शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अग्रलेख : शाहांनी ठरविली रणनीती; विदर्भ आणि मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करण्यामागे कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 08:45 IST

शाह यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली असली तरी त्यांच्या या दौऱ्याने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल, यात शंका नाही

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीवकुमार हे २७ आणि २८ सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहेत. कदाचित ते निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता लागू झाली तर अवघे ४० दिवस उरतात. एकूण हा कालावधी लक्षात घेतला तर राजकीय पक्षांसाठी ‘रात्र थोडी अन् सोंगे फार’ अशी परिस्थिती आहे. सगळेच राजकीय पक्ष सध्या ‘इलेक्शन मोड’वर असले, तरी युती-आघाडीचे जागावाटप हा डोकेदुखीचा विषय अजून बाकी आहे. शिवाय, आंदोलनांमुळे निर्माण झालेली सामाजिक अस्वस्थता कोणाच्या पथ्यावर पडेल, हे ठामपणे सांगणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यातून मिळालेले संकेत खूप सूचक आहेत. शाह यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील भाजप कार्यकर्त्यांना दिलेला कानमंत्र, निवडणूक जिंकण्यासाठी सांगितलेली दशसूत्री आणि आरक्षणासाठी सुरू असलेली सामाजिक आंदोलने कशी हाताळली जावीत, हे गुजरातचे उदाहरण देऊन केलेली मीमांसा यातून त्यांची रणनीती स्पष्ट होते. विदर्भ आणि मराठवाड्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करण्यामागेदेखील काही कारणे आहेत. लोकसभा निवडणुकीत या दोन प्रदेशांत  महायुतीला विशेषत: भाजपला सपाटून मार पडला. मराठवाड्यात तर भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, विदर्भात केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीला राज्यात पुन्हा सत्तेवर यायचे असेल, तर विदर्भातील किमान ४५ आणि मराठवाड्यातील ३० जागा जिंकणे आवश्यक आहे; म्हणूनच शाहांनी ‘मिशन ४५’चा नारा दिला असेल. निवडणुकीतील निकालावर अनेक घटकांचा प्रभाव असतो. जय-पराजयाचे गणित त्यावरच अवलंबून असते. अन्यथा, लोकसभा निवडणुकीत मविआ आणि महायुतीला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत केवळ शून्य पूर्णांक सोळा टक्के एवढा अल्पसा फरक असताना जागांमध्ये अनुक्रमे ३१ आणि १७ असा जवळपास दुपटीचा फरक झाला. म्हणूनच, शाह यांनी प्रत्येक बुथवर १० टक्के मते वाढविण्याचा आदेश देतानाच विरोधी पक्षातील कार्यकर्ते आपलेसे करण्याचा सल्ला दिला. शाह यांच्या भाषणातील आणखी तीन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काही करून रोखण्यासंदर्भातील आहे. लोकसभेला काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या, तरी या विजयात या दोन्ही नेत्यांचा सिंहाचा वाटा राहिला, हे शाह जाणून आहेत. दुसरा मुद्दा, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात येणाऱ्या आयारामांसंदर्भात आहे. २०१४ सालच्या विधानसभेपूर्वी भाजपमध्ये अगदी घाऊक प्रमाणात आयारामांची भरती झाली होती. त्याचा कितपत फायदा पक्षाला झाला ते लोकसभेत दिसून आले. किंबहुना, इतर पक्षातील डागाळलेल्या नेत्यांना जवळ केल्याने नुकसानाच्या टक्क्यांत भरच पडली. तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आणि तितकाच व्यापक असा आहे. महाराष्ट्राची निवडणूक संपूर्ण देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्याचे पडसाद उमटतात, याचा आवर्जून केलेला उल्लेख! देशाचे तख्त राखण्यासाठी भाजपसाठी महाराष्ट्र किती महत्त्वाचे राज्य आहे, हे त्यातून अधोरेखित होते. महायुतीसाठी जागावाटप हा सर्वांत मोठा टास्क असणार आहे. कारण एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारख्या तुल्यबळ नेत्यांचे समाधान करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ती जबाबदारीदेखील शाहांनी स्वत:कडे घेतल्याचे दिसते. या नेत्यांसोबत मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत खलबते करून त्यांनी वादाचे बरेच विषय निस्तारले असावेत. काल-परवापर्यंत विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष महायुतीच्या विरोधात जाणारे आहेत. ‘लाडकी बहीण’सारखी योजना जाहीर केल्यानंतरदेखील लोकांचा कल सरकारबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येत नाही. विरोधकांनी लोकसभेला  तयार केलेला ‘नरेटिव्ह’ अजून कायम आहे. ही बाब महायुतीची चिंता वाढवणारी आहे. यावर कशी मात करायची, याचा कानमंत्र  शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना नक्कीच दिला असणार. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात पदयात्रा काढा, ऋषी-मुनींना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्या, मतदान केंद्रावरील विरोधकांना आपलेसे करा, असे सांगून ही निवडणूक कोणत्या अंगाने लढवायची आहे, याची जणू ‘ब्लू प्रिंट’च शाह यांनी सादर केली. शाह यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली असली तरी त्यांच्या या दौऱ्याने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल, यात शंका नाही

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस