शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! शहरी तापमान धोक्याच्या पातळीवर चाललेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 17:11 IST

देशात उन्हाळ्याच्या झळा आता अतितीव्र बनल्या असल्याने केवळ पहाडी भाग वगळता उर्वरित प्रदेशांना उष्णतेचा भीषण त्रास जाणवत आहे आणि पावसाळ्यातही त्याची तीव्रता कमी होत नाही. भारतीय हवामान खाते व हवामानविषयक संशोधन संस्थेच्या अभ्यासात मार्च ते मे महिन्यात तसेच पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) उष्णतेत कमालीची वाढ झाल्याचे आढळले आहे.

ठळक मुद्देदेशात उन्हाळ्याच्या झळा आता अतितीव्र बनल्या असल्याने केवळ पहाडी भाग वगळता उर्वरित प्रदेशांना उष्णतेचा भीषण त्रास जाणवत आहे भारतीय हवामान खाते व हवामानविषयक संशोधन संस्थेच्या अभ्यासात मार्च ते मे महिन्यात तसेच पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) उष्णतेत कमालीची वाढ झाल्याचे आढळले आहे

- राजू नायक

देशात उन्हाळ्याच्या झळा आता अतितीव्र बनल्या असल्याने केवळ पहाडी भाग वगळता उर्वरित प्रदेशांना उष्णतेचा भीषण त्रास जाणवत आहे आणि पावसाळ्यातही त्याची तीव्रता कमी होत नाही. भारतीयहवामान खाते व हवामानविषयक संशोधन संस्थेच्या अभ्यासात मार्च ते मे महिन्यात तसेच पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) उष्णतेत कमालीची वाढ झाल्याचे आढळले आहे. ही उष्णतावाढ दरदशक प्रत्येकी +०.५६ अंश सेंटिग्रेडने व दरदशक +०.३२ अंश सेंटिग्रेडने वाढत आहे. उष्णतेमुळे आर्द्रतेत वाढ होते व पावसाळ्यातही तापमानात कमालीची वाढ होत असल्याने लोकांच्या आरोग्याच्या कटकटींमध्ये भर पडू लागली आहे.

देशात ज्या पद्धतीने निर्वासितांचे लोंढे शहरांकडे कूच करू लागले आहेत ते पाहाता २०२८ मध्ये नवी दिल्ली टोकियोला मागे टाकून जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले शहर बनण्याकडे वाटचाल करू लागलेय. किंबहुना 2क्5क् मध्ये शहरी नागरिकांच्या संख्येत ४१६ दशलक्ष लोकांची भर पडणार असून त्यामुळे शहरी समस्यांमध्ये आणखी भर पडेल व जीवन आणखी मुश्कील बनेल. दिल्लीस्थित विज्ञान व पर्यावरण केंद्राने तयार केलेल्या ताज्या शहरीकरणविषयक अहवालात या वाढत्या प्रजेला सामावून घेण्यासाठी तातडीने उपाय योजण्याची शिफारस सरकारला केली आहे.

‘सर्वासाठी घर’ या मोहिमेत २०२२ पर्यंत देशात २० दशलक्ष घरांचे निर्माण करण्याचे उद्दिष्ट बाळगले असले व नागरी सुविधा व शहरी पायाभूत सुविधांची भर त्यात पडणार असली तरी सरकारचे काम अत्यंत वेगाने आणि सातत्याने राबून चालवावे लागणार आहे.

शहरीकरणाला सध्या ग्रासणारा महत्त्वाचा प्रश्न आहे तो वातावरण बदलाच्या संकटाचा. चीनमध्ये शहरांनी उद्योग क्षेत्राला मागे टाकून ऊर्जाभक्षक बनण्याचा सपाटा चालविला आहे. चीनमध्ये शहरांमध्ये एक टक्का लोकसंख्या वाढते तेव्हा राष्ट्रीय ऊर्जा वापरात १. ४ टक्के वाढ होते. शहरी नागरिक ग्रामीण भागापेक्षा ५० टक्के जादा ऊर्जा वापरतात. भारतातही वेगळी परिस्थिती नाही. दिल्ली महानगर- जेथे अवजड उद्योग व कृषी क्षेत्रचा अभाव असूनही देशभर हिमाचल, काश्मीर, उत्तराखंड, छत्तीसगड, गोवा, केरळ, बिहार, झारखंड, ओडिशा, सिक्कीम व ईशान्य राज्यांपेक्षा जादा ऊर्जा वापरते. दिल्लीत प्रती युनिट वीज वापरण्याचे प्रमाण २६० युनिट असून ते चंदीगड (२०८ युनिट), अहमदाबाद (१६७ युनिट) व मुंबई (११० युनिट) पेक्षा अधिक आहे.

शहरी प्रजा घरे व इतर सुविधांमुळे संतुष्ट असल्याचे भासवत असली तरी २०१० मध्ये अहमदाबादेत उष्णतेच्या लाटेत १३०लोक दगावले होते. २०१३ व २०१५ मध्ये देशात अनेक ठिकाणी आलेल्या उष्णतेच्या झळा सहन न होऊन प्रत्येकी १५० व २५० लोक मरण पावले होते. देशातील सर्वात भीषण उष्णतेची लाट २०१६ मध्ये नोंदविण्यात आली ज्या वर्षी जैसलमेर येथे तापमान ५२.४ अंश सेंटिग्रेडवर गेले.

शहरी भागांमध्ये विशिष्ट कारणांमुळे ग्रामीण भागापेक्षा ३.५ ते १२ अंश सेंटिग्रेड तापमान जादाच असते. ज्या शहरांमध्ये गरिबांची संख्या अधिक असते, अशा झोपडपट्टय़ांमध्ये असुविधांमुळे उष्णतेच्या झळा अधिक असतात. त्या लोकांचे राहणीमान कनिष्ठ बनते आहे. शहरी भागामध्ये नजीकच्या काळात उष्णताविषयक विकारांमध्ये वाढ होईल असा हा हवामानविषयक अहवाल म्हणतो. पिण्यायोग्य पाण्याचा अभाव व विजेचा अपुरा पुरवठा यामुळे विकार वाढू शकतात. उष्णता व आर्द्रता वाढल्याने आजारांमध्ये आणखी वाढ होईल. या परिस्थितीवर मात करण्यासाठी घरबांधणीमध्ये दर्जात्मक सुधारणा झाली पाहिजे. शिवाय लोकांना वातानुकूलित घरे व आरामदायी मोटारींची सवय जडता कामा नये, त्यामुळेही शहरी तापमानात वाढ होईल. त्यादृष्टीने आता वातावरणविषयक उपाय योजताना नागरी सेवा व आरोग्य सेवांमध्ये वाढ झाली पाहिजे.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :weatherहवामानIndiaभारतEarthपृथ्वी