शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

श्रीमंतांच्या महालांमध्ये उपाशी राबणारे स्वस्तातले घरकामगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:15 IST

आज जागतिक मानवी तस्करी विरोध दिवस! त्यानिमित्ताने भारतातल्या शहरी श्रीमंतांच्या घरात उभ्या राहिलेल्या एका शोषण-जाळ्याचे अस्वस्थ करणारे सत्य !

- अनिल पांडे

दिल्लीतील एका प्लेसमेंट एजन्सीच्या तावडीतून दहा अल्पवयीन आदिवासी मुलींना सोडवण्यात आल्याच्या ताज्या बातमीने महानगरातील लोकांना धक्काच बसला असेल; परंतु महानगरांमध्ये विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या प्लेसमेंट एजन्सीजमुळे निर्माण झालेल्या उपद्रवाचे हे केवळ हिमनगाचे टोक आहे. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये चांगले जीवन, अधिक पैसा आणि शिक्षणाचे आमिष दाखवून आदिवासी मुलींना जाळ्यात ओढले जाते. या मुली पुढे देशाच्या महानगरांमधल्या श्रीमंत कुटुंबांमध्ये ‘कामासाठी’ पाठवल्या जातात. ही एक प्रकारची मानवी तस्करीच आहे. दिल्लीत सुटका झालेल्या मुलींपैकी बहुतेकजणी बारा ते पंधरा वयोगटातील होत्या. स्वतंत्र बंगले, गगनचुंबी अपार्टमेंट्स, दुकाने आणि स्पा अशा ठिकाणी त्यांना कामाला लावले जाते. ही नवी जीवनशैली त्यांना भूलवणारी असते. आपल्या आयुष्याचे कल्याण झाले, अशा भावनेने श्रीमंत घरांमध्ये कामाला लागणाऱ्या या मुली पुढे आपोआप शोषणाच्या सापळ्यात अडकत जातात. त्यांच्याकडून अठरा-अठरा तास काम करून घेतले जाते. पुरेसे अन्न, कपडे न देता कित्येक महिने विनावेतन राबवले जाते आणि काही वेळा तर मालकांच्या बलात्कारातून या मुली गर्भवतीही होतात.

नोएडातील  एक उदाहरण पाहू. गेल्या सात वर्षांपासून घरकाम करणाऱ्या सतरा वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात एका ८१ वर्षांच्या माणसाला नुकतीच अटक करण्यात आली. ‘पोक्सो’ कायद्याखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. २०२० मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून असेच एक प्रकरण पुढे आले होते. तेथे सोळा वर्षांच्या मोलकरणीवर मालक सातत्याने बलात्कार करत होता. त्या मुलीला त्याच्यापासून झालेले मूलही त्याने मारून टाकले होते. कित्येक महिने तो तिला वेतनही देत नव्हता. आपल्याला खुल्या बाजारात एखाद्या वस्तूप्रमाणे विकले जात आहे, याची कल्पना या अशिक्षित मुलींना नसते. तुम्हाला आज आहे त्यापेक्षा चांगले जीवन जगता येईल, असे आमिष दाखवून त्यांना घराबाहेर काढले जाते. घराबाहेर काढल्यानंतर त्यांचा ‘जगण्याचा नैसर्गिक हक्क’ हिरावला जातो, हे त्यांना समजत नाही. पती-पत्नी नोकरी करत असलेल्या चौकोनी कुटुंबात घरकाम करण्यासाठी अशा मुलींची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याने त्यांची तस्करी करणाऱ्या ठेकेदारांना आयती बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पैसेवाल्या, धनाढ्य कुटुंबांच्या सेवेसाठी अत्यंत स्वस्तात ते या मुलींची सेवा उपलब्ध करून देतात. वाढत्या शहरीकरणाबरोबरच हा प्रश्न वेगाने वाढतो आहे आणि त्या तुलनेत तो सोडवण्यासाठी होणारे प्रयत्न अपुरे आहेत. 

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राज्य पोलीस आणि मानवी तस्करी विरोधी विभाग, त्याचबरोबर सामाजिक संघटना या प्रकारच्या तस्करीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असतात; पण आजार खूपच मोठा असल्याने हे प्रयत्न अपुरे पडतात. न्यायसंस्थेनेही या समस्येमध्ये लक्ष घालताना त्यासाठीचे कायदे अपुरे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. मुले आणि प्रौढ महिला यांची घरकामासाठी भरती करणाऱ्या संस्थांचे नियमन तसेच प्लेसमेंट एजन्सींच्या नोंदणीला वेग देणे असे काही उपायही न्यायालयाने सुचवले. त्याला अनुसरून दिल्ली पोलिसांनी एक परिपत्रक काढून घरगड्यांची माहिती गोळा केली; परंतु ते काम पुढे गेले नाही. भारतभर पसरलेल्या प्लेसमेंट एजन्सीजच्या कामाचे नियमन करण्यासाठी कायदे अपुरे असणे, हेच या मुलींच्या तस्करीला कारणीभूत आहे. मुलांच्या हितासाठी काम करणारी सामाजिक संघटना असल्याचे दाखवून प्लेसमेंट एजन्सींना तस्करीसाठी मदत केली जाते, तीही रोखणे गरजेचे आहे. गतवर्षी महिला बालकल्याण मंत्रालयाने मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयकाचा मसुदा प्रकाशित केला. या विधेयकाने संबंधित कायद्याची कक्षा अधिक व्यापक करण्याचे सूतोवाच केले, ही एक चांगली सुरुवात म्हणता येऊ शकेल.- अनिल पांडे, संचालक, इंडिया फॉर चिल्ड्रन

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनLabourकामगारbusinessव्यवसाय