शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

दृष्टिकोन : माणसावर सूक्त रचावे... माणसाचेच गाणे गावे माणसाने...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 05:49 IST

भारतीय समाजात जातीला-धर्माला नको तितके महत्त्व आहे

धनाजी कांबळे।    आर्थिक विषमता दाखविणारे सोहळे होत असताना प्रेमविवाहांना म्हणावी तेवढी समाजमान्यता मिळालेली दिसत नाही. कधी जात, तर कधी धर्म आडवा येतो, हे भीषण वास्तव आजही आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला. त्यानंतर, समाजसुधारकांनी जातनिर्मूलनासाठी प्रबोधन केले. त्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते कॉ. शरद पाटील यांनी जातीअंताचा आग्रह धरला. मात्र, आजही जात समाज व्यवस्थेला चिकटून बसलेली आहे. जातपंचायती आजही जिवंत आहेत, हे पुरोगामित्वाचे बिरुद मिरविणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव. आंतरजातीय-धर्मीय विवाह केला, म्हणून आजही दिवसाढवळ्या ‘सैराट’ होत असताना समाज मात्र संवेदनाहीन झालेला दिसतो. अशा वेळी जाती-धर्माची बंधनं तोडून लग्न करू इच्छिणाºया तरुण-तरुणींनी मुक्तपणे सर्वसंमतीने पुढाकार घ्यावा, यासाठी डॉ. गणेश देवी यांनी गांधी जयंतीलाच आवाहन केले होते. देवी यांनीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या, तेव्हा आपले पुरस्कार सरकारला परत केले. पुरस्कारवापसी तिथून सुरू झाली. पुरुषसत्ताक वर्चस्ववादी राष्ट्रवादाच्या उन्मादी आवाजाने सगळे उत्तर भयकंपित असताना त्यांनी दक्षिणायन सुरू केलं. लेखक, कलावंत, विचारवंत यांना त्या चळवळीशी जोडून घेतलं. महात्मा गांधींच्या विचारांशी जोडणारा वर्तमानातला धागा म्हणून देवी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.

भारतीय समाजात जातीला-धर्माला नको तितके महत्त्व आहे. त्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून अनेकांनी वेळोवेळी व्यवस्थेचे कान टोचले आहेत. तरीही आज विज्ञान-तत्रंज्ञान वापरणारे, एरवी पुढारलेले वाटणारे लोकही लग्नाचा विचार करताना, जात-धर्म प्राधान्यक्रमाने पाहतात. अजूनही समाज काय म्हणेल, या भीतिपोटी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करायला अनेक जण कचरतात. इतकेच नाही, तर प्रेमविवाह टिकत नाहीत, अशी प्रौढी मिरविली जाते. भारताकडे राफेल सुपुर्द होत असताना लिंबू-मिरचीचा प्रयोग करणारी कृती विज्ञानालाच आव्हान देणारी असते. अतिप्रगतशील आणि अतिपुरातन अशा या मानसिकतेत देश महासत्ता बनण्याचा मार्ग सुकर होईल की कठीण होईल, हाही प्रश्नच असतो. मात्र, हीच देशाला मागे नेणारी कृती जात-धर्माला चिकटून असलेले लोक करतात. डॉ. देवी यांनी तरुणाईला केलेले हे आवाहन धाडसीच म्हणावे लागेल. मात्र, आठ-दहा दिवसांत तब्बल साडेचार हजारांहून अधिक तरुण मुला-मुलींनी लग्न करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही, असा प्रतिसाद त्यांना दिला आहे. परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील शेकडोंनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत आणि आजही त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.

धार्मिक ध्रुवीकरण होत असतानाच्या काळात त्यांना मिळालेला हा प्रतिसाद आशादायक आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ही मोहीम निश्चितपणे एक प्रायोगिक उपक्रम ठरेल. या विधायक उपक्रमाला समाजाने साथ दिल्यास आॅनर किलिंगचे प्रकार कमी होण्यास मदत होईल. ‘पत्त्यांसारख्या पिसल्या पाहिजेत जाती. कळायलाच नको की, अमक्याची जात कोणती आणि तमक्याचा धर्म कोणता?...’ अशा पद्धतीने प्रतिसाद देणारी पत्रं देवी यांचा उत्साह वाढविणारी आहेत. कोलकाता, दिल्ली, गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील बुलडाणा, नंदूरबार, उस्मानाबाद, गडचिरोली अशा विविध गावांमधून सुमारे ४,५०० तरुणांनी ई-मेल आणि पत्रे पाठविली आहेत. लग्न करताना प्रगल्भ प्रेमामध्ये एकमेकांविषयीची काळजी, जबाबदारी, आदर आणि ज्ञान गरजेचं असतं, जात किंवा धर्म नव्हे, हे पटवून देण्याचा, समाजातील जाती-धर्माच्या कोंडवाड्यांना हादरा देण्याचा गणेश देवी यांचा हा प्रयत्न दिशादर्शक ठरावा.कवी नामदेव ढसाळ त्यांच्या कवितेत म्हणतात...

‘‘आभाळाला आजा आणि जमिनीला आजी मानून,त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे,चंद्रसूर्य फिके पडतील, असे सचेत कार्य करावे,एक तीळ सर्वांनी करंडून खावा,माणसावरच सूक्त रचावे,माणसाचेच गाणे गावे माणसाने...’’

(लेखक लोकमत वृत्त समुहात वरिष्ठ उपसंपादक, आहेत )

टॅग्स :marriageलग्नCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र