शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Budget 2020 : शेतकऱ्यांची यंदाही पुन्हा घोर उपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 12:20 IST

नाशवंत शेती उत्पादनांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजनांच्या घोषणा केल्या आहेत.

- सुनील तटकरे

(राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील उपगटनेते)

नाशवंत शेती उत्पादनांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजनांच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणा निश्चितपणे आश्वासक आहेत; परंतु या योजनेची अंमलबजावणी कशी होणार? याबद्दल कोणताही खुलासा या अर्थसंकल्पात नाही. गेल्या सहा वर्षांपासून मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करीत आहे; परंतु प्रत्यक्षात शेतकरी विरोधी धोरणे राबवीत आहे. मोदी सरकारचे हेच धोरण या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानेही शेतकऱ्यांची प्रामुख्याने घोर उपेक्षाच केली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात येईल, असे आश्वासन देऊन मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी व ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या आशेने मोदी सरकारला मते दिली होती; परंतु २०१४-१९ या काळात केंद्र सरकारने फारसे काहीही झालेले नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली. एकट्या महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा ७ हजारांवर पोहोचला आहे. हीच स्थिती इतर राज्यांमधीलसुद्धा आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काही धोरणात्मक बदल होतील, अशी आशा होती; परंतु या आशेवर या अर्थसंकल्पाने पाणी फेरले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी काही योजना निश्चितपणे जाहीर केल्या आहेत. ग्रामीण भागासाठी फलोत्पादनाला चालना देण्यासाठी योजनेची घोषणा झाली आहे, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १६ सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. यात शेतकऱ्यांसाठी काही योजनांचा समावेश केला आहे. शेतकऱ्यांचा त्वरित नाश पावणाऱ्या उत्पादनांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजनांची घोषणा केल्या आहेत. या घोषणा निश्चितपणे आश्वासक आहेत; परंतु या योजनेची अंमलबजावणी कशी होणार? याबद्दल कोणताही खुलासा या अर्थसंकल्पात नाही.

सागरमाळा योजनेचे काय?

महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. काही वर्षांपूर्वी या सरकारने सागरमाळा योजना जाहीर करून समुद्रकिनारपट्टीला लागून असलेल्या भागाचा विकास करण्याचे सूतोवाच केले होते; परंतु दुर्दैवाने या अर्थसंकल्पात सागरमाळा या महत्त्वाकांक्षी योजनेचा उल्लेख झालेला नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळ बोलत होत्या; परंतु या भाषणातून शेतकऱ्यांची घोर उपेक्षा झाली आहे. या घोर उपेक्षेमुळे रोजगार तर निर्माण होणार नाही; परंतु भविष्यात बेरोजगारी मात्र वाढण्याचा धोका आहे.

 

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाFarmerशेतकरीagricultureशेतीsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस