शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

दृष्टिकोन - महापौरांना प्रशासकीय अधिकार असायलाच हवेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 6:26 AM

सुलक्षणा महाजन महाराष्ट्रातील महानगरांच्या महापौरांनी आपल्याला प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार असायला पाहिजेत, अशी मागणी केली आहे. ती मागणी योग्यही ...

सुलक्षणा महाजन

महाराष्ट्रातील महानगरांच्या महापौरांनी आपल्याला प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार असायला पाहिजेत, अशी मागणी केली आहे. ती मागणी योग्यही आहे. कारण लोकशाही देशामध्ये नगरपालिका आणि महापालिका ह्या लोकांच्या सर्वांत जवळ असलेल्या शासकीय संस्था. लोकांच्या दैनंदिन जीवनावर, राहणीमानावर आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी पालिकांची असते. जगातील बहुतेक महानगरांमध्ये पालिकांचा कारभार लोकनियुक्त महापौरांच्या हातात असतो. काही ठिकाणी नागरिक त्यांची प्रत्यक्ष निवड करतात तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधी. न्यू यॉर्क आणि लंडनसारख्या शहरांचे महापौर प्रत्यक्ष नागरिक तर स्पेनमधील बार्सेलोना आणि युरोपमधील अनेक शहरांचे महापौर लोकप्रतिनिधींमधून निवडले जातात. शहरासंबंधीची धोरणे आणि नियम ठरविणे, नियोजन आणि विकासाचे नियमन करणे, करनिर्धारण आणि नागरी सेवांचे दर ठरविणे, प्रकल्प आखणे-राबविणे, पालिकेसाठी उत्पन्न मिळविणे, बजेट आणि खर्च करणे अशी सर्व कामे महापौरांच्या अधिकारात मोडतात. प्रशासनासाठी अधिकारी, तंत्रज्ञ, विविध कामांसाठी सल्लागार नेमण्याचे अधिकार त्यांचे असतात. शहरांच्या प्रगती-अधोगतीसाठी महापौर जबाबदार ठरतात. अनेकदा देशाच्या पंतप्रधान किंवा अध्यक्षांपेक्षाही त्यांना जास्त मान मिळतो.

स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व नागरिकांना मतदानाचा आणि लोकप्रतिनिधींना महापौर निवडण्याचा अधिकार मिळाला असला तरी आयुक्त नेमण्याचे अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राहिले. महापौरपद निव्वळ हारतुऱ्यापुरते असते. १९९२ साली ७४ वी घटना दुरुस्ती करून महापौरांना अधिकार देण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध झाला. मात्र राज्य शासनांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नागरिकांनी पाठपुरावा केला नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची सत्ता अबाधित राहिली. राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकाºयांना अधिकार गमवायचे नव्हते हेच त्याचे मुख्य कारण. शिवाय लोकप्रतिनिधींकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षमता नसल्याने ते शहराचा कारभार करू शकणार नाहीत ही सबब. त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. आज बहुतेक शहरांचे महापौर राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी नेमलेले असतात. त्यांची बांधिलकी शहरापेक्षा राजकीय पक्षाच्या नेतृत्वाशी असते. असे महापौर शहराच्या विकासाचा स्वतंत्रपणे विचार करू शकत नाहीत. मुंबईमध्ये अनेक परदेशी महानगरांचे महापौर भेट देतात तेव्हा शहरांच्या समस्यांच्या चर्चेमध्ये महापौर क्वचित हजर राहिले तरी स्वागताचे हारतुरे देऊन-घेऊन झाले की चर्चा आयुक्तांवर सोपवून निघून जातात. इतर देशांतील महानगरांचे महापौर शहरांच्या आणि लोकांच्या समस्यांना कसे सामोरे जातात, कसे निर्णय घेतात याचे साधे कुतूहल त्यांच्यापाशी दिसत नाही.

अधिकार नाहीत म्हणून जबाबदारी नाही आणि जबाबदारी नाही म्हणून सक्षम लोक निवडणुकीसाठी उभे राहत नाहीत. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी दुहेरी सत्ता संपवून अधिकार असणारे महापौर आपल्या शहरांना आणि महानगरांना आवश्यक आहेत. म्हणूनच प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारांची महापौरांनी केलेली मागणी राज्य शासनाने राजकीय धोका पत्करूनही मान्य करण्याचे धाडस जे मुख्यमंत्री दाखवतील तेच राज्याला प्रगतिपथावर नेऊ शकतील. महापौरपदासाठी निवडून येणे आवश्यक आहेच, परंतु त्या पदासाठी आवश्यक असे शैक्षणिक पात्रतेचे आणि किमान अनुभवाचे निकष ठरविता येतील. सुशिक्षित, अनुभवी, शहराच्या नियोजनाचा, भविष्याचा आणि लोकहिताचा स्वतंत्रपणे विचार करणारे आणि जबाबदारीने काम करणारे महापौर शहरे सुधारू शकतील. असा प्रयोग महाराष्ट्रात आधी झालेला आहे. काही शहरांना त्याचा फायदा तर काहींना तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे सुधारणा केल्यावर ताबडतोब सर्व शहरांना सक्षम महापौर मिळतील अशा भ्रमात राहता येणार नाही. सुरुवातीला काही महापौर चुकतील, अयशस्वी ठरतील; पण काही यशस्वीही होतील. यथावकाश कार्यक्षम आणि जबाबदार नगरसेवकांचे, महापौरांचे प्रमाण वाढेल. वाढत्या नागरीकरणाच्या ह्या काळात तसे झाले तरच शहरांचे प्रशासन आणि शहरांची दारुण परिस्थिती बदलू शकेल. शहरांना आणि देशाला प्रगतिपथावर आणण्यासाठी अशा सुधारणेची नितांत आवश्यकता आहे.

( लेखक नगर रचना तज्ज्ञ आहेत ) 

टॅग्स :MumbaiमुंबईMayorमहापौर