शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन : माणसावर सूक्त रचावे... माणसाचेच गाणे गावे माणसाने...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 05:49 IST

भारतीय समाजात जातीला-धर्माला नको तितके महत्त्व आहे

धनाजी कांबळे।    आर्थिक विषमता दाखविणारे सोहळे होत असताना प्रेमविवाहांना म्हणावी तेवढी समाजमान्यता मिळालेली दिसत नाही. कधी जात, तर कधी धर्म आडवा येतो, हे भीषण वास्तव आजही आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला. त्यानंतर, समाजसुधारकांनी जातनिर्मूलनासाठी प्रबोधन केले. त्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते कॉ. शरद पाटील यांनी जातीअंताचा आग्रह धरला. मात्र, आजही जात समाज व्यवस्थेला चिकटून बसलेली आहे. जातपंचायती आजही जिवंत आहेत, हे पुरोगामित्वाचे बिरुद मिरविणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव. आंतरजातीय-धर्मीय विवाह केला, म्हणून आजही दिवसाढवळ्या ‘सैराट’ होत असताना समाज मात्र संवेदनाहीन झालेला दिसतो. अशा वेळी जाती-धर्माची बंधनं तोडून लग्न करू इच्छिणाºया तरुण-तरुणींनी मुक्तपणे सर्वसंमतीने पुढाकार घ्यावा, यासाठी डॉ. गणेश देवी यांनी गांधी जयंतीलाच आवाहन केले होते. देवी यांनीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या, तेव्हा आपले पुरस्कार सरकारला परत केले. पुरस्कारवापसी तिथून सुरू झाली. पुरुषसत्ताक वर्चस्ववादी राष्ट्रवादाच्या उन्मादी आवाजाने सगळे उत्तर भयकंपित असताना त्यांनी दक्षिणायन सुरू केलं. लेखक, कलावंत, विचारवंत यांना त्या चळवळीशी जोडून घेतलं. महात्मा गांधींच्या विचारांशी जोडणारा वर्तमानातला धागा म्हणून देवी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.

भारतीय समाजात जातीला-धर्माला नको तितके महत्त्व आहे. त्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून अनेकांनी वेळोवेळी व्यवस्थेचे कान टोचले आहेत. तरीही आज विज्ञान-तत्रंज्ञान वापरणारे, एरवी पुढारलेले वाटणारे लोकही लग्नाचा विचार करताना, जात-धर्म प्राधान्यक्रमाने पाहतात. अजूनही समाज काय म्हणेल, या भीतिपोटी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करायला अनेक जण कचरतात. इतकेच नाही, तर प्रेमविवाह टिकत नाहीत, अशी प्रौढी मिरविली जाते. भारताकडे राफेल सुपुर्द होत असताना लिंबू-मिरचीचा प्रयोग करणारी कृती विज्ञानालाच आव्हान देणारी असते. अतिप्रगतशील आणि अतिपुरातन अशा या मानसिकतेत देश महासत्ता बनण्याचा मार्ग सुकर होईल की कठीण होईल, हाही प्रश्नच असतो. मात्र, हीच देशाला मागे नेणारी कृती जात-धर्माला चिकटून असलेले लोक करतात. डॉ. देवी यांनी तरुणाईला केलेले हे आवाहन धाडसीच म्हणावे लागेल. मात्र, आठ-दहा दिवसांत तब्बल साडेचार हजारांहून अधिक तरुण मुला-मुलींनी लग्न करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही, असा प्रतिसाद त्यांना दिला आहे. परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील शेकडोंनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत आणि आजही त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.

धार्मिक ध्रुवीकरण होत असतानाच्या काळात त्यांना मिळालेला हा प्रतिसाद आशादायक आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ही मोहीम निश्चितपणे एक प्रायोगिक उपक्रम ठरेल. या विधायक उपक्रमाला समाजाने साथ दिल्यास आॅनर किलिंगचे प्रकार कमी होण्यास मदत होईल. ‘पत्त्यांसारख्या पिसल्या पाहिजेत जाती. कळायलाच नको की, अमक्याची जात कोणती आणि तमक्याचा धर्म कोणता?...’ अशा पद्धतीने प्रतिसाद देणारी पत्रं देवी यांचा उत्साह वाढविणारी आहेत. कोलकाता, दिल्ली, गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील बुलडाणा, नंदूरबार, उस्मानाबाद, गडचिरोली अशा विविध गावांमधून सुमारे ४,५०० तरुणांनी ई-मेल आणि पत्रे पाठविली आहेत. लग्न करताना प्रगल्भ प्रेमामध्ये एकमेकांविषयीची काळजी, जबाबदारी, आदर आणि ज्ञान गरजेचं असतं, जात किंवा धर्म नव्हे, हे पटवून देण्याचा, समाजातील जाती-धर्माच्या कोंडवाड्यांना हादरा देण्याचा गणेश देवी यांचा हा प्रयत्न दिशादर्शक ठरावा.कवी नामदेव ढसाळ त्यांच्या कवितेत म्हणतात...

‘‘आभाळाला आजा आणि जमिनीला आजी मानून,त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे,चंद्रसूर्य फिके पडतील, असे सचेत कार्य करावे,एक तीळ सर्वांनी करंडून खावा,माणसावरच सूक्त रचावे,माणसाचेच गाणे गावे माणसाने...’’

(लेखक लोकमत वृत्त समुहात वरिष्ठ उपसंपादक, आहेत )

टॅग्स :marriageलग्नCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र