची वेळ आल्यावर एका बोेटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्याची हातचलाखी करण्याखेरीज पर्यायही नव्हता. पण हे करताना न्यायालयास मोठी कसरत करावी लागली. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ‘मास्टर आॅफ दी रोस्टर’ म्हणून सर्वाधिकार देणारा एक निकाल पूर्वी दिला गेला होता. तेच तत्त्व सरन्यायाधीशांनाही लागू करण्यासाठी पाच, तीन व दोन न्यायाधीशांच्या खंडपीठांनी त्याच क्रमाने निकाल दिले. अशा प्रकारे ‘मास्टर आॅफ दी रोस्टर’चा एकाधिकार सरन्यायाधीशांना बहाल केला गेला. राज्यघटनेचा नेमका अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे. तो वापरताना राज्यघटना हवी तशी वाकवून सर्वोच्च न्यायालयाने स्वत:चे व सरन्यायाधीशांचे अधिकार बळकट करून घेतले, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnewsबातम्या