शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

देशी दारू दुकानाची बदलती वेळ धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:54 IST

देशी दारू दुकानाची वेळ सकाळी १० ऐवजी सकाळी ८ वाजता करण्याचा निर्णय सरकारच्या गृहविभागाने घेतला. पूर्वी ही वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी होती. या निर्णयाचे अतिशय वाईट परिणाम शहरी व ग्रामीण भागात होणार आहेत.

- हेरंब कुलकर्णी  (सामाजिक कार्यकर्ते)

देशी दारू दुकानाची वेळ सकाळी १० ऐवजी सकाळी ८ वाजता करण्याचा निर्णय सरकारच्या गृहविभागाने घेतला. पूर्वी ही वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी होती. या निर्णयाचे अतिशय वाईट परिणाम शहरी व ग्रामीण भागात होणार आहेत. कदाचित काहींना दोन-चार तास वेळ पुढे-मागे झाल्याने काय फरक पडतो, असे वाटेल; पण त्याचे खूप गंभीर परिणाम होणार आहेत.देशी दारूचा ग्राहक हा अजूनही गरीब आणि कष्टकरी वर्ग आहे. लाखो गरीब कुटुंबे देशी दारूचे बळी आहेत. ही दारू शरीराला घातक असते. या निर्णयापूर्वी सकाळी दुकाने उशिरा उघडत असल्याने दारूबाज लोक किमान सकाळी मजुरीला व आपल्या कामधंद्यांना जात होते आणि दारू प्यायची असेल तर काम संपल्यावर रात्री पीत होते. त्यामुळे किमान दिवसभर काम तरी होत होते. सरकारच्या या निर्णयाने आता दारू पिणारे अगदी सकाळीच दारू प्यायला जातील. दारू जास्त प्यायले तर झिंगून कामाला जाण्याची शक्यता कमी होईल. दारू प्यायलेल्या मजुराला, कर्मचाऱ्याला दिलेले कामही नीट होणार नाही. तो जर मजूर असेल तर कदाचित त्या दिवशी कोणी कामही देणार नाही. गरीब कुटुंबातील दारू पिणारे तर दारू पिऊन घरी जाऊन सकाळीच घरी धिंगाणा, शिवीगाळ सुरू करतील. आजही गरीब कुटुंबात महिला आणि मुलांना संध्याकाळी मारहाण, शिवीगाळ सुरू असते. पण किमान सकाळ तरी त्यातून मुक्त असते. त्यामुळे महिला सकाळी काम करू शकतात आणि मुले अभ्यास करतात. पण आता हा घरातील गोंधळ सकाळीच सुरू होईल. तेव्हा कौटुंबिक स्वास्थ्य घालवणारा आणि लोकांच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करणारा हा निर्णय ठरणार आहे.हे सगळे सरकारी अधिकारी, मंत्री यांना माहीत नसेल असे थोडेच आहे का? असे गरिबांचे जीवन अधिक केविलवाणे करणारे निर्णय सरकार का घेते आहे? तर त्याचे कारण दारू विक्री जास्त होण्यासाठी दारू दुकानदार आणि सरकार यात कोट्यवधी रुपयांचे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची उघड चर्चा होते आहे तेच महत्त्वाचे कारण आहे. दुसरे कारण वारेमाप आश्वासन पूर्ण करण्यासाठी कर्जबाजारी सरकारला उत्पादन शुल्क अबकारी कर हेच महत्त्वाचे उत्पन्न उरले आहे. निवडणूक वर्षात नवीन करही लावायचे नाहीत. त्यामुळे दारूतून उत्पन्न वाढवायचे असे धोरण आहे. घरपोच दारू ही घोषणा तो अंदाज घेण्यासाठीच होती. जनक्षोभ पाहून सरकारने सारवासारव केली. ते जमेना म्हणून आता दुकाने २४ तास उघडी करण्याच्या दिशेने सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक दडपणाने आता देशी दारूचे परवाने दिले जात नाहीत. हा सरकारचा नाइलाज आहे. तेव्हा आता आहे त्याच दुकानांतून जास्तीत जास्त महसूल काढण्यासाठी ती दुकाने जास्तीत जास्त वेळ उघडी ठेवायची असे धोरण आहे. त्या धोरणाची ही सुरुवात आहे म्हणून त्याला विरोध करायला हवा.दारूबंदीची जेव्हा जेव्हा मागणी होते तेव्हा तेव्हा दारूबंदी करणार नाही, पण आम्ही दारू नियंत्रण करू, अशी सरकारची दारूविषयक भूमिका आहे. जर ही भूमिका असेल तर टप्प्याटप्प्याने दारूचा पुरवठा कमी कमी होईल अशीच धोरणे असली पाहिजेत. दारूची उपलब्धता जितकी कमी तितके व्यसनाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नियंत्रणे वाढवत नेली पाहिजेत. इथे सरकारचा उलट प्रवास आहे. दारू सहज उपलब्ध कशी होईल असेच सरकारचे प्रयत्न आहेत. केवळ महसूल वाढविण्यासाठी गरीब कुटुंबांना अधिक दारिद्र्याकडे ढकलणारा हा निर्णय आहे.