भाजपा विरुद्ध भाजपा
By Admin | Updated: July 26, 2014 09:11 IST2014-07-26T09:11:34+5:302014-07-26T09:11:42+5:30
तोगडिया, ढवळीकर, लक्ष्मण प्रभृतींच्या बडबडीला मोदींनी आळा घातला नाही, तर त्याची झळ मोदींच्या प्रतिमेला बसल्यावाचून राहणार नाही, हे लक्षात घेतलेले बरे!

भाजपा विरुद्ध भाजपा
केंद्रातील मोदी सरकार पाडण्यासाठी विरोधीपक्षांना फारशी खटपट करावी लागेल असे दिसत नाही, कारण हे सरकार पाडण्याची जबाबदारी प्रवीण तोगडिया, गिरिराजसिंह आदी हिंदुत्ववादी जहाल नेते; तसेच भाजपामधील तेलंगणातील नेते के. लक्ष्मण किंवा गोव्यातील भाजपाचे मंत्री ढवळीकर आदी प्रभृतींनी घेतलेली दिसत आहे. हे सर्व नेते दरदिवसाआड मोदी सरकारला अडचणीत आणणारी विधाने करून, सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडीत आहेत. हे कमी आहे म्हणून की काय ह्यअसे मित्र नकोत असे वाटायला लावणारे शिवसेनेसारखे मित्रपक्ष रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांच्या तोंडात चपात्या कोंबून संसदेत सरकारला अडचणीत आणण्याची व्यवस्था करीत आहेत. भारताची जागतिक दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा हिला पाकिस्तानची सून म्हणून तिला तेलंगणची ब्रँड अँबॅसिडर करण्याला त्याच राज्यातील भाजपा नेत्याने आक्षेप घेतला आहे. एखाद्या भारतीय मुलाने अथवा भारतीय मुलीने परदेशी व्यक्तीशी विवाह केला म्हणून त्याला परकी हस्तक मानायचे ठरवले तर आज भारतातील अनेक तरुण-तरुणींना देशद्रोही ठरवावे लागेल. पण खरा मुद्दा तो नाही. खरा मुद्दा हा आहे की, मोदी सत्तेवर आल्यानंतर आजवर दबलेल्या हिंदू जातीयवादी शक्ती आता डोके वर काढू लागल्या आहेत आणि मोदी गुजरातचा जातीय अजेंडा कधी राबवतात याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच मोदी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून कधी घोषित करतात, याचे वेध गोव्याचे ढवळीकर यांना लागले आहेत. तोगडियांना मुस्लिमांनी आपली पायरी ओळखून वागावे असे वाटू लागले आहे. या एकापाठोपाठ येणार्या हिंदुत्ववादी मागण्यांमुळे मोदी सरकारची मात्र पंचाईत होत आहे. या मागण्यांना पाठिंबा द्यावा, तर हे हिंदू तालिबानी सरकारला डोईजड ठरण्याची भीती आहे आणि नाही दिला, तर ज्यांना राममंदिराचे आमिष दाखवून सत्ता मिळविली आहे, ते नाराज