शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

Budget 2021: केंद्रीय अर्थसंकल्पाकडून हिमालयाएवढ्या अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 4:12 AM

Budget 2021 update : सोमवारी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जातोय. वित्तमंत्री निर्मला सीतारामन मांडणार असलेल्या या अंदाजपत्रकाची नोंद निश्चितपणे देशाच्या इतिहासात कसोटीच्या क्षणी मांडल्या जाणाऱ्या संकल्पात होईल.

संपूर्ण जगात केवळ भारतच कोरोना प्रतिबंधक दोन लसी जगाला देऊ शकला. लसींच्या उत्पादनात आपण दादा आहोत. माणुसकीसोबतच परराष्ट्र धाेरण व मुत्सद्देगिरी म्हणूनही आशिया खंडातील शेजारी देश तसेच इतरांना आपण मदत करू शकलो, या बाबी किती समाधानाच्या व देशाप्रति अभिमानाने ऊर भरून येण्यासारख्या आहेत ना. नक्कीच ! ...आणि त्याचे कारण आहे गेल्या काही वर्षांमध्ये आपण या क्षेत्रात सतत संशाेधन व विकासावर केंद्रित केलेले लक्ष. जग हादरवून टाकणारे असे एखादे संकट भविष्यात येईल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. पण, तसे झाले आणि या क्षेत्रातील भारताची कामगिरी, दादागिरी जगाला अचंबित करणारी ठरली.हा अभिमानाचा क्षण यासाठी आपण आठवायला हवा की उद्या सोमवारी या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जातोय. वित्तमंत्री निर्मला सीतारामन मांडणार असलेल्या या अंदाजपत्रकाची नोंद निश्चितपणे देशाच्या इतिहासात कसोटीच्या क्षणी मांडल्या जाणाऱ्या संकल्पात होईल. आव्हान मोठे आहे. तशीच अपेक्षाही खूप मोठी आहे. विशेषत: विषाणू संक्रमणाचे महासंकट, त्याचा सामना करताना कस लागलेली आरोग्य व्यवस्था, अडचणीत आलेली उपजीविका आणि सोबतच  एकविसाव्या शतकातील आव्हाने, पायाभूत सुविधा, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती अशा बऱ्याच अपेक्षांचा डोंगर, नव्हे हिमालयच वित्तमंत्री, तसेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारपुढे आहे. तरीही ‘लोकमत’ने केलेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणात नागरिकांनी खूपच माफक अपेक्षा मांडली आहे. किंबहुना केंद्रीय अर्थसंकल्पाप्रति लोक उदासीन आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत काही आमूलाग्र सुधारणा, खासकरून भविष्यातील अशा महामारीच्या संकटाचा विचार करता तिचे बळकटीकरण आणि विषाणू संक्रमणाच्या महासंकटामुळे अडचणीत आलेली उपजीविका, लघु व मध्यमवर्गीयांच्या हातून निसटून गेलेली पोट भरण्याची साधने या पृष्ठभूमीवर, या वर्गाला करप्रणाली तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने काही दिलासा, अशा या प्रातिनिधिक स्वरूपाच्या माफक अपेक्षा आहेत.  विषाणू संसर्गामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रारंभी केंद्र सरकारने जाहीर केलेले वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज, अन्नधान्य वितरण व अन्य मार्गाने लॉकडाऊनग्रस्त जनतेला केलेली मदत व तरीही लाखो स्थलांतरित मजुरांच्या नशिबी आलेली पायपीट, जीवघेण्या हालअपेष्टा, नोकऱ्या जाणे, कोट्यवधींवर बेरोजगाराचे संकट, लघु व मध्यमवर्गीयांचे हाल, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा अर्थसंकल्पात काही प्राधान्यक्रम अपेक्षित असलाच तर तो रोजगार, आरोग्य, शिक्षण हाच असेल. किंबहुना तोच असायला हवा. आर्थिक पाहणी अहवालातही या गरजेचे प्रतिबिंब उमटले आहे.

अपेक्षेनुसार देशाचा विकास दर घटला असला तरी शेतीने अर्थव्यवस्थेला चांगलाच आधार दिल्याचे, यंदाचे वर्ष एक दु:स्वप्न ठरले असताना येत्या आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचे हा अहवाल सांगतो. देशाला, अर्थव्यवस्थेला, झालेच तर आत्ममग्न बनलेल्या मध्यमवर्गीयांना मावळत्या आर्थिक वर्षात शेतीनेच तारले. तरीही नव्या वर्षाचा संकल्प मांडला जात असताना शेती, तिच्याशी संबंधित तीन नवे कायदे, त्यावरून उभे राहिलेले उग्र आंदोलन हेच केंद्रस्थानी असावे, हा निव्वळ दैवदुर्विलास म्हणावा लागेल. या पलीकडे अपेक्षा किंवा अंदाज म्हणून महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे तो बाजारपेठेतील चलनवलन गतिमान ठेवणारा मध्यमवर्ग किंवा मध्यमवर्गीय बनण्याची अपेक्षा बाळगणारा त्यानंतरच्या आर्थिकस्तरातील कुटुंबांचा विचार. या दोन्ही वर्गांनी भरपूर खर्च करावा यासाठीच मध्यंतरी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध केली होती. आता त्या पलीकडे जावे लागेल.वैयक्तिक उत्पन्नावरील करांमध्ये गेल्या काही वर्षांत खऱ्या अर्थाने मध्यमवर्गाला दिलासा देण्यात आलेला नाही. त्याऐवजी काहीतरी तांत्रिक क्लुप्त्या करून त्याचाच प्रचार करण्यात आला. कोरोना संकटाचे दुष्परिणाम आणखी काही वर्षे जाणवणारच आहेत. सरकारी गुंतवणुकीला मर्यादा आहेत. तेव्हा, दीर्घकालीन उपाय म्हणून रोजगारनिर्मितीची अधिक संधी असलेल्या शेती, कृषी प्रक्रिया, औषधोत्पादन, पर्यटन आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तातडीचे उपाय म्हणून बाजारपेठेत अधिक पैसा टाकू शकतील अशा निम्न व मध्यमवर्गाला आरोग्य व शिक्षणाच्या, त्यातही ऑनलाइनसाठी अधिकाधिक सुविधा या मार्गानेच सरकारला जावे लागेल. श्रीमती निर्मला सीतारामन व त्यांच्या सहकाऱ्यांनी असाच विचार केला असेल, अशी आशा बाळगूया!

टॅग्स :budget 2021बजेट 2021Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारत