शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

शहाणपण भस्मसात

By admin | Updated: April 12, 2016 04:06 IST

‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण दिवसेंदिवस कशी निरर्थक ठरत चालली आहे आणि ज्याला ठेच लागते तो स्वत:देखील शहाणा होईलच याची कशी खात्री राहिलेली नाही, याचे जिवंत

‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण दिवसेंदिवस कशी निरर्थक ठरत चालली आहे आणि ज्याला ठेच लागते तो स्वत:देखील शहाणा होईलच याची कशी खात्री राहिलेली नाही, याचे जिवंत उदाहरण म्हणजे केरळात रविवारी पहाटे लागलेली अत्यंत उग्र आणि भीषण आग. या दुर्घटनेत शंभराहून अधिक लोक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर चारशेहून अधिक जखमी झाले. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना तातडीने तिथे जावे लागावे यातच या दुर्घटनेचे गांभीर्य दिसून येते. आता या अपघाताची किंवा स्पर्धेतून अथवा राजकीय आणि जातीय ईर्ष्येमधून निर्माण झालेल्या घटनेची म्हणे उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. पण चौकशी कशाकशाची करणार हा एक प्रश्नच आहे. केरळच्या कोलम जिल्ह्यातील पुत्तिंगल येथील देवी मंदिरात साजऱ्या होत असलेल्या वार्षिक उत्सवाच्या वेळी शोभेच्या दारुची जी आतषबाजी केली गेली, तिच्यातून संबंधित दुर्घटना घडली. आतषबाजीसाठी जमा केलेल्या शोभेच्या दारुपैकी जवळजवळ सत्तर टक्के दारु संपुष्टात आल्यानंतर एक ठिणगी दारुच्या उर्वरित साठ्यावर जाऊन पडली आणि सारीकडे हाहाकार माजला. वार्षिक उत्सवासाठी आणि सदर आतषबाजी बघण्यासाठी हजारो लोक तिथे जमले होते आणि त्यामुळेच मृत आणि जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली. आतषबाजी हादेखील वार्षिक सोहळ्याचाच अविभाज्य भाग मानला जात असला तरी अशा प्रसंगी होणाऱ्या आतषबाजीतील धोके लक्षात घेऊन कोलमच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्याने आतषबाजीस परवानगी नाकारली होती. परंतु हा अधिकारी धर्माने मुस्लीम असल्याने त्याच्या निर्णयास काहींनी धार्मिक रंग फासण्याचा प्रयत्न केला. मंदीर व्यवस्थापन समितीला आतषबाजी हवीच असल्याने व सध्या केरळात निवडणुकीचे वातावरण असल्याने परवानगी नाकारली जाण्याच्या निर्णयाला राजकीय रंगदेखील प्राप्त झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे कोलमचे पोलीस आयुक्त म्हणतात की मंदीर व्यवस्थापन समितीने त्यांची दिशाभूल करताना आतषबाजीस अनुमती मिळाल्याचे खोटेच सांगितले. वस्तुत: समितीने जे सांगितले त्याची खातरजमा करुन घेणे आयुक्ताना अवघड नव्हते पण त्यांनी ते न करता समितीने जे सांगितले त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. परंतु त्याहूनही दुर्दैवाचा भाग पुढेच आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्याने आतषबाजीस परवानगी नाकारण्यापूर्वी संबंधित तहसीलदाराकडून अहवाल मागविला होता. या अहवालात तहसीलदाराने स्पष्टपणे असे म्हटले होते की आयोजक केवळ आतषबाजी करणार नसून आतषबाजीची स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे व ती संपूर्ण परिसराच्या दृष्टीने धोकेदायक आहे. तरीही देवस्थान समितीच्या लोकानी आपल्याला तोंडी अनुमती मिळाल्याचा दावा केला आणि आतषबाजीची स्पर्धा चालू केली, त्यावेळी पोलीस तिथे जातीने हजर होते. पण त्यांनी ती रोखण्याऐवजी तिचा ‘आनंद’ घेण्यात धन्यता मानली. म्हणूनच चौकशी कशाकशाची करणार?