शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

चाप बसवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:52 PM

काही इस्पितळांकडून सुरू असलेल्या लुबाडणुकीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून यावर चाप बसविण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्याचा विचार शासन करीत असून हे पाऊल स्वागतार्ह आहे.

काही इस्पितळांकडून सुरू असलेल्या लुबाडणुकीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून यावर चाप बसविण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्याचा विचार शासन करीत असून हे पाऊल स्वागतार्ह आहे. तसे बघता हा कायदा यापूर्वीच लागू व्हायला हवा होता. परंतु उशिरा का होईना शासनाला ही बुद्धी सुचली ते फार चांगले झाले. अर्थात हा कायदा लागू करणे तेवढ सोपे नाही, कारण इंडियन मेडिकल असोसिएशन आणि खासगी डॉक्टरांचा त्याला तीव्र विरोध आहे. नागपुरात सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. सभागृहात हा मुद्दा चर्चेला आला होता. अनेक स्वयंसेवी संस्था रक्त विकत असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले तेव्हा अशा संस्थांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले. अलीकडच्या काळात आरोग्यसेवेचे फार मोठ्या प्रमाणात व्यावसायीकरण झाले असून काही इस्पितळे व्यवसायाच्या नावावर रुग्णांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत असल्याच्याही तक्रारी प्राप्त होत आहेत. शासनाच्या विविध आरोग्य योजनांनाही भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. गेल्या पंधरवड्यातच नागपुरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे एक प्रकरण उघडकीस आले होते. गरीब रुग्णांकरिता शासनातर्फे जीवनदायी आरोग्य योजना राबविली जाते. याअंतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी सुपरस्पेशालिटीमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये पळविण्याचा गोरखधंदा सुरू आहे. रुग्णांना योजनेच्या यादीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले जाते. योजनेचा पैसा घेतला जातो शिवाय वेगवेगळ्या कारणावरुन रुग्णांची १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत फसवणूक केली जाते, अशी तक्रार आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्येही अशीच परिस्थिती आहे. गोरगरीब रुग्णांना कमी खर्चात आधुनिक औषधोपचार उपलब्ध व्हावेत म्हणून धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी २० टक्के खाटा राखून ठेवणे बंधनकारक केले आहे. असे असतानाही तेथे गरिबांना उपचार नाकारण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. मुळात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात पूर्वीसारखी विश्वासार्हता आता राहिली नाही. डॉक्टरांच्या नावाने लोक घाबरून जातात. खरे तर रुग्णालये ही माणसांना जगण्याचे बळ देणारी असली पाहिजेत. परंतु व्यावसायीकरणाच्या या युगात रुग्णालयांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांवर चाप बसविण्यासोबतच डॉक्टर-रुग्ण संबंध कसे सुधारतील याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर