शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

धार्मिक ध्रुवीकरणाचे चटके; समाजातील एकाेपा संकुचित करण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 09:34 IST

उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात काही मुस्लीम मुलींना हिजाब घालून आल्याने प्रवेश नाकारण्यात आला. याला अनेक मुस्लीम मुलींनी विराेध केला आणि हिजाब वापरण्याचे आमचे स्वातंत्र्य असल्याचे सांगितले.

भारत देश लिखित राज्यघटनेवर चालताे. भारतीय लाेकशाही ही जगातील सर्वात माेठी मानली जाते. कायद्यापुढे सर्व समान आणि सर्व समाज घटकांना समान अधिकार हक्क आणि स्वातंत्र्य ही मूल्येही लागू आहेत. मात्र, अलीकडील काळात काेणत्या प्रश्नांवरून धार्मिक ध्रुवीकरण करता येईल, याची जणू वाटच पाहणाऱ्या काही शक्ती निर्माण झाल्या आहेत. लता मंगेशकर यांना आदरांजली वाहताना ख्यातनाम अभिनेता शाहरुख खान यांनी त्यांच्या धार्मिक चालीरितीप्रमाणे आदर व्यक्त केला. त्यावरूनही वाद निर्माण करण्यात आला. 

आता कर्नाटकात गेल्या आठवड्यापासून पेटविण्यात आलेल्या वादाचे कारणही समाजात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रकार आहे. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात काही मुस्लीम मुलींना हिजाब घालून आल्याने प्रवेश नाकारण्यात आला. याला अनेक मुस्लीम मुलींनी विराेध केला आणि हिजाब वापरण्याचे आमचे स्वातंत्र्य असल्याचे सांगितले. याचे निमित्त झाले आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शाळा-महाविद्यालयात अधिकृत गणवेशाचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करीत हिजाबला उत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी भगवे शाल, फेटे वापरून विराेध केला. 

हिजाब वापरणाऱ्या मुलींच्या समाेर जाेरदार निदर्शनेही करण्यात आली. कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील कुंदापूरमधील या घटनेचे पडसाद कर्नाटकाच्या सर्वच जिल्ह्यात  उमटले. शिमाेगा येथील महाविद्यालयातील तिरंगा ध्वज अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी उतरवून त्याजागी भगवा ध्वज फडकविला, असे वातावरण बदलत जात असताना, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, हिजाब वापरण्याचा आपला अधिकार आहे, असे प्रतिपादन करीत कर्नाटक उच्च न्यायालयात काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या आहेत. 

यावरील सुनावणी चालू आहे. राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्यांनी शांतता पाळावी, असे आवाहन केले आहे. वास्तविक, विविध प्रांतात आणि धार्मिक घटकात परंपरेने आलेल्या वेशभूषा परिधान केल्या जातात. शृंगार केले जातात. उत्तर भारतातील काही प्रांतात हिंदू समाजातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना, पडदा किंवा गोषा पद्धतीचा अवलंब करण्याची सक्तीच असते. ती पद्धत एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मानून स्वीकारली जाते. 

पंजाबमधील शीख समुदायाला पगडी ही धार्मिक परंपरेने परिधान करण्याची मुभा आहे. पाेलीस दलात किंवा लष्करातील शीख पुरुषांनाही पगडी वापरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ताे एक धार्मिक स्वातंत्र्याचा भाग मानला जातो. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर विविध प्रकारचे गणवेश शैक्षणिक संस्थामध्ये परिधान करण्याची पद्धत आहे. कारण समाजातील विविध घटकातील आणि आर्थिक स्तरातील मुला-मुलींमध्ये समानतेचे तत्त्व बिंबविण्याचा त्यामागे हेतू असताे. त्याच वेळी परंपरेने आलेले बिंदी, कुंकू, टिकली, इबत्ती, नाम, गंध आधी लावण्याचे स्वातंत्रही आहे. तशीच हिजाबची परंपरा आहे. त्याविषयी काेणाची तक्रार असण्याचे कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काशी किंवा हैदराबाद येथील अलीकडच्या कार्यक्रमात साधुसंतासारखा वेश परिधान केला हाेता. अनेक तास ते पूजाअर्चनेमध्ये  सामील झाले हाेते. 

राज्यघटनेने निर्माण करण्यात आलेल्या पदावरील व्यक्तीने अशा प्रकारे एखाद्या कार्यक्रमाचे निमित्त म्हणून धार्मिक पेहराव  परिधान करावा का, असा प्रश्न उपस्थित करता येऊ शकताे. मात्र, आपल्या राज्यघटनेने धार्मिक स्वातंत्र्यानुसार ज्या परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्या सांस्कृतिक मानून अनुमती दिली जाते. अनेक शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रमही हाेतात. त्यात सर्व जाती-धर्माची मुले-मुली सहभागी हाेतात. असे हे थाेडे मुक्त वातावरण असणाऱ्या आणि विविध धर्माचे लाेक एकत्र राहत असताना, एकमेकांना समजून घेतले पाहिजे. मुलींनी जीन्स वापरू नये किंवा पबमध्ये जाऊ नये, असा फतवा काढत कर्नाटकातील मंगलाेर शहरात उन्माद माजविला गेला हाेता. ही दादागिरी अनेकांना आवडली नव्हती. त्याचा फटका राजकारणात भाजपला बसला हाेता. हा ताजा इतिहास आहे.  धार्मिक ध्रुवीकरण करून समाजातील एकाेपा संकुचित करण्याचा प्रयत्न चांगला नाही. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा पाळत असताना, त्याची सक्ती काेणावर करणे याेग्य हाेणार नाही. त्यातून समाजाचे नुकसान हाेईल. कर्नाटकसारख्या प्रागतिक राज्यात अशा प्रकारचे ध्रुवीकरण व्हावे, ही फार माेठी धाेक्याची घंटा आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकHinduहिंदूMuslimमुस्लीम