शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राजधर्म शिकवणारा नेता...अटलबिहारी वाजपेयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 19:59 IST

सरकारे येतील, जातील, हा देश राहणार आहे, असं अटलजी म्हणायचे

- धर्मराज हल्लाळे

आज राजकारण विचार प्रवाहांच्या पलीकडे गेले आहे. डावी, उजवी अशी कोणतीही बाजू अन् बूज नसलेले सभोवतालचे राजकीय वर्तन मन विषन्न करणारे आहे. मध्यम मार्गाने जाणाऱ्यांनाही लक्ष्य केले जाते. ठोकशाही, झुंडशाहीचा अनेकदा जयजयकार पाहून लोकशाही स्तब्ध होताना दिसते. अशावेळी आपल्या विचारांवर, भूमिकेवर ठाम राहून विरोधी विचारांचाही सन्मान करणारे अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तुंग जीवनकार्य देशाला सदोदित दिशा देईल. किंबहुना राजमार्गांवरून भरकटणाऱ्यांना राजधर्माची शिकवण देत राहील.

अटलजींनी दीर्घ काळ विरोधी पक्षात राहून सत्ताधाऱ्यांवर प्रखर टीका केली. मात्र त्यांच्या वाणी अन् विद्ववतेचा पंडित जवाहरलाल नेहरूंपासून पी.व्ही. नरसिंहरावांपर्यंत सर्वांनीच आदर केला. अटलजींची लोकशाही मूल्यांवर अढळ श्रद्धा होती. आयाराम-गयाराम राजकारणावर त्यांनी कायम आसूड ओढले.

अटलजींच्या महाराष्ट्रात अनेक सभा गाजल्या. लोकसभेचे  तत्कालीन सभापती, काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर लातूर येथून लोकसभा निवडणुकीला उभे होते. अटलजी काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणावर सडकून टीका केली. मात्र चाकूरकर यांच्याविषयी बोलताना अटलजी म्हणाले...चाकूरकर अच्छे इन्सान है...स्वाभाविकच विरोधी पक्षातील उमेदवाराची केलेली स्तुतीच बातमी बनली. 

मतभेद जरी असले तरी या देशातील राजकीय पक्षांच्या नेत्यांत मनभेद नसावा. एकमेकांच्या विचार, धोरणांचे विरोधक असू शत्रू नव्हे, हेच ठासून सांगणारा नेता अटलजींच्या रूपाने देशाने पाहिला.

गुजरातच्या दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलजींनी विद्यमान पंतप्रधानांना त्यावेळी सांगितलेला राजधर्म हा आज इतिहास असला तरी त्यातून सर्वांनीच कायम बोध घेतला पाहिजे. 

अटलजी सांगत त्याप्रमाणे सरकारे येतील, जातील, हा देश राहणार आहे.

विकास, प्रगतीच्या चर्चेत भारतीय समाजाच्या एकसंघतेला धक्के देणारे राजकीय वर्तन जेव्हा जेव्हा घडेल त्यावेळी अटलजींचे बोल लक्षात आणून दिले पाहिजेत. जात,धर्म,भाषेच्या आधारावर भेद नको, अन्  त्याची जाण ठेवून समाजाला भानावर आणणारा अटलजींसारखा नेता हवा. ज्यांच्या वक्तृत्वाची आणि कर्तृत्वाची दखल पंडीत नेहरुंनी घेतली, हा दाखला देत असताना त्यांनी दाखवलेल्या राजमार्गावरून जाणे पुढच्या राजकीय पिढयांचे  कर्तव्य ठरते

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधानAIIMS hospitalएम्स रुग्णालयDeathमृत्यू