शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

देशी दारू दुकानाची बदलती वेळ धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:53 AM

देशी दारू दुकानाची वेळ सकाळी १० ऐवजी सकाळी ८ वाजता करण्याचा निर्णय सरकारच्या गृहविभागाने घेतला. पूर्वी ही वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी होती. या निर्णयाचे अतिशय वाईट परिणाम शहरी व ग्रामीण भागात होणार आहेत.

- हेरंब कुलकर्णी  (सामाजिक कार्यकर्ते)

देशी दारू दुकानाची वेळ सकाळी १० ऐवजी सकाळी ८ वाजता करण्याचा निर्णय सरकारच्या गृहविभागाने घेतला. पूर्वी ही वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी होती. या निर्णयाचे अतिशय वाईट परिणाम शहरी व ग्रामीण भागात होणार आहेत. कदाचित काहींना दोन-चार तास वेळ पुढे-मागे झाल्याने काय फरक पडतो, असे वाटेल; पण त्याचे खूप गंभीर परिणाम होणार आहेत.देशी दारूचा ग्राहक हा अजूनही गरीब आणि कष्टकरी वर्ग आहे. लाखो गरीब कुटुंबे देशी दारूचे बळी आहेत. ही दारू शरीराला घातक असते. या निर्णयापूर्वी सकाळी दुकाने उशिरा उघडत असल्याने दारूबाज लोक किमान सकाळी मजुरीला व आपल्या कामधंद्यांना जात होते आणि दारू प्यायची असेल तर काम संपल्यावर रात्री पीत होते. त्यामुळे किमान दिवसभर काम तरी होत होते. सरकारच्या या निर्णयाने आता दारू पिणारे अगदी सकाळीच दारू प्यायला जातील. दारू जास्त प्यायले तर झिंगून कामाला जाण्याची शक्यता कमी होईल. दारू प्यायलेल्या मजुराला, कर्मचाऱ्याला दिलेले कामही नीट होणार नाही. तो जर मजूर असेल तर कदाचित त्या दिवशी कोणी कामही देणार नाही. गरीब कुटुंबातील दारू पिणारे तर दारू पिऊन घरी जाऊन सकाळीच घरी धिंगाणा, शिवीगाळ सुरू करतील. आजही गरीब कुटुंबात महिला आणि मुलांना संध्याकाळी मारहाण, शिवीगाळ सुरू असते. पण किमान सकाळ तरी त्यातून मुक्त असते. त्यामुळे महिला सकाळी काम करू शकतात आणि मुले अभ्यास करतात. पण आता हा घरातील गोंधळ सकाळीच सुरू होईल. तेव्हा कौटुंबिक स्वास्थ्य घालवणारा आणि लोकांच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करणारा हा निर्णय ठरणार आहे.हे सगळे सरकारी अधिकारी, मंत्री यांना माहीत नसेल असे थोडेच आहे का? असे गरिबांचे जीवन अधिक केविलवाणे करणारे निर्णय सरकार का घेते आहे? तर त्याचे कारण दारू विक्री जास्त होण्यासाठी दारू दुकानदार आणि सरकार यात कोट्यवधी रुपयांचे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची उघड चर्चा होते आहे तेच महत्त्वाचे कारण आहे. दुसरे कारण वारेमाप आश्वासन पूर्ण करण्यासाठी कर्जबाजारी सरकारला उत्पादन शुल्क अबकारी कर हेच महत्त्वाचे उत्पन्न उरले आहे. निवडणूक वर्षात नवीन करही लावायचे नाहीत. त्यामुळे दारूतून उत्पन्न वाढवायचे असे धोरण आहे. घरपोच दारू ही घोषणा तो अंदाज घेण्यासाठीच होती. जनक्षोभ पाहून सरकारने सारवासारव केली. ते जमेना म्हणून आता दुकाने २४ तास उघडी करण्याच्या दिशेने सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक दडपणाने आता देशी दारूचे परवाने दिले जात नाहीत. हा सरकारचा नाइलाज आहे. तेव्हा आता आहे त्याच दुकानांतून जास्तीत जास्त महसूल काढण्यासाठी ती दुकाने जास्तीत जास्त वेळ उघडी ठेवायची असे धोरण आहे. त्या धोरणाची ही सुरुवात आहे म्हणून त्याला विरोध करायला हवा.दारूबंदीची जेव्हा जेव्हा मागणी होते तेव्हा तेव्हा दारूबंदी करणार नाही, पण आम्ही दारू नियंत्रण करू, अशी सरकारची दारूविषयक भूमिका आहे. जर ही भूमिका असेल तर टप्प्याटप्प्याने दारूचा पुरवठा कमी कमी होईल अशीच धोरणे असली पाहिजेत. दारूची उपलब्धता जितकी कमी तितके व्यसनाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नियंत्रणे वाढवत नेली पाहिजेत. इथे सरकारचा उलट प्रवास आहे. दारू सहज उपलब्ध कशी होईल असेच सरकारचे प्रयत्न आहेत. केवळ महसूल वाढविण्यासाठी गरीब कुटुंबांना अधिक दारिद्र्याकडे ढकलणारा हा निर्णय आहे.