शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

शहाणपण भस्मसात

By admin | Updated: April 12, 2016 04:06 IST

‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण दिवसेंदिवस कशी निरर्थक ठरत चालली आहे आणि ज्याला ठेच लागते तो स्वत:देखील शहाणा होईलच याची कशी खात्री राहिलेली नाही, याचे जिवंत

‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण दिवसेंदिवस कशी निरर्थक ठरत चालली आहे आणि ज्याला ठेच लागते तो स्वत:देखील शहाणा होईलच याची कशी खात्री राहिलेली नाही, याचे जिवंत उदाहरण म्हणजे केरळात रविवारी पहाटे लागलेली अत्यंत उग्र आणि भीषण आग. या दुर्घटनेत शंभराहून अधिक लोक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर चारशेहून अधिक जखमी झाले. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना तातडीने तिथे जावे लागावे यातच या दुर्घटनेचे गांभीर्य दिसून येते. आता या अपघाताची किंवा स्पर्धेतून अथवा राजकीय आणि जातीय ईर्ष्येमधून निर्माण झालेल्या घटनेची म्हणे उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. पण चौकशी कशाकशाची करणार हा एक प्रश्नच आहे. केरळच्या कोलम जिल्ह्यातील पुत्तिंगल येथील देवी मंदिरात साजऱ्या होत असलेल्या वार्षिक उत्सवाच्या वेळी शोभेच्या दारुची जी आतषबाजी केली गेली, तिच्यातून संबंधित दुर्घटना घडली. आतषबाजीसाठी जमा केलेल्या शोभेच्या दारुपैकी जवळजवळ सत्तर टक्के दारु संपुष्टात आल्यानंतर एक ठिणगी दारुच्या उर्वरित साठ्यावर जाऊन पडली आणि सारीकडे हाहाकार माजला. वार्षिक उत्सवासाठी आणि सदर आतषबाजी बघण्यासाठी हजारो लोक तिथे जमले होते आणि त्यामुळेच मृत आणि जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली. आतषबाजी हादेखील वार्षिक सोहळ्याचाच अविभाज्य भाग मानला जात असला तरी अशा प्रसंगी होणाऱ्या आतषबाजीतील धोके लक्षात घेऊन कोलमच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्याने आतषबाजीस परवानगी नाकारली होती. परंतु हा अधिकारी धर्माने मुस्लीम असल्याने त्याच्या निर्णयास काहींनी धार्मिक रंग फासण्याचा प्रयत्न केला. मंदीर व्यवस्थापन समितीला आतषबाजी हवीच असल्याने व सध्या केरळात निवडणुकीचे वातावरण असल्याने परवानगी नाकारली जाण्याच्या निर्णयाला राजकीय रंगदेखील प्राप्त झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे कोलमचे पोलीस आयुक्त म्हणतात की मंदीर व्यवस्थापन समितीने त्यांची दिशाभूल करताना आतषबाजीस अनुमती मिळाल्याचे खोटेच सांगितले. वस्तुत: समितीने जे सांगितले त्याची खातरजमा करुन घेणे आयुक्ताना अवघड नव्हते पण त्यांनी ते न करता समितीने जे सांगितले त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. परंतु त्याहूनही दुर्दैवाचा भाग पुढेच आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्याने आतषबाजीस परवानगी नाकारण्यापूर्वी संबंधित तहसीलदाराकडून अहवाल मागविला होता. या अहवालात तहसीलदाराने स्पष्टपणे असे म्हटले होते की आयोजक केवळ आतषबाजी करणार नसून आतषबाजीची स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे व ती संपूर्ण परिसराच्या दृष्टीने धोकेदायक आहे. तरीही देवस्थान समितीच्या लोकानी आपल्याला तोंडी अनुमती मिळाल्याचा दावा केला आणि आतषबाजीची स्पर्धा चालू केली, त्यावेळी पोलीस तिथे जातीने हजर होते. पण त्यांनी ती रोखण्याऐवजी तिचा ‘आनंद’ घेण्यात धन्यता मानली. म्हणूनच चौकशी कशाकशाची करणार?