शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

नितीश कुमार-भाजपचे कशामुळे बिनसले?; आरसीपी सिंग यांचे प्रकरण हा शेवटचा आघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 7:23 AM

राजकीय वजन आणि समीकरण बदलते असले तरी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ते तेजस्वी यादव अनेकांनी ‘फिटनेस’चे चांगलेच मनावर घेतले आहे.

- हरीष गुप्ता

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप एकमेकांपासून अलग होऊन आघाडीचे सरकार कोसळले. त्यामागील विविध कारणांची चर्चा आता होत असून, विश्लेषणांना ऊत आला आहे. चिराग पासवान यांनी मार्च २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे ठरवले त्यावेळेसच या फारकतीची बीजे पडली असे म्हटले जाते. संयुक्त जनता दलाची आत्तापर्यंतची सर्वांत वाईट कामगिरी यावेळी झाली. आरसीपी सिंग यांचे प्रकरण हा शेवटचा आघात होता.

दरम्यान, भाजप आणि संयुक्त जनता दलात जाहीरपणे उखाळ्यापाखाळ्या निघत राहिल्या. त्याला कोणताच धरबंध नव्हता. दुखावल्या गेलेल्या नितीश कुमार यांना समजावण्यासाठी भाजपचे दूत आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठविण्यात आले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जुलैला पाटण्यात आले ती वेळ निर्णायक ठरली. 

बिहार विधानसभेच्या शतक महोत्सव कार्यक्रमासाठी ते आले होते. हिंदीमधली दोन पानांची निमंत्रण पत्रिका वाटण्यात आली. तिच्यावर सभापती विजयकुमार सिन्हा यांचेच फक्त नाव होते. नितीश कुमार कार्यक्रमाला उपस्थित राहिले; पण त्यांचे नाव नसणे अवमानजनक मानले गेले. त्याक्षणी मोठी ठिणगी पडली. मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल फागू चौहान, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची नावे वगळणे हे राजशिष्टाचाराविरुद्ध आणि सर्व संकेत धुडकावून लावणारे होते, असे नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे.

पंतप्रधान जेव्हा कुठल्या कार्यक्रमासाठी जातात तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाची मिनिट आणि मिनिटाची आखणी करणारी कार्यक्रम पत्रिका पंतप्रधानांचे कार्यालय ठरवत असते. पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून ही एवढी मोठी घोडचूक कशी झाली याबद्दल संयुक्त जनता दलाला आश्चर्य वाटते आहे. सभापती भाजपचे आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजप अंदाज घेत असेल तर प्रश्नच नाही. त्यानंतर चारच आठवड्यांत दोन्ही पक्ष विभक्त झाले.

भाजपने झारखंड मोहीम रोखली

बिहार हातातून गेल्यानंतर झारखंडमधले झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्याची भाजपची मनीषा थोडी झाकोळली  गेली आहे. खनिकर्म सचिव पूजा सिंगल आणि इतरांवर पडलेल्या धाडीत  प्रचंड मोठी रोख रक्कम सापडल्यानंतर हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यावर भाजपने खरेतर लक्ष केंद्रित केले होते. या प्रकरणात सोरेन यांना गोवण्याचाही प्रयत्न झाला. बहुधा याच मोहिमेचा भाग म्हणून शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये तीन काँग्रेस आमदारांना रोकड देण्यात आली. त्यांना पोलिसांनी अटक केली.

न्यायालयाने अजूनही त्यांना दिलासा दिलेला नाही. या सगळ्या घडामोडींच्या मागे भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याची चर्चा माध्यमातून झाली. तीन आमदारांना झालेली अटक, त्यांच्याकडे पैसे सापडणे, यामुळे भाजपला पडते घ्यावे लागले. इतरही काही काँग्रेस आमदारांना नमवून हाताशी धरले गेले असेही उघड झाले आहे. परंतु ‘ऑपरेशन लोटस’ आता थोपवून धरण्यात आले आहे.

सज्जड असा पुरावा जरी पुढे आला नसला तरी भाजप विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर करीत आहे, अशी चर्चा देशभर सुरू झाल्याने झारखंडमधील मोहीम काही काळ रोखण्यात आली. झारखंडमधील आमदारांची चौकशी पश्चिम बंगाल पोलीस करीत असल्याने ममता बॅनर्जी यांच्याकडून काही  दिलासा मिळतो का? असाही प्रयत्न भाजप करीत आहे. ज्या प्रकरणात रोकड सापडली त्याकडे काही वेगळ्या पद्धतीने पाहता येईल का, असाही विचार केला जात आहे. अर्थात सोरेन सरकार या सगळ्यामुळे फार काळ तग धरू शकेल असे मात्र नाही. 

नड्डा यांची फिटनेस मोहीम

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृती उत्तम ठेवण्याच्या ध्यासाने पछाडले आहे. त्यांनी जवळपास आठ किलो वजन कमी केले असून, आणखी कमी करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानी नड्डा रोज सकाळी साधारणत: तासभर व्यायाम करतात. तसेच जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही ते व्यायाम करून घेतात. सकाळची योगासने चुकवत नाहीत. ती योग्य प्रकारे होत आहेत हे पाहण्यासाठी योग प्रशिक्षक येतो. 

२०२० साली ते भाजपचे अध्यक्ष झाले तेव्हापासून ते बरेच कार्यमग्न असले तरी वयाच्या ६१ व्या वर्षी आणखी वजन वाढलेले त्यांना परवडले नसते. ‘आरोग्याकडे लक्ष द्या, नियमितपणे योगासने करा,’ असे पंतप्रधान मोदीही त्यांच्या सहकाऱ्यांना वारंवार बजावत असतात. भाजपचे अनेक खासदार दिल्लीमधल्या बागांमधून सकाळी फेरफटका मारताना त्यामुळे दिसतात. 

राजद नेते तेजस्वी यादव यांनाही पंतप्रधानांनी १२ जुलैला पाटण्यात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी ‘थोडा वजन कम करो,’ असा सल्ला दिला होता. मोदी स्वत: रोज योगासने करतात.  तेजस्वी यादव यांचे गेल्या वर्षी लग्न झाले. त्यानंतर त्यांचे वजन वाढलेले दिसले. परंतु पंतप्रधानांचा सल्ला त्यांनीही मनावर घेतला आहे, आता ते उपमुख्यमंत्री झाले असले तरी सकाळी तासभर आरोग्यासाठी देतात. आपल्या निवासस्थानी टेबल टेनिस खेळतात. ते स्वतः क्रिकेटपटूही आहेतच.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा