शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५२व्या राज्यस्तरीय अधिवेशनातून भाजपाला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:09 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५२वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगावात पार पडले. संस्कारयुक्त व रोजगाराभिमुख शिक्षण हा अधिवेशनाचा प्रमुख विषय होता आणि याच विषयावर तीन दिवस विचारमंथन झाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५२वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगावात पार पडले. संस्कारयुक्त व रोजगाराभिमुख शिक्षण हा अधिवेशनाचा प्रमुख विषय होता आणि याच विषयावर तीन दिवस विचारमंथन झाले. शिक्षणातून रोजगार मिळाला पाहिजे, सध्याच्या शिक्षणातून तो पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने शासनाने आपले शैक्षणिक धोरण बदलावे. इंग्रजांनी आपल्या फायद्यासाठीचे शैक्षणिक धोरण बनविले होते. शिक्षण घेऊन रोजगार मिळत नसेल तर असले शिक्षण काय कामाचे, असा सूर अधिवेशनात उमटला. ‘एकीकडे केवळ होय मी लाभार्थीच्या घोषणा करायच्या अन् दुसरीकडे विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवायचे, हे कसले सरकार अशा शब्दात वक्त्यांनी ‘परिवारा’तील भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य व केंद्र सरकारवर जाहीर सभेत सडकून टीका केली. विद्यार्थ्यांना पूर्वीही शिष्यवृत्तीचा लाभ मिळायचा. परंतु दिरंगाई टाळण्यासाठी ‘आॅनलाइन’ प्रक्रिया सुरू केली, तत्काळ तर दूरच वर्षानुवर्षे शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन अडचणीत आहे. महाविद्यालयांमध्ये होणा-या निवडणुका सरकारने थांबवून ठेवल्या आहेत. राज्यातील वाढलेला भ्रष्टाचार, नक्षलवाद, शासन व प्रशासन यांच्यातील वाढलेली दरी, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, त्यामुळे फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करणारे शासन आहे, अशा शब्दात अधिवेशनात स्पष्ट नाराजी व्यक्त केली. सामान्य चळवळीचा कार्यकर्ता परिषदेच्या निवडणुकीतून पुढे आल्यास राज्यकर्त्यांना त्याचा धोका वाटतो, म्हणून निवडणुका शासनाला नको आहे. मात्र सत्ताधा-यांचे हे मनसुबे उधळून लावू, असा निर्धार व्यक्त करीत विद्यापीठस्तरीय निवडणुकांसाठी ८ व ९ जानेवारी रोजी राज्यभर आंदोलनाचे रणशिंग अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी फुंकण्यात आले. राज्यातील बहुसंख्य वसतिगृहांमध्ये प्रचंड समस्या आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या निकृष्ट दर्जाच्या सोई-सुविधांविरुद्धही अभाविपच्या या अधिवेशनात छात्रशक्ती एकवटली व १ ते ७ फेब्रुवारी असे सप्ताहभर वसतिगृहातील समस्यांसोबत सेल्फी काढण्याचे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठ कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी, सत्र परीक्षा रद्द करावी, त्याऐवजी वार्षिक परीक्षा घ्याव्यात हे ठरावही यावेळी करण्यात आले. एकंदरीत शासनाविषयी तरुणांमध्ये राग असल्याचे अधिवेशनात दिसून आले. शैक्षणिक धोरणांमध्ये बदल करावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अधिवेशनातील हा इशारा घरचा अहेर म्हणायला हवा.