शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

शिवसेेनेची स्वबळाची बेडकी, काडीमोडाचे खरे कारण जागांची वजाबाकी

By यदू जोशी | Published: January 29, 2018 12:46 AM

लोकसभा आणि विधानसभेची २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव करून शिवसेनेने युतीच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. भाजपाने हिंदुत्व सोडल्याचा साक्षात्कार होऊन शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. खरे कारण हिंदुत्व वगैरे नाहीच.

लोकसभा आणि विधानसभेची २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव करून शिवसेनेने युतीच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे वा त्यांच्या घराण्यातील कुणालाही निवडणूक लढायची नसते त्यामुळे स्वबळाचा निर्णय घेणे हे त्यांच्यासाठी कठीण जात नसावे. मात्र, ज्यांना लढावे लागते त्या आमदार आणि विशेषत: खासदारांचा कौल आधी घेतला असता तर युती तोडा असे कुणीही मनापासून म्हटले नसते. मुंबइचे अरविंद सावंत, बुलडाण्याचे प्रतापराव जाधवांपासून रामटेकच्या कृपाल तुमानेंपर्यंत शिवसेनेचे बहुतेक जण लोकसभेवर प्रचंड मतांनी कसे काय जिंकून गेले, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मोदी लाटेत ते तरले. शिवसेनेने मात्र त्याही विजयाचे श्रेय स्वत:कडे घेतले होते. तेव्हापासून राज्यातील आपल्या ताकदीबाबत हा पक्ष हवेत वा अतिआत्मविश्वासाने वावरत असल्याचे दिसते.

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रादेशिक पक्ष असून त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर कधीही सत्ता मिळविता आलेली नाही. राष्ट्रवादीला सत्तेच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसच्या सहाºयाने राहावे लागले. शिवसेनेची परिस्थिती आणखी वाईट झाली. १९९५ च्या युती सरकारमध्ये, त्या आधी आणि नंतरही अगदी २०१४ पर्यंत युतीमधील मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेकडे आता लहान भावाचा रोल आला आहे. केवळ राजकारणच करायचे असेल तर शिवसेना वा राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकतात पण सत्ताकारण करायचे असेल तर त्यांना अनुक्रमे भाजपा, काँग्रेससोबत जावे लागेल हा आतापर्यंत राज्यातील जनतेने दिलेला कौल आहे. राष्ट्रवादीला ही समज आहे त्यामुळे त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे वारंवार ‘आम्ही काँग्रेससोबत आघाडी करूनच लढणार’ असे स्वत:हून मुलाखती देत सांगत आहेत. या दोन प्रादेशिक पक्षांच्या जशा मर्यादा आहेत तशाच भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनाही महाराष्ट्रात स्वबळावर गेल्या २३ वर्षांत सत्ता मिळविता आलेली नाही हेही वास्तव आहे. त्यामुळे युती/आघाडीच्या धर्माचे पालन सत्तेसाठी करणे ही चौघांचीही अपरिहार्यता आहे. या अपरिहार्यतेतून बाहेर पडून १४५ चा जादुई आकडा गाठू शकेल अशी आजतरी कोणत्याही एका पक्षाची परिस्थिती नाही. मात्र, या आकड्याच्या सर्वात जवळ जाण्याची क्षमता भाजपाची दिसते. आघाडी, युतीत आपसातील भांडणांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसते. विकासाचा अजेंडा जलदगतीने राबविता येत नाही आणि मित्रपक्षाच्या चुकांवर अनेकदा पांघरूण घालावे लागते. युतीची ही मजबुरी एकदाची संपवावी असे आज इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपाला अधिक वाटत आहे. हिंदुत्वापासून भाजपा दूर गेल्याने आम्ही आता एकला चलो रे चा पुकारा दिल्याचे शिवसेना सांगत असली तरी तो पुरता बनाव आहे.‘राष्ट्रवाद हवा की राष्ट्रवादी’ असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. भाजपासोबत युती केली तर लहान भावाची भूमिका मान्य करून त्यांच्यापेक्षा कमी म्हणजे फारतर ९० ते १०० जागा पदरी पडतील हे शिवसेनेला ठाऊक आहे. इतक्या कमी जागा स्वीकारणे मातोश्रीला शक्य होणार नाही. गेल्यावेळी १२२ जागा जिंकणारा भाजपा युतीमध्ये किमान १७५ जागांची मागणी करेल. त्यामुळे दोघांच्या जागांचे अंकगणित जुळणे कठीण आहे आणि युती तुटण्यामागे या अंकगणिताचाच हिशेब आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे