शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 3:37 AM

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला.

- मा.गो. वैद्य, ( माजी प्रवक्ते, रा.स्व. संघ)अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला. अगदी खासदार असतानादेखील स्वत:चे कपडे ते धुवत असत. जिव्हेवर सरस्वती अन् मनात भारतमाता घेऊन जगणारे अटलजी अलौकिकच होते. नागपुरात अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ तृतीय शिक्षा वर्गात प्रशिक्षण घेतले होते.या शिक्षा वर्गात अटलजींची वक्तृत्वावरील पकड, कवितेची जाण आणि लाघवी व्यक्तिमत्त्व अनुभवयाची पहिल्यांदा संधी मिळाली. अनेक स्वयंसेवक त्यांच्यापासून प्रभावित झाले होते.अटलबिहारी वाजपेयी १९६१ ते १९६६ या कालावधीत जनसंघाच्या कामाने अनेकदा नागपूरला आले. एरवी ते महानगर अध्यक्ष सुंदरलाल रॉय यांच्या घरी थांबत. मात्र रॉय शहरात नसल्यामुळे अटलबिहारी वाजपेयी एकदा माझ्या निवासस्थानी थांबले. त्यावेळी खासदार असूनदेखील त्यांनी खाली बसूनच जेवण करणे पसंत केले व कपडेदेखील स्वत: धुतले.विनोदी ‘काले’ कविता१९४५ च्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी मल्हारराव काळे हे होते. अटलजी हिंदी भाषेत त्यांना ‘काले’ असे म्हणत. शिक्षा वर्गात सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत अटलजींनी ‘रेशमबाग की मिट्टी काली, नाग नदी का पानी काला और...हमारे सर्वाधिकारी भी काले’ अशी कविता म्हणून सर्वांनाच पोट धरुन हसायला भाग पाडले होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी