शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

दृष्टिकोन : माणसावर सूक्त रचावे... माणसाचेच गाणे गावे माणसाने...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 05:49 IST

भारतीय समाजात जातीला-धर्माला नको तितके महत्त्व आहे

धनाजी कांबळे।    आर्थिक विषमता दाखविणारे सोहळे होत असताना प्रेमविवाहांना म्हणावी तेवढी समाजमान्यता मिळालेली दिसत नाही. कधी जात, तर कधी धर्म आडवा येतो, हे भीषण वास्तव आजही आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला. त्यानंतर, समाजसुधारकांनी जातनिर्मूलनासाठी प्रबोधन केले. त्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते कॉ. शरद पाटील यांनी जातीअंताचा आग्रह धरला. मात्र, आजही जात समाज व्यवस्थेला चिकटून बसलेली आहे. जातपंचायती आजही जिवंत आहेत, हे पुरोगामित्वाचे बिरुद मिरविणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव. आंतरजातीय-धर्मीय विवाह केला, म्हणून आजही दिवसाढवळ्या ‘सैराट’ होत असताना समाज मात्र संवेदनाहीन झालेला दिसतो. अशा वेळी जाती-धर्माची बंधनं तोडून लग्न करू इच्छिणाºया तरुण-तरुणींनी मुक्तपणे सर्वसंमतीने पुढाकार घ्यावा, यासाठी डॉ. गणेश देवी यांनी गांधी जयंतीलाच आवाहन केले होते. देवी यांनीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या, तेव्हा आपले पुरस्कार सरकारला परत केले. पुरस्कारवापसी तिथून सुरू झाली. पुरुषसत्ताक वर्चस्ववादी राष्ट्रवादाच्या उन्मादी आवाजाने सगळे उत्तर भयकंपित असताना त्यांनी दक्षिणायन सुरू केलं. लेखक, कलावंत, विचारवंत यांना त्या चळवळीशी जोडून घेतलं. महात्मा गांधींच्या विचारांशी जोडणारा वर्तमानातला धागा म्हणून देवी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.

भारतीय समाजात जातीला-धर्माला नको तितके महत्त्व आहे. त्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून अनेकांनी वेळोवेळी व्यवस्थेचे कान टोचले आहेत. तरीही आज विज्ञान-तत्रंज्ञान वापरणारे, एरवी पुढारलेले वाटणारे लोकही लग्नाचा विचार करताना, जात-धर्म प्राधान्यक्रमाने पाहतात. अजूनही समाज काय म्हणेल, या भीतिपोटी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करायला अनेक जण कचरतात. इतकेच नाही, तर प्रेमविवाह टिकत नाहीत, अशी प्रौढी मिरविली जाते. भारताकडे राफेल सुपुर्द होत असताना लिंबू-मिरचीचा प्रयोग करणारी कृती विज्ञानालाच आव्हान देणारी असते. अतिप्रगतशील आणि अतिपुरातन अशा या मानसिकतेत देश महासत्ता बनण्याचा मार्ग सुकर होईल की कठीण होईल, हाही प्रश्नच असतो. मात्र, हीच देशाला मागे नेणारी कृती जात-धर्माला चिकटून असलेले लोक करतात. डॉ. देवी यांनी तरुणाईला केलेले हे आवाहन धाडसीच म्हणावे लागेल. मात्र, आठ-दहा दिवसांत तब्बल साडेचार हजारांहून अधिक तरुण मुला-मुलींनी लग्न करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही, असा प्रतिसाद त्यांना दिला आहे. परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील शेकडोंनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत आणि आजही त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.

धार्मिक ध्रुवीकरण होत असतानाच्या काळात त्यांना मिळालेला हा प्रतिसाद आशादायक आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ही मोहीम निश्चितपणे एक प्रायोगिक उपक्रम ठरेल. या विधायक उपक्रमाला समाजाने साथ दिल्यास आॅनर किलिंगचे प्रकार कमी होण्यास मदत होईल. ‘पत्त्यांसारख्या पिसल्या पाहिजेत जाती. कळायलाच नको की, अमक्याची जात कोणती आणि तमक्याचा धर्म कोणता?...’ अशा पद्धतीने प्रतिसाद देणारी पत्रं देवी यांचा उत्साह वाढविणारी आहेत. कोलकाता, दिल्ली, गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील बुलडाणा, नंदूरबार, उस्मानाबाद, गडचिरोली अशा विविध गावांमधून सुमारे ४,५०० तरुणांनी ई-मेल आणि पत्रे पाठविली आहेत. लग्न करताना प्रगल्भ प्रेमामध्ये एकमेकांविषयीची काळजी, जबाबदारी, आदर आणि ज्ञान गरजेचं असतं, जात किंवा धर्म नव्हे, हे पटवून देण्याचा, समाजातील जाती-धर्माच्या कोंडवाड्यांना हादरा देण्याचा गणेश देवी यांचा हा प्रयत्न दिशादर्शक ठरावा.कवी नामदेव ढसाळ त्यांच्या कवितेत म्हणतात...

‘‘आभाळाला आजा आणि जमिनीला आजी मानून,त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे,चंद्रसूर्य फिके पडतील, असे सचेत कार्य करावे,एक तीळ सर्वांनी करंडून खावा,माणसावरच सूक्त रचावे,माणसाचेच गाणे गावे माणसाने...’’

(लेखक लोकमत वृत्त समुहात वरिष्ठ उपसंपादक, आहेत )

टॅग्स :marriageलग्नCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र