शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 08:25 IST

दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण प्राचीन मार्ग अनुसरला पाहिजे, की आधुनिक विज्ञानाच्या मार्गाने जावे?- खरे तर त्यासाठी दोन्ही आवश्यक आहेत.

- डॉ. एस. एस. मंठा (माजी अध्यक्ष भारतीय तंत्रशिक्षण परिषद)आरोग्यम् परमं भाग्यम स्वास्थ्यस्य जीवनम् सुखं’... असे चरकाने सांगितले आहे. त्याचा अर्थ, चांगले आरोग्य हाच मोठा आशीर्वाद आहे आणि निरोगी माणसाचेच आयुष्य आनंददायी होते. हे ज्याला समजले, त्याने आपले आयुष्य दु:खात घालवू नये. परंतु दु:ख टाळायचे कसे? 

आधुनिक वैद्यक आणि विज्ञान आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि सामाजिक नातेसंबंध यावर भर देते. जेथे माणसे सहजरीत्या शंभरी पार करतात अशा प्रदेशांना ‘ब्ल्यू झोन’ म्हणतात, त्याविषयी संशोधकांचे काय म्हणणे आहे? 

सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे वनस्पतिजन्य आहार, म्हणजेच भाज्या, धान्ये, हितकारक चरबी यांचे सेवन आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळणे. उष्मांक कमी केले आणि अधूनमधून उपवास केला तर अधिक चांगले. दुसरे म्हणजे चालणे, योगासने, बल वाढवणारे व्यायाम.  

तिसरे म्हणजे सततचा ताणतणाव टाळणे, चांगली झोप घेणे आणि सतत अध्ययनशील राहणे. मनातील विचारांवर लक्ष केंद्रित करण्याला, ध्यानधारणेला मनोविज्ञानाने प्राधान्य दिले आहे. अंतिमत: जपानीत ज्याला ‘इकीगाई’ म्हटले जाते ते. म्हणजे आपण एखादी गोष्ट कशासाठी करतो आहोत याचे पक्के भान. तेही महत्त्वाचे. नैराश्य येऊ नये म्हणून सामाजिक नातेसंबंध सांभाळणे गरजेचे ठरते.

आधुनिक विज्ञान हे सांगत असताना हिंदू तत्त्वज्ञानात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. दीर्घायुष्य म्हणजे केवळ शारीरिक अर्थाने जिवंत राहणे नसून, धर्म पालनाला त्यात महत्त्व आहे. पुरुषार्थ ही कालातीत संकल्पना असून, व्यक्ती म्हणून ती अर्थपूर्ण, समतोल जगण्यासाठी प्रेरणा देते. 

अहिंसा आणि सात्त्विक अन्न, योग, प्राणायाम, ध्यान आणि अलिप्तता त्याचप्रमाणे सेवा आणि भक्ती ही प्रमुख तत्त्वे होत. अहिंसा आणि सात्त्विक आहारामुळे स्पष्टता येते, दीर्घायुष्य मिळते.  योग आणि प्राणायाम यामुळे शरीर बलवान होते. 

नाडीशुद्धी होऊन ऊर्जा संचरण वाढते. त्यातून शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगतीला साहाय्य होते. ध्यान आणि अलिप्तता यातून मनाला शांती मिळते, ताण कमी होतो. अंतरात्म्याशी नाते जोडले जाते. भौतिकतेपासून स्वतःला दूर ठेवले तर मानसिक शांतता, समाधान मिळते.  सेवा आणि भक्ती किंवा निष्काम कर्म आणि भक्ती यातून वृद्धत्वात गरजेचा असलेला सहानुभाव वृद्धिंगत होऊन आनंद मिळतो.  

धर्म म्हणजे सदाचरण, कर्तव्य, नीतिमूल्ये आणि नैतिक आचरण. अर्थ म्हणजे ऐहिक समृद्धी, यश, प्रगती. त्यातून आर्थिक सुरक्षितता मिळते, भौतिक गरजा पूर्ण होतात. जीवनातील विविध भूमिका पार पाडताना बंधने पडतात. 

कर्तव्य पार पाडताना धर्माने सांगितलेली नैतिक तत्त्वे उपयोगी पडतात. अर्थ नैतिक मार्गांनी संपत्ती मिळवा असे सांगतो. काम म्हणजे आपल्या इच्छा, इंद्रियजन्य सुखे. यात भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारची सुखे येतात. मोक्ष म्हणजे मुक्ती,आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि जीवनाचे अंतिम ध्येय.  

जगातील सर्व सुखांचा त्याग आणि संसारातून मुक्ती. आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ समजून घेऊन आत्मजागृती होणे म्हणजे मोक्ष.

दीर्घ आयुष्य म्हणजे केवळ एक जैविक प्रक्रिया नसून भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे. आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक मूल्ये  सांभाळून अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक अशी चौकट पुरुषार्थ आपल्याला देतो.  

सर्वच आश्रमात धर्माचे स्थान आहे. ब्रह्मचर्य आश्रमात अध्ययन ज्ञान आणि शहाणपण मिळते. अर्थ आणि काम या गृहस्थाश्रमाच्या किल्ल्या असून, वानप्रस्थ आणि संन्यास  मोक्षाकडे नेतात.

दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी मग आपण प्राचीन मार्ग अनुसरला पाहिजे की आधुनिक विज्ञानाच्या मार्गाने जावे?- खरे तर त्यासाठी दोन्ही आवश्यक आहेत. प्राचीन संस्कृतीने आपल्याला मौलिक ज्ञान आणि शहाणपण दिले, तर आधुनिक जीवन हे तंत्रज्ञानावर उभे राहिले. 

नव्या तंत्रज्ञानाच्या अंगीकाराने आरोग्याची काळजी, वाहतूक आणि संवाद सुकर झाला. कालसंगत अशी कौशल्ये, शिक्षण आणि आधुनिक संधींचा अंगीकार करून आपण वर्तमानाशी जुळते   घेतले पाहिजे. प्राचीन संस्कृतीने पुरस्कारलेल्या मूल्यापासून बोध घेतला तर त्यातून आपली व्यक्तिगत वाढ आणि कल्याणच होईल.

मात्र, पारंपरिक ज्ञान वर्तमान संदर्भामध्ये जोडून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यातून आधुनिक समाजाचे फायदे मिळतील, त्याचबरोबर भूतकाळाने घालून दिलेल्या आदर्शांना धक्का लागणार नाही, त्यांचाही आदर होईल.

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स