शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

अयोध्या : सांस्कृतिक सौहार्दाचा इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 12:51 AM

अयोध्येत आता राम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात झाली आहे. अयोध्या ऊर्फ साकेत हे स्थान रामपूर्व काळापासून भारताच्या सांस्कृतिक/ राजकीय इतिहासात महत्त्वाचे राहिलेले आहे. येथेच वेदपूर्व समन संस्कृती बहराला आली.

संजय सोनवणी

अयोध्येत आता राम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात झाली आहे. अयोध्या ऊर्फ साकेत हे स्थान रामपूर्व काळापासून भारताच्या सांस्कृतिक/ राजकीय इतिहासात महत्त्वाचे राहिलेले आहे. येथेच वेदपूर्व समन संस्कृती बहराला आली. नाभी व जैनांचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथांनी येथूनच राज्य चालविले. भारताचे नाव भारतवर्ष होण्यापूर्वी नाभीवर्ष होते. भारताचा सांस्कृतिक इतिहास पाहिला तर रामकथेच्या पूर्वीच हे स्थळ समन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले होते. जैन धर्माचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ ?व अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ व अनंतनाथ यांचा जन्म अयोध्येत झाला. इक्ष्वाकु वंशातील श्रीरामाचा काळ पौराणिकदृष्ट्या त्यानंतरचा. ऋषभनाथ व अजितनाथ या वेदपूर्व ऐतिहासिक व्यक्ती होत्या, असे मत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व अनेक विद्वानांनी सिद्धही केले. बौद्ध साहित्यानुसार गौतम बुद्धांनी आठ वर्षे अयोध्येत वास्तव्य केले होते. जैनांचे रामायणही प्रसिद्ध असून, त्यांनी रामासही आपले मानले होते असे दिसते. वैदिक धर्माच्या आगमनानंतर रामाचेही वैदिकीकरण झाल्याचे दिसते. हिंदू, जैन, बौद्ध धर्मांच्या दृष्टीने अयोध्या महत्त्वाची राहिली व सर्वांनीच या ना त्या रूपात रामाचा स्वीकार केला.

राम मंदिराचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत की नाहीत, यावर वाद आहेत. असे असले तरी हे स्थळ रामजन्मभूमीच अशीही श्रद्धा आहे. मुळात मंदिरे बांधण्याची संस्कृती फार उशिराची. पहिल्या शिवमंदिराचा नाणकीय पुरावा कुनिंद नाण्यावर मिळतो तो इ.स.पू. दीडशेमधील. तत्पूर्वी बौद्ध व जैन विहार, स्तूप, लेण्यांचे अस्तित्व मिळते. हिंदू देवतांची प्रतीके व प्रतिमाही सर्वत्र मिळतात; पण मंदिरे नाहीत. वैदिक धर्मात प्राचीन काळी मूर्तिपूजा निषिद्ध असल्याने इंद्र-वरुणादींची मंदिरे असण्याचा प्रश्नच नव्हता. अयोध्येत वादग्रस्त जागेवरील १९७६ मध्ये केलेल्या उत्खननांत पुरातत्वविद बी. बी. लाल यांना मृण्मयी जैन प्रतिमा मिळाली होती. या प्रतिमेचा इतिहास इ.स.पू. चवथे शतक निघाला. तेथे नाणी, प्रतिमा मिळाल्या, त्यांचा संबंध राम, सीता वा दशरथाशी असल्याचे सूचन मिळत नाही, असा त्यांचा निर्वाळा आहे. असे असले तरी यावरून रामजन्मही अयोध्येला झाला नाही असा निष्कर्ष काढता येत नाही. हिंदू श्रीरामाला भारतातील वैदिकांसह सर्व धर्मसंस्कृतींनी आपलेसे केले. अयोध्येचा इतिहास अपवाद वगळता सांस्कृतिक सौहार्दाचा राहिला आहे.अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येत राम मंदिरासह चार मंदिरे बांधली, तेव्हा अयोध्येवर आसिफौद्दुला अमानी याचे राज्य होते. १७३६मध्ये अयोध्येच्या मुस्लिम सुभेदाराचा दिवान केसरी सिंगने अयोध्येत जन्मलेल्या पाच तीर्थंकरांची पाच मंदिरे उभारली. अयोध्या नावाचा अर्थच आहे ‘जेथे युद्ध केले जात नाही अशी भूमी’. नगरी फक्त आमचीच असा कोणी दावा करणे सांस्कृतिक सहजीवनाच्या इतिहासावर अन्याय करणारे आहे. जैनांनी आपली तत्त्वधारा पाळत वादग्रस्त जागेवर दावा केलेला नाही. बौद्धांनीही दाव्यात कडवेपणा येऊ दिला नाही. याचे भान ठेवत सांस्कृतिक सौहार्दाच्या इतिहासाचे नव्याने पुनरुज्जीवन केले पाहिजे.(लेखक इतिहास संशोधक आहेत, पुणे)

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर