शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दृष्टिकोन - साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेता 'लेखक करतोय मोलमजुरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 1:53 AM

प्रतिभावान आणि गुणवंतांच्या वाट्याला आलेलं हे अस्वस्थ करणारं वर्तमान. त्यांचा जगण्याशी झगडा सुरू असताना मदतीचा हात देणारं कुणी येत नाही.

श्रीनिवास नागेदोन वर्षांपूर्वी ‘फेसाटी’ कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेला नवनाथ गोरे आज दुसऱ्याच्या रानात राबतोय. कधी कुणाची बाजरी काढायला जातोय, तर कधी कुणाच्या द्राक्ष-डाळिंबबागेत खुरपतोय. गेली साताठ महिने लेखणी मोडून हातात खुरपं आणि खोरं आलंय त्याच्या. कामाला गेलं तरच कसाबसा दोनवेळचा भाकरतुकडा मिळतोय.. मध्यंतरी ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे या सशक्त लेखकाची कुतरओढ सुरू होती. अखेर मरणानंच त्यांची सुटका केली. पुण्यातल्या झोपडपट्टीत एकाकी मरण आलं त्यांना. दिल्लीत राहणारा भारताचा आंतरराष्टÑीय धावपटू अली अन्सारी पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर फळं विकतोय, अशी दोन महिन्यांपूर्वीची बातमी. आशियाई स्पर्धेत भारताला पदक जिंकून देणाºया हरीशकुमारवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चहा विकण्याची वेळ आलीय.

प्रतिभावान आणि गुणवंतांच्या वाट्याला आलेलं हे अस्वस्थ करणारं वर्तमान. त्यांचा जगण्याशी झगडा सुरू असताना मदतीचा हात देणारं कुणी येत नाही. साहित्य-संस्कृतीपासून खेळापर्यंत आणि शिक्षणापासून शेतीपर्यंत कुठलंही क्षेत्र वर्ज्य नाही या अन्यायाला ! चोहीकडं प्रागतिक समाजभानाची वानवा. तरुण प्रतिभा नावारूपाला आल्यावर प्रसिद्धी, पैशाचा वर्षाव होतो. पण तो तात्पुरताच. जेव्हा त्यांचा उमेदीचा काळ असतो, तेव्हा गुणवत्ता सिद्ध करूनही त्यांना पुरेसं पाठबळ, सहकार्य आणि व्यवस्थात्मक पाठिंबा देण्यात आपण कमी पडतो.आता ‘फेसाटी’कार नवनाथ गोरेला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठात नोकरी देण्याच्या हालचाली सुरू केल्यात. नवनाथच्या जल्माची ‘फेसाटी’ होता होता कदाचित वाचेल, हे काहीसं आशादायी चित्र. अर्थात असा दातृत्वाचा हात विरळाच.नवनाथ हा साहित्य विश्वात कसदार लेखणीच्या आणि अस्सल अनुभवांच्या जोरावर उमेदीनं पुढं आलेला उण्यापुºया तिशीतला लेखक. स्वत:च्या जल्माची व्याधिकथा त्याने टोकदारपणे ‘फेसाटी’तून कागदावर उतरवली. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला; पण एम.ए., बी.एड. (फर्स्ट क्लास हं!) करूनही कायमची नोकरी नाही, कामधंदा नाही. पुढं काय, हा प्रश्न खायला उठतो. नगर जिल्ह्यातल्या महाविद्यालयावर तासिका तत्त्वावर शिकवण्यासाठी संधी मिळाली. दहा हजार मिळायचे. दीड वर्षं राबला. पण फेब्रुवारीत वडील गेले. नंतर कोरोनामुळं लॉकडाऊनचा दणका. नवनाथ गावाकडं म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या जत भागातच अडकला. महाविद्यालयावर आता तीस टक्केच मानधन मिळतंय समजल्यावर गेलाच नाही. घरात आई आणि अपंग भाऊ. सव्वाचार एकर कोरडवाहू रान. ते करत दुसºयाच्या रानात जायचं रोजंदारीला. ‘लेखनाचं काय?’ या प्रश्नावर म्हणतो, ‘साताठ महिने लेखनच काय, वाचनही केलेलं नाही. नुसती जगण्याचीच लढाई. मी कष्टाला मागं हटणारा नाही; पण वाचाय-लिहायची मन:स्थितीच नाही. दिवसभर रानात राबायचं... वेळ तर पाहिजे ना? आणि आधीच्या दोन कादंबऱ्यांचा कच्चा खर्डा तसाच पडलाय.’

- आता काहीजण म्हणतील, ही काय फक्त नवनाथची व्यथा आहे का? त्याच्याहून अधिक शिक्षण असलेले कितीक गुणवंत पडलेत की तसेच उपेक्षित नोकरीविना! हे तर खरंच! - पण जगण्याच्या एखाद्या विशिष्ट प्रांतात अधिक चमक दाखवणाºयांना सगळ्यांच्याच तागडीत तोलायला जाणार का आपण? आणि मग लेखनापासून मैदानापर्यंत आणि नवनिर्मितीपासून संशोधनापर्यंतच्या सगळ्या क्षेत्रात नवी प्रतिभाच समोर येत नाही म्हणून ओरडा करायला मोकळेच! यातला विरोधाभास आपल्या समाजाच्या आणि मुख्य म्हणजे शासकीय यंत्रणेच्या, व्यवस्थेच्या लक्षात येईल, तेव्हाच गुणवंतांना वाव देण्यासाठी प्राधान्याने संधी निर्माण करावी लागते याचं भान रुजेल. उमेदीच्या वयातल्या गुणवत्तेला व्यवस्थेने हात दिला, तर त्यातून फुलणारं त्या व्यक्तीचं आयुष्य पुढे अनेक अर्थांनी समाजाच्या कारणी लागू शकतं. समाजाच्या एकूण जगण्याची प्रत उंचावतं ! नवनाथ, अली अन्सारी, हरीशकुमार हे केवळ निमित्त. कोणताही आधार नसलेल्या अशा गुणवंतांचा जगण्याचा संघर्ष एकेकट्याचा बनतो; पण समाज मात्र त्यांच्याकडून आणखी गुणात्मक, सांघिक यशाची अपेक्षा करत असतो. त्यांच्यातील प्रतिभा जोपासण्याची कोणतीही व्यवस्था निर्माण न करता ! या आणि अशा तरुण गुणवंतांना किमान आर्थिक स्थैर्य मिळालं तरच त्यांच्याकडून आश्वासक कामगिरी होईल ना? पैशांशिवाय मानसन्मान काय कामाचा? उमेदीच्या वयातली जगण्याची लढाई फार मोठी असते. 

टॅग्स :Farmerशेतकरीsahitya akademiसाहित्य अकादमी