शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

तिचे आकर्षणच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:09 IST

राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन त्यांच्यात एक प्रभावी व गंभीर नेता असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले होते. तरीही प्रियंकांचे येणे महत्त्वाचे झाले त्याला कारण ती केवळ एक राजकीय शक्ती नसून एक प्रदीर्घ राजकीय परंपरा आहे.

प्रियंका गांधींचे राजकारणात आज ना उद्या पदार्पण होणार हे सारेच जाणून होते, पण त्या देशाचे राजकारण एवढे ढवळून काढतील, असे कुणाला वाटले नव्हते. त्यांच्या येण्याचे जेवढे स्वागत काँग्रेसमध्ये झाले, त्याहून त्याचा मोठा गदारोळ भाजपा आणि त्यांच्या परिवारात झाला. काँग्रेसचे नेते गप्प होते. पण भाजपाचे पुढारी, प्रवक्ते आणि चाहते आक्रमक झाले आणि सोशल मीडियातील ट्रोल्सही त्यांच्याविरोधात कमालीची धूळवड करताना दिसले. ‘राहुल गांधी कमी पडतात, म्हणून प्रियंकांना आणले’ इथपासून ही ओरड सुरू झाली. वास्तव हे की प्रियंका येण्याआधीच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड ही तीन राज्ये जिंकली होती, त्या आधी लोकसभा, विधानसभेच्या सर्व पोटनिवडणुका जिंकल्या होत्या.राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन, त्यांच्यात एक प्रभावी आणि गंभीर नेता असल्याचे या काळात साऱ्यांच्या लक्षात आले. तरीही प्रियंकांचे येणे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले, त्याला अनेक कारणे आहेत. लोकांना त्यांच्यात इंदिरा गांधींची छबी दिसते. त्यांचे रूप आणि देहबोली दिसते. त्यांचा कणखर, पण देखणा चेहरा दिसतो. इंदिरा गांधींनी काँग्रेसमधील प्रतिगाम्यांची केलेली हकालपट्टी, पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून त्याचे केलेले दोन तुकडे, शेजारी राष्ट्रांशी राखलेले मैत्रीचे संंबंध आणि खलिस्तानचे बंड मोडून देश एकात्म राखण्यासाठी केलेले बलिदान कुणालाही विसरता येणारे नाही.सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर प्रियंकांचे राजकारणातील पदार्पणही साधे नाही. त्या आधी त्यांची जमेल तेवढी बदनामी करून झाली आहे. त्यांच्या पतीविरुद्ध चौकशांचे ससेमिरे लागले आहेत. त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा बोलली जात आहे. या साऱ्या काळात त्या गप्प होत्या, पण त्यांच्याविषयीची लोकांची आत्मीयता कमी होताना कधी दिसली नाही. त्यांनी आजवर राजकारणात जे काही केले, त्याबद्दलचे आकर्षण कायम राहिले. नेमके हेच भाजपा आणि त्यांच्या परिवाराचे दु:ख होते. आता त्या आल्या आहेत. सभेत बोलण्याचा त्यांना सराव आहे. न डगमगता प्रश्नांची त्या उत्तरे देतात. मोदी, शहा आणि भाजपा यांच्यावर कठोर टीका करतात. चेहऱ्यावरचे हास्य मावळू न देता त्यांना जनतेशी संवाद साधता येतो. आजवरच्या काँग्रेसच्या पराभवाने त्यांना निराशा आलेली दिसत नाही. आपला करिश्मा मोठा आहे आणि त्यातून आपल्यावर टाकलेली जबाबदारी मोठी आहे, हे त्यांना कळते. त्याच वेळी उत्तर प्रदेशात त्यांच्यापुढे असलेले आव्हान मोठे आहे, याचीही त्यांना जाण आहे. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच अखिलेश यादव आणि मायावती यांच्या युतीलाही तोंड द्यायचे आहे. त्यांच्या तुलनेत प्रियंका यांचा राजकारणाचा अनुभव लहान आहे, तरीही हे पक्ष त्यांच्या पदार्पणाने गडबडले आहेत. भाजपाचे संबित पात्रा हे सध्या त्यांच्याखेरीज दुसऱ्या विषयावर बोलत नाहीत आणि सुब्रमण्यम स्वामी यांनाही त्यांचा विचार गंभीरपणे करावासा वाटू लागला आहे. संघ गप्प आहे, पण त्यांनाही तिच्या येण्याचा हादरा बसला आहे.देशाच्या राजकारणाचे प्रतिबिंब उत्तर प्रदेशच्या राजकारणात पाहायला मिळते, असे मानले जाते. त्यामुळे तेथील जबाबदारी स्वीकारत प्रियंका यांचा राजकारणातील प्रवेश तेथील समीकरणे बदलण्यास कारणीभूत ठरेलच, पण त्याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावरही उमटतील. या साऱ्यांचे कारण प्रियंका ही शक्ती नसून परंपरा आहे. ती मोतीलाल नेहरूंपासून सुरू होते, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी अशी ही शंभर वर्षांची परंपरा तिच्यामुळे जागी होते. त्यातच त्यांच्या बाजूला राहुल गांधींचे विजयी नेतृत्व उभे आहे. ज्योतिरादित्य शिंदेचीही समर्थ साथ आहे आणि काँग्रेसने अलीकडेच मिळविलेले मोठे विजय आहेत. झालेच तर मोदींची पडलेली प्रतिमा, त्यांच्या पक्षाचे झालेले पराभव आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचे खोटेपणही याच काळात उघड झाले आहे. येत्या काळात त्यांचे पुरावेही देशाला मिळतील. अशा परिस्थितीत प्रियंकांवर शिंतोडे उडविणे एवढेच भाजपाला जमणारे आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीAmit Shahअमित शहाUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ