शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

आरक्षण नसल्याने ब्राह्मण जातात विदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 14:22 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अन्य समाजही आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी करू लागला आहे.

- ल. कृ. पारेकर गुरुजीमराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अन्य समाजही आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी करू लागला आहे. त्यात ब्राह्मण समाजालाही आर्थिक निकषावर आरक्षण मिळायला हवे असा सूर लावला जात आहे. ब्राह्मणांनाही आरक्षण हे मिळायले हवे. ते किती टक्के द्यावे हे सरकारने ठरवावे. जर आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचे झाल्यास आताचे आरक्षण रद्द करून पुन्हा नव्याने रचना करावी लागले, पण ते अशक्य आहे. कुठलाही राजकीय पक्ष आर्थिक निकषावर आरक्षण देऊ शकत नाही. इतरांच्या आरक्षणांना धक्का लागू नये म्हणून आर्थिक निकषाचे कारण पुढे केले जात आहे. पण ते दाखवलेले गाजर असेच म्हणावे लागेल.खरं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत संतुलन राखायचे असेल तर राखीव असलेल्यांना तेथेच ठेवावेत त्यांना खुल्या प्रवर्गात आणू नये. शिक्षण, नोकरी अगदी राजकारणासाठी हा निकष लावला गेला पाहिजे. कारण काय होते बरेच जण राखीव कोट्यातून शिक्षण घेतात आणि खुल्या गटातून नोकरी मिळवतात, यातून अडचण होते. राजकारणाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर जर एखादा प्रभाग खुल्या गटासाठी असेल तर तेथे राखीवमधील लोकांनी येऊ नये. तेथे खुल्या गटातील व्यक्तीस उभे करावे. यातून त्यांना राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. हे करायचे असेल तर सर्व राजकीय पक्षांनी मिळून एक ओळीचा ठराव करून तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावा. पण हे कितपत शक्य हे सांगणे कठीण आहे.शहरी भाग सोडल्यास ग्रामीण भागात आजही उत्पन्न हे आठ ते दहा हजारांच्या आसपास आहे. अशा तुटपुंज्या उत्पन्नात खाणारी चार तोंडे असतात. पण अशाही परिस्थितीत ब्राह्मण कधी दुसऱ्यापुढे हात पसरत नाही. उलट तो भिक्षा मागून दुस-यांना आशीर्वादच देत असतो. आज ब्राह्मणांना आरक्षण मिळत नसल्याने अनेक प्रश्न उभे आहेत. त्यातील महत्वाचा म्हणजे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. ब्राह्मणांच्या मुली अन्य समाजातील मुलांशी विवाह करत आहेत. त्यांना माहीत आहे ब्राह्मण मुलाशी लग्न करून आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. अशा या परिस्थितीमुळे कुटुंब संस्था बिघडत चालली असून अशा प्रकारचे विवाह सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नसल्याने घटस्फोटांचे प्रमाणही वाढले आहे.शिक्षणाच्या क्षेत्रातही आरक्षण नसल्याने गरीब घरातील ब्राह्मण मुलांचे नुकसान होत आहे. जास्त गुण मिळवूनही तो आरक्षणाच्या कक्षेत बसत नसल्याने त्याला उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणे अवघड होऊन बसले आहे. मात्र असे असले तरी ब्राह्मणाने कधीही भ्रष्टाचार केला नाही. मुलांचे शिक्षण म्हणा किंवा घरखर्चासाठी कधीही अशा मार्गाचा अवलंब केला नाही. जे भ्रष्टाचार करतात ते ब्राह्मण नाही. अशी मंडळी ही सरकारी कार्यालयात असल्याने कामे वेळेत होत नाही, सरकारी यंत्रणा नीट राबवली जात नाही. एकूण ही परिस्थिती पाहता ब्राह्मण घरातील मुलगा आज परदेशात नोकरी करण्यास प्राधान्य देतो.ही मुले परदेशात जाऊन आपल्या शिक्षणाचा फायदा तेथील देशासाठी करतात. भविष्यातील चित्र पाहता प्रत्येक ब्राह्मणाच्या घरात तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, भरपूर शिका. परदेशात जा, पैसा कमवा आणि आपल्या समाजासाठी पैसे आणा, भले करा अशा आशयाचे फलक लावण्याची वेळ आली आहे. तसे पाहिले गेल्यास ब्राह्मणांची टक्केवारी ही तीन टक्के आहे. म्हणजे तेही एका प्रकारे अल्पसंख्याक आहेत, असे म्हणायला हरकत नाही. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यकाळात ब्राह्मणांनी अन्याय केला असे म्हटले जाते. पण ते कपोलकल्पित आहे. अन्याय झाल्याचा एकतरी पुरावा द्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आरक्षण पाच ते दहा वर्षे द्यावे, असे सांगितले होते. मात्र आज राजकीय पक्षांनी आपली व्होटबँक जाऊ नये म्हणून ते कायम ठेवले आहे.आज प्रत्येक समाजाला आरक्षण हवे आहे. ते न दिल्यास काय होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आरक्षण न दिल्यास दुहेरी नुकसान होते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. आंदोलनात बळी गेलेल्यांना भरपाई द्यावी लागते. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची मागणी केली जाते. हे सगळे टाळण्यासाठी सरकारने सरसकट सर्वांना आरक्षण देऊन टाकले पाहिजे. राजकारण्यांसाठी सध्या बरे दिवस नाहीत. त्यांनी सावध राहायला हवे.>ब्राह्मणांना आर्थिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण मिळणे कठीण आहे. मात्र शिक्षण, नोकरी यामध्ये ब्राह्मण मुला-मुलींवर अन्याय होत असल्याने अनेक जण विदेशात जातात. परिणामी ब्राह्मणांच्या ज्ञानाचा लाभ त्या देशांना होतो. हे टाळायचे तर अन्य समाजाबरोबरच ब्राह्मणांनाही आरक्षण हवेच.>जातीवाचक टीकेचा त्रासआज सरकारी कार्यालयात एखादी व्यक्ती प्रामाणिक काम करत असेल तर अन्य त्यात आडकाठी करतात. आज ब्राह्मणांनाही जातीवाचक बोलले जाते. पण त्यांच्याकडे कोणतेही अस्त्र नाही. अशा परिस्थितीत ब्राह्मणांनाही एखाद्या कायद्याचा आधार असला पाहिजे.>कर भरूनही फायदा नाहीब्राह्मण सर्वाधिक कर भरतात. मात्र त्याचा फायदा त्यांना होत नाही. या पैशातून अन्य समाजाचा उद्धार होतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे.>मालिका, चित्रपटांचा प्रभावआज ब्राह्मण घरातील मुली अन्य समाजातील मुलांसोबत पळून जाऊन लग्न करू लागल्या आहेत. हा सगळा मालिका, चित्रपटांचा प्रभाव आहे. यातून विवाह संस्था धोक्यात येऊ लागली आहे. पुढचामागचा कसालाही विचार या मुली करीत नाही. पश्चाताप झाल्यावर त्या दु:ख करीत बसतात. मालिका, चित्रपटांतून दाखवले जाते ते खोटे असते, अभिनय असतो हे या मुलींनी समजून घेणे गरजेचे आहे.>सकल ब्राह्मण समाजाने केलेल्या मागण्यासंपूर्ण शिक्षण विनामूल्य करावेमुलामुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृह असावेस्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ किंवा आयोग स्थापन करून वार्षिक ५०० कोटींची तरतूद करावीपुरोहितांना दरमहा ५००० मानधन द्यावेनोकरीमध्ये १० टक्के आरक्षण द्यावेकूळ कायद्यातंर्गत गेलेल्या जमिनी परत करा, मंदिरे परत द्याब्राह्मण समाजाविरोधात लिखाण, अर्वाच्य भाषेत बोलणा-यांना तातडीने अटक करून कारवाई करावीविनातारण कर्ज द्यावे(लेखक : ज्योतिषाचार्य, कथा निरूपणकार आहेत)शब्दांकन : निलेश धोपेश्वरकर

टॅग्स :reservationआरक्षण