शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

राजधर्म शिकवणारा नेता...अटलबिहारी वाजपेयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 19:59 IST

सरकारे येतील, जातील, हा देश राहणार आहे, असं अटलजी म्हणायचे

- धर्मराज हल्लाळे

आज राजकारण विचार प्रवाहांच्या पलीकडे गेले आहे. डावी, उजवी अशी कोणतीही बाजू अन् बूज नसलेले सभोवतालचे राजकीय वर्तन मन विषन्न करणारे आहे. मध्यम मार्गाने जाणाऱ्यांनाही लक्ष्य केले जाते. ठोकशाही, झुंडशाहीचा अनेकदा जयजयकार पाहून लोकशाही स्तब्ध होताना दिसते. अशावेळी आपल्या विचारांवर, भूमिकेवर ठाम राहून विरोधी विचारांचाही सन्मान करणारे अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तुंग जीवनकार्य देशाला सदोदित दिशा देईल. किंबहुना राजमार्गांवरून भरकटणाऱ्यांना राजधर्माची शिकवण देत राहील.

अटलजींनी दीर्घ काळ विरोधी पक्षात राहून सत्ताधाऱ्यांवर प्रखर टीका केली. मात्र त्यांच्या वाणी अन् विद्ववतेचा पंडित जवाहरलाल नेहरूंपासून पी.व्ही. नरसिंहरावांपर्यंत सर्वांनीच आदर केला. अटलजींची लोकशाही मूल्यांवर अढळ श्रद्धा होती. आयाराम-गयाराम राजकारणावर त्यांनी कायम आसूड ओढले.

अटलजींच्या महाराष्ट्रात अनेक सभा गाजल्या. लोकसभेचे  तत्कालीन सभापती, काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर लातूर येथून लोकसभा निवडणुकीला उभे होते. अटलजी काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणावर सडकून टीका केली. मात्र चाकूरकर यांच्याविषयी बोलताना अटलजी म्हणाले...चाकूरकर अच्छे इन्सान है...स्वाभाविकच विरोधी पक्षातील उमेदवाराची केलेली स्तुतीच बातमी बनली. 

मतभेद जरी असले तरी या देशातील राजकीय पक्षांच्या नेत्यांत मनभेद नसावा. एकमेकांच्या विचार, धोरणांचे विरोधक असू शत्रू नव्हे, हेच ठासून सांगणारा नेता अटलजींच्या रूपाने देशाने पाहिला.

गुजरातच्या दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलजींनी विद्यमान पंतप्रधानांना त्यावेळी सांगितलेला राजधर्म हा आज इतिहास असला तरी त्यातून सर्वांनीच कायम बोध घेतला पाहिजे. 

अटलजी सांगत त्याप्रमाणे सरकारे येतील, जातील, हा देश राहणार आहे.

विकास, प्रगतीच्या चर्चेत भारतीय समाजाच्या एकसंघतेला धक्के देणारे राजकीय वर्तन जेव्हा जेव्हा घडेल त्यावेळी अटलजींचे बोल लक्षात आणून दिले पाहिजेत. जात,धर्म,भाषेच्या आधारावर भेद नको, अन्  त्याची जाण ठेवून समाजाला भानावर आणणारा अटलजींसारखा नेता हवा. ज्यांच्या वक्तृत्वाची आणि कर्तृत्वाची दखल पंडीत नेहरुंनी घेतली, हा दाखला देत असताना त्यांनी दाखवलेल्या राजमार्गावरून जाणे पुढच्या राजकीय पिढयांचे  कर्तव्य ठरते

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधानAIIMS hospitalएम्स रुग्णालयDeathमृत्यू