शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

भाजपाचा घातक अजेंडा

By admin | Published: December 22, 2014 5:40 AM

राज्यसभेत गोंधळ चालूच आहे आणि त्याला विरोधी पक्ष जबाबदार नसून मोदी सरकारच जबाबदार आहे. या सत्रात एका आठवड्यात दहा विधेयके संमत

सीताराम येचुरी,मार्क्सवादी नेतेराज्यसभेत गोंधळ चालूच आहे आणि त्याला विरोधी पक्ष जबाबदार नसून मोदी सरकारच जबाबदार आहे. या सत्रात एका आठवड्यात दहा विधेयके संमत करण्यासाठी सहकार्य करून विरोधकांनी अभूतपूर्व काम केले आहे. सभागृहात गोंधळ चालू असतानाच विनियोजन विधेयकावर शिक्कामोर्तब करण्याचे काम करून सभागृहाने संसदीय लोकशाहीच्या परंपरेचे पालन केले आहे. सरकारने हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केल्यामुळे सभागृहात गोंधळ माजला. सरकारने या अजेंड्याखाली आपली दोन धोरणे राबविण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे धार्मिक अल्पसंख्यांचे, विशेषत: मुस्लिमांचे आणि ख्रिश्चनांचे सामुदायिक हिंदू धर्मांतर (घरवापसी) आणि दुसरे म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी शिक्षणसंस्थांमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त ह्यउत्तम कारभार दिनह्ण साजरा करण्याचा निर्णय.नवा सक्तीचे धर्मांतरबंदी कायदा मान्य करण्यास विरोधी पक्ष तयार आहे की नाही असा सवाल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करून विरोधी पक्षांना आव्हान दिले. सक्तीच्या धर्मांतर बंदीची तरतूद भारतीय संविधानात आणि दंडविधानात आहे, त्यामुळे अशा कायद्याची गरज नाही याकडे विरोधकांनी सरकारचे लक्ष वेधले पण सरकारने त्याची दखल घेतली नाही.भाजपाचे मंत्री आणि खासदार संविधानातील हमी आणि दंडविधान या दोन्हीचे उल्लंघन करीत असतील तर त्यांना शिक्षा केलीच पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आणि तसे आश्वासन पंतप्रधानांनी द्यावे असा आग्रह धरण्यात आला. सध्या घडणाऱ्या अशा सर्व घटनांमागे विकास आणि समृद्धीच्या गोंडस नावाखाली राबविला जाणारा मोदी सरकारचा जातीय धु्रवीकरणाचा घातक अजेंडा आहे. आकाशात सोडण्यात येणाऱ्या विकासाच्या तथाकथित फुग्यांना कोसळणाऱ्या जीडीपीने आणि कोसळणाऱ्या औद्योगिक आणि उत्पादन आकड्यांनी चांगलीच टाचणी लावली आहे. लागवडीखाली येणारी जमीन कमी होत असल्याने कृषी उत्पादनही घटत आहे, त्याचबरोबर लोकांची क्रयशक्ती वाढवून अंतर्गत मागणी वाढल्याशिवाय आर्थिक परिस्थिती सुधारणे अशक्य आहे असे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी म्हटले आहे. देशात धार्मिक धु्रवीकरण वाढत असतानाच लोकांचे राहणीमान घसरत आहे. त्यामुळे लोकांत असंतोष पसरत आहे. परिणामी त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी ख्रिसमस दिनाच्या दिवशी ह्यउत्तम कारभार दिनह्ण पाळण्याची घोषणा दिली आहे. त्याचा झारखंडच्या निवडणुकांत फायदा होईल असे गणित मांडण्यात आले आहे. असेच गणित उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत लव्ह जिहादचा नारा देऊ न मांडण्यात आले होते. वोट बँकेच्या राजकारणाचा हा अत्यंत वाईट प्रकार आहे.देशाने सुसंस्कृतपणाकडे केलेल्या प्रगतिशील वाटचालीला अटकाव करून हिंदुत्वाची एकचालकानुवर्ती संस्कृती लादण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारत हा प्रगतिशील संस्कृतीची प्रयोगशाळा आहे ही जगन्मान्य संकल्पना मागे पडत आहे. रवींद्रनाथ ठाकूरांनी भारताच्या या संपन्न वारशाबाबत म्हटले आहे, ह्लआर्य आणि बिगर आर्य, द्रविड आणि चिनी, स्कॅथियन, हून, पठाण आणि मोगल हे सर्व या संस्कृतीत आपली वेगळी ओळख विसरून सामावून गेले आहेत. त्यातून एक वेगळेच रसायन निर्माण झाले आहे आणि ते आहे आजचा भारत.ह्व स्वामी विवेकांनद म्हणतात, बुद्धाने क्रांती केली नसती तर प्रभावशाली उच्च जातींकडून होणाऱ्या अत्याचारांतून खालच्या जातींच्या कोट्यवधी पीडितांची कधीच सुटका झाली नसती. (विवेकानंदांचे कार्य, खंड ४, पृष्ठ ४६२). पुढे ते म्हणतात, या देशात समतेचा संदेश घेऊ न इस्लाम आला. प्रेम हाच धर्म झाला. त्यात वंश, वर्ण किंवा अन्य कशालाही थारा नव्हता. (विवेकानंदांचे कार्य, खंड १, पृष्ठ ४८३). माझ्या मन:चक्षुपुढे असा भारत आहे, ज्याचा मेंदू वेदान्तांनी बनलेला आहे आणि शरीर इस्लामने. (विवेकानंदांचे कार्य, खंड ६, पृष्ठ ४१६). आपण सर्वांनीच स्वामी विवेकानंदांच्या या विचारांना स्वीकारले पाहिजे.परराष्ट्रमंत्री जो राष्ट्रीय ग्रंथ व्हावा अशी मागणी करीत आहेत, त्या भगवत्गीतेमध्येही ह्लभक्त ज्या कुणाची भक्ती श्रद्धेने करतो, त्यात माझे अस्तित्व असतेह्व, असे भगवंताने म्हटले आहे.उज्ज्वल भारतासाठी आणि तेथील जनतेचा चांगल्या जीवनासाठी चालू असलेला लढ्याला बळ देण्यासाठी या संस्कृती विघातक शक्तींशी लढा देणे आता गरजेचे आहे.