शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन : वाचन समृद्धीची रेषा मोठी करणारा ‘बुक मार्च’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 06:11 IST

आजची पिढी पुस्तके व ग्रंथांपासून दुरावत चालली आहे

किरण अग्रवाल

जीवनमूल्यांच्याप्रेरणेचा मार्ग प्रशस्त होतो तो ज्ञानातून. हे ज्ञान मिळवायचे तर त्यासाठी वाचन हवे; पण हल्लीची पिढी नेमक्या या वाचनापासूनच दुरावत चालल्याने ज्ञानाधिष्ठित समाजव्यवस्था साकारण्याबाबत चिंता व्यक्त केली जाणे स्वाभाविक ठरावे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ओढावणाऱ्या ताणतणावातून मुक्ती मिळवायची तर वाचनच अधिक श्रेष्ठ व सोयीस्कर ठरावे. कारण वाचनातून जे जीवनदर्शन घडते, जो आत्मविश्वास लाभतो वा जी प्रगल्भता येते ती अन्य कोणत्याही मार्गाने मिळू शकत नाही. म्हणूनच बालवयापासून वाचनाचे संस्कार होणे गरजेचे बनले आहे. याकरिता अभिनवतेने काही उपक्रमांची योजना करीत वाचन चळवळ वाढविण्यासाठी परिश्रम घेण्याची गरज आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या नाशकातून त्यांच्याच प्रतिष्ठानच्या साहाय्याने सुरू झालेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाकडेही त्याच दृष्टीने बघता यावे.

आजची पिढी पुस्तके व ग्रंथांपासून दुरावत चालली आहे. यामागे बदलती जीवनशैली नक्कीच आहे; परंतु या नवीन शैलीतील काही साधने मात्र अशी आहेत, जी वाचनाला पूरक म्हणता यावीत. विशेषत: तरुण पिढीच्या हाती आलेल्या अद्ययावत भ्रमणध्वनीत जणू ग्रंथालयच सामावलेले असते. त्यामुळे हवे ते पुस्तक मिळविण्यासाठी किंवा त्यासाठी ग्रंथालये धुंडाळण्यात जी एक हुरहुर असे व ते मिळाल्यावर लाभणारा अवर्णनीय आनंद, तो लयास जाऊ पाहतो आहे. ग्रंथालये वाढत आहेत; पण हाती पुस्तक घेऊन वाचण्याऐवजी नवीन पिढीचा ओढा ‘आॅनस्क्रीन’ वाचनाकडे वाढला आहे, परंतु त्यात वाचनाचा तो आनंद नाही व ते समाधानही; हे नक्की. म्हणूनच वाचकांच्या हाती व त्यांच्या दारी ग्रंथ पोहोचविण्याची व्यवस्था या योजनेद्वारे केली जात असते.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या साहाय्याने विनायक रानडे या ग्रंथप्रेमीने सुरू केलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाने दशकपूर्ती साधली असून, जेथे जेथे मराठी वाचक आहे, तेथे तेथे ग्रंथ त्यांच्या दारी पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. वाचन संस्कृती वाढविण्याकरिता हातभार लावू इच्छिणाऱ्यांकडून आपल्या वाढदिवसानिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानला जी यथायोग्य देणगी दिली जाते त्या देणगीतून पंचवीस पुस्तकांची ग्रंथपेटी साकारून ती ठिकठिकाणी विनामोबदला उपलब्ध करून दिली जाते. शहरी वस्त्या, औद्योगिक वसाहती, आदिवासी पाडे, शाळा-महाविद्यालये, पोलीस स्थानके, रुग्णालयातील रुग्ण व तुरुंगामधील बंदिवानांसाठीदेखील या गं्रथपेट्या उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची एक लाखाहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध झाली असून, महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक व भारताबाहेरही दुबई, नेदरलँड, अ‍ॅटलांटा, फिनलॅण्ड, आॅस्ट्रेलिया, मॉरिशस, सिंगापूर आदी पंधरा देशांमध्ये या योजनेचा विस्तार झाला आहे. मराठी साहित्याला सातासमुद्रापार नेऊन पोहोचविण्याचे कार्य या उपक्रमातून घडून येत असून, वाचन संस्कृती वर्धिष्णू राहण्याच्या दृष्टीने ही योजना मैलाचा दगड ठरत असल्याचे त्यास लाभणाºया प्रतिसादावरून लक्षात येते.विशेष म्हणजे, ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रम राबवताना यंदा दशकपूर्तीनिमित्त ‘बुक मार्च’चा अभिनव प्रयोग केला गेला. कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून निघालेल्या या ‘मार्च’ने कुसुमाग्रज स्मारकापर्यंतचा पल्ला गाठत वाचन वाढविण्याबद्दलची जनजागृती घडवून आणली. खरे तर असला बुक मार्च काढला जात असताना वाचकांची अभिरुची वाढविणारे सकस, दर्जेदार असे साहित्य येते आहे काय, असाही प्रश्न उपस्थित व्हावा. साहित्यकृतींच्या आवृत्तींवर आवृत्ती काढण्याचे भाग्य किती लेखकांना लाभते? यापूर्वी कसदार लेखनाला प्रकाशात आणणाºया प्रकाशन संस्थांची संख्या मोजकीच होती. आता गल्लीबोळात झालेल्या प्रकाशन संस्थांकडून ‘कुणीही या आणि पुस्तक छापून घ्या’, अशी योजना राबविली जात असल्याने भारंभर पुस्तकांचा मारा वाचकांवर होतो आहे. अर्थात, वाचक चोखंदळ असतो. त्यामुळे जे सकस आणि कसदार असते तेच टिकते. पुस्तके मोठ्या प्रमाणातबाजारात येत असली तरी त्यामुळे वाचक चळवळ जोमात आली, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आजही वाचकांकडून छावा, स्वामी, ययाती यासारख्या पुस्तकांना मागणी असते. याचा अर्थ जे चांगले, दर्जेदार आहे, तेच खपते. बुक मार्चच्या माध्यमातून कुसुमाग्रज प्रतिष्ठानने हेच दर्शविले. अशा उपक्रमांनी नव्या पिढीची वाचनक्षमता तर वाढावीच शिवाय, माय मराठीविषयी गोडीही वाढावी. त्यामुळे यातून वाचन समृद्धीची रेषा आणखी मोठी होण्याची अपेक्षा करता यावी.(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)