शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बैल गेला आणि...

By admin | Updated: December 13, 2015 23:02 IST

राजधानी दिल्लीतील प्रदूषण हा काही आजच समोर आलेला आणि भेडसावणारा प्रश्न नव्हे. भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेतील दिल्लीतला सामना खेळण्यास पाहुण्यांनी नकार दिला

राजधानी दिल्लीतील प्रदूषण हा काही आजच समोर आलेला आणि भेडसावणारा प्रश्न नव्हे. भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेतील दिल्लीतला सामना खेळण्यास पाहुण्यांनी नकार दिला त्यालाही आता बरीच वर्षे लोटून गेली. पण आता बहुधा साऱ्यांनाच खडबडून जाग आलेली दिसते. आधी ती दिल्ली सरकारला आली आणि त्या सरकारने नववर्ष दिनापासून सम आणि विषम क्रमांकाच्या मोटारी आलटून पालटून राजधानीच्या रस्त्यांवर धावतील असे फर्मान काढले. त्यावर टीका होऊ लागल्यानंतर हे निर्बंध केवळ सकाळी आठ ते रात्री आठपर्यंतच अंमलात राहतील असे जाहीर केले. दरम्यान बंगळुरूच्या अभियांत्रिकी संस्थेने असे जाहीर केले की, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला स्वयंचलित दुचाकी वाहनेच मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. अर्थात त्यांना दिल्ली बंद करण्याची मागणी मात्र अद्याप कुणी केली नाही. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आणि त्या उपायाने काहीही होणार नाही असा निष्कर्ष काढून एक वेगळाच उपाय सुचविला. या उपायानुसार दिल्ली शहरात एकाही नवीन डिझेल वाहनाची नोंदणी करायची नाही आणि आधीच नोंदणी झालेल्या वाहनांचे दहा वर्षांनंतर केले जाणारे नूतनीकरण पूर्णपणे बंद करायचे. याचा थोडक्यात अर्थ सर्व वाहन प्रकारांमध्ये डिझेलवर चालणारी वाहने सर्वाधिक प्रदूषणकारी असतात. खरे तर हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही. परंतुु नव्वदनंतर देशात मुक्ततेचे जे धोरण अंमलात येण्यास सुरुवात झाली आणि मोटार निर्मिती व्यवसायातील अनेक परदेशी कंपन्या भारतात आल्या तेव्हाच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीवर बंधने लागू करावयास हवी होती. तसे झाले नाही कारण सारे काही मुक्त. मालवाहतुकीसाठी पेट्रोलवर चालणारी वाहने परवडत नसल्याने त्याबाबत काही करता येणे अशक्यच होते. पण किमान आरामदायी मोटारींच्या निर्मितीबाबत तरी हात आखडता घ्यावयास हवा होता. तसे न झाल्याने डिझेलवर चालणाऱ्या ऐषोआरामी गाड्यांचा सुळसुळाट झाला. एकीकडे या मोटारी प्रदूषणात भर टाकीत असतानाच डिझेलवरील अनुदानदेखील फस्त करीत होत्या. आजही डिझेलच्या किमतीची सांगड सरकार आंतरराष्ट्रीय दराशी घालू शकत नाही कारण त्याचा संबंध थेट महागाईशी असतो. डिझेल वाढले तर वाहतुकीचे दर वाढून साऱ्या वस्तू महाग होतात म्हणून तसे करता येत नाही. पण त्याचा गैरफायदा मात्र भलतेच लोक घेत असतात.