शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

थोरात, पटोले; आता शांत होणार बडबोले!

By यदू जोशी | Updated: February 17, 2023 10:45 IST

काँग्रेसमध्ये खूप ताणले जाते; पण मग तुटण्याआधी थांबविले जाते. नाहीतर नाना पटोले- थोरातांमधील भांडण आठ दिवसांतच कसे काय शांत झाले असते?

यदु जोशी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ फायदा माध्यमे उचलतात आणि पक्षाचा तमाशा होतो. पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वादळ हे पेल्यातले असेल, दोघांपैकी कोणावरही पक्षश्रेष्ठी तूर्त कोणतीही कारवाई करणार नाहीत, हे गेल्याच आठवड्यात म्हटले होते. त्याचा प्रत्यय आला! दोघांचे मनोमीलन झाले किंवा दाखवले गेले. काल दोघे एकत्रितपणे पत्रकारांशी बोलले. किती छान हसू आणले दोघांनी चेहऱ्यावर? जणू काही जय विरुची जोडीच! पक्षश्रेष्ठींनी पटोलेंचा राजीनामा घेतला असता तर पक्षाला धोका देऊन आमदार झालेले सत्यजित तांबे यांच्या आरोपांवरून पटोलेंना घालवले गेले असा त्याचा अर्थ काढला असता. काँग्रेसश्रेष्ठी तस कधीही होऊ देणार नाहीत. पटोले यांना आज काढले नाही. म्हणून त्यांना कायमचे अभय मिळाले असेही समजू नका. टांगती तलवार कायम असेल. पटोलेंविरोधकांच्या कारवाया कायम सुरुच राहतील. 

काँग्रेसमध्ये खूप ताणले जाते, मग तुटण्याआधी थांबविले जाते. पक्षश्रेष्ठींना थंड करून खायची सवय आहे. पटोले थोरातांमधील भांडण आठ दिवसांतच कसे काय शांत झाले? माहिती अशी आहे की, दिल्लीने दोघांचीही चांगलीच कानउघाडणी केली. 'तुमच्यातील वादाचा पुण्यातील कसब्याची निवडणूक असताना असे भांडत राहिलात तर चुकीचा संदेश जाईल, शिवाय काँग्रेसचे रायपूर अधिवेशन तोंडावर आहे तेव्हा तोंडाला कुलूप लावा,' असे बजावले गेले म्हणतात! बडबोलेपणा थांबवण्याचे आदेश आले. त्यातच पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आदी ज्येष्ठ नेत्यांनी दोघांकडेही नाराजी बोलून दाखवली आणि मनोमीलनाचा देखावा उभा सांगतात, की हे मनोमीलन तात्पुरते आहे. कसब्यातील निवडणुकीनंतर ते पुन्हा उचल नागपुरात अडबाले पाठिंबा मागत असताना दिला? पूर्वी छोटू भोयर प्रकरणातही पटोले कसे चुकले? इथपासूनचा सगळा दारूगोळा पटोलेविरोधकांनी काढून ठेवला आहे. एकट्या तांबे प्रकरणावरून बाळासाहेब थोरात यांचे विधिमंडळ पक्षनेतेपद श्रेष्ठी काढून घेतील, आहे. असेही होणार नाही. एवढ्यात काहीही होणार नाही. सगळे कसे शांत, आलबेल आहे असे वाटत असताना अचानकबदल होतील. ही काँग्रेस आहे, पक्षात चारचार दशके घालवणाऱ्यांना नाही समजली; तर तुमची आमची काय झाला. पटोलेविरोधी नेते खासगीत गोष्ट?

बडबोले नेते, प्रवक्ते यांच्यामुळे बरेचदा तोंडावर पडावे लागते हे लक्षात आल्यानंतर आता भाजपनेही खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. संवेदनशील राजकीय विषयावर केवळ सहाच नेते बोलतील, सरकारमधील एखाद्या वादाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बोलतील, कोणत्याही नेत्याने वादग्रस्त विधान करायचे नाही, प्रवक्त्यांनी वाद ओढवून घ्यायचा नाही, असे फर्मान काढण्यात आले आहे. बडबडरावांना आतातरी आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. ऊर्फी पॅटर्नवाल्यांना हा इशाराच नीड टू नो फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाह यांनी तो आणल्याचे मानले जाते. लष्करामध्ये अशी पद्धत आहे, की लढणाऱ्या सैनिकांना वा अधिकाऱ्यांना पुढच्या क्षणी काय करायचे आहे तेवढेच सांगतात. ती कामगिरी साधली की मग पुढचे सांगायचे. ते झाले की मग पुढचे सगळे एकाचवेळी सांगायचे नाही. शिवाय गरजेपुरत्याच लोकांकडे वाच्यता करायची. त्यामुळे कमालीची गुप्तता बाळगली जाते. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी याच फॉर्म्युल्याचा अवलंब केला होता. सत्तासंघर्षाच्या काळातही तेच करण्यात आले होते.

 केव्हा काय होईल?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ऐवजी नवे राज्यपाल २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहाला संबोधित करतील, असे २० जानेवारी रोजी लिहिले होते, ते खरे ठरले. कोश्यारी गेले, रमेश बैस आले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी होईल, असे वाटले होते. पण ते अधांतरी दिसत आहे. सध्या फडणवीस एकतर अर्थसंकल्प तयार करण्यात अन् पुण्यातील निवडणुकीत व्यग्र आहेत. 'नीड टू नो' फॉर्म्युल्यानुसार अचानक काही झाले तरच वेगळे काही होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही ऑगस्टनंतरच होतील, असे वाटते. राज्यात सरकार असल्याने भाजप- शिंदे यांना घाई नाही. तसेही प्रकरण न्यायालयात आहे. मुंबईवरील उद्धव सेनेची पकड ढिली करायची तर काही अवधी जावा लागेल. सध्या तेच सुरू आहे!

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात