शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कडवट साखर! दरोडेखोरीची साखळी कधी ना कधीतरी तोडायला हवीच होती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 10:00 IST

अनेक सहकारी साखर कारखान्यांनी सुमारे २७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली होती. त्यापैकी एक हजार कोटी रुपये राज्य सरकारने थकहमी दिली होती म्हणून सरकारी तिजोरीतून फेडण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने धाडसी निर्णय घेऊन राज्य सरकारच्या हमीला न जुमानता सहकारी साखर कारखान्यांना कर्जपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना कदाचित हा निर्णय कडवट वाटेल, साखरदेखील कडू हाेईल. मात्र, सहकारी साखर कारखानदारीतील ही दरोडेखोरीची साखळी कधी ना कधीतरी तोडायला हवीच होती! राज्य सहकारी बँकेने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. कारण राज्य सरकारची थकहमी घेऊन राज्य सहकारी बँक किंवा राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून उचललेल्या कर्जाचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती साखर कारखानदारीमध्ये फोफावलेली आहे. अनेक सहकारी साखर कारखान्यांनी सुमारे २७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली होती. त्यापैकी एक हजार कोटी रुपये राज्य सरकारने थकहमी दिली होती म्हणून सरकारी तिजोरीतून फेडण्यात आले.

वास्तविक पाहता जनतेच्या पैशातून साखर कारखान्यांची थकीत कर्जे फेडण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नाही. त्या त्या सहकारी साखर कारखान्यांची मालमत्ता विकून आणि कर्जांचा गैरवापर करण्यास जबाबदार असलेल्यांकडूनच या थकलेल्या रकमा वसूल करायला हव्यात. हीच अट राज्य सहकारी बँकेने घातली आहे. परिणामी, थकहमीची योजना राज्य सरकारने आखली असतानाही कोणी पुढे यायला तयार नाही. केवळ पाच सहकारी साखर कारखान्यांनी राज्य बँकेच्या अटींची पूर्तता करून ३६१ कोटी रुपयांचे कर्ज चालू हंगामासाठी घेतले आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन सहकारी साखर कारखान्यांचा  समावेश आहे. गेल्या १ नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी तातडीने कर्जपुरवठा करावा, अशी घाई करण्यात येत आहे. साखर कारखानदार हे राजकारणी असल्याने राज्य बँकेवर दबाव आणत आहेत. राज्य बँकेने प्रथमच अशा प्रकारच्या दबावाला भीक न घालता थकहमीवर कर्ज देण्याची योजनाच बंद करीत आहोत, असे  राज्य सरकारला लेखी कळवून टाकले आहे.

कदाचित हा निर्णय राज्यकर्त्यांना कडवट वाटेल; पण तो  घेणे आवश्यक होते. राज्य सरकारने थकहमी घेऊनही साखर कारखान्यांनी कर्जाचा गैरवापर करून कारखान्यांना तोट्यात लोटले आहे. राज्य सरकारने केवळ एक हजार कोटी दिले आहेत.  उर्वरित सतराशे कोटी थकीत आहेत. कर्जाचा गैरवापर केल्याने सहकारी साखर कारखाने कर्जाची परतफेड वेळेवर करीत नाहीत हा अनुभव असल्याने राज्य बँकेने राज्य सरकारच्या थकहमीनंतरही संबंधित कर्जाचे स्वतंत्र खाते काढण्याची अट घातली आहे. शिवाय साखर  उत्पादनातील उपपदार्थांतून मिळणारी रक्कम राज्य बँकेत खाते काढून तेथेच जमा करण्यास सांगितले आहे. तिसरी महत्त्वाची अट अशी की, या कर्जापोटी सहकारी साखर कारखान्याच्या संपूर्ण संचालक मंडळाने आपली वैयक्तिक जमीन-जुमला तारण म्हणून राज्य बँकेकडे ठेवायची. तिसऱ्या अटीवर सहकारी साखर कारखानदार घाबरले आहेत. कर्जाची परतफेड होईपर्यंत या जमीन-जुमल्याची खरेदी-विक्री करता येणार नाही, अशीही अट घालायला राज्य बँकेने मागे-पुढे पाहिलेले नाही. त्याचा परिणाम असा की, पाच सहकारी साखर कारखान्यांचा अपवाद वगळता सुमारे चाळीस साखर कारखान्यांनी प्रस्ताव  दिले तरी राज्य बँकेच्या अटींची पूर्तता करताना सहकारातील नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत. राज्य बँकेच्या अटींची पूर्तता करू न शकल्याने प्रस्ताव तसेच पडून राहिले.

परिणामी गळीत हंगाम सुरू झाला तरी राज्य बँकेने कर्जपुरवठा केलेला नाही. आता तर कर्जपुरवठा करण्याची वेळही निघून गेली, त्यामुळे आता प्रस्ताव पाठवूच  नका, असे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सहकारी बँकेवर राजकारण्यांचे संचालक मंडळ नाही, सध्या प्रशासक आहेत ही एक चांगली बाब आहे. अन्यथा राज्य बँकेचा पैसा आपापसात वाटून घेऊन सहकारातील नेतेमंडळी नामानिराळी झाली असती. राज्य सरकार, राज्य सहकारी बँक आणि सहकारी साखर कारखानदारी यात सर्वत्र राजकारणी बसलेले असल्याने सोयीनुसार निर्णय घेऊन या तिन्ही संस्थांना अडचणीत आणण्याचे महान कार्य या कर्जात बुडालेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारण्यांनी आजवर केले आहे. राज्य सहकारी बँकेच्या कडक भूमिकेमुळे साखर उत्पादनाऐवजी वातावरण कडवट होईल, मात्र त्याची गरज होती.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने