शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

दृष्टिकोन - औद्योगिक वीज दरवाढीने महाराष्ट्र होरपळतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 06:38 IST

त्यासाठी सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या १९ महिन्यांच्या दर फरकापोटी ३४०० कोटी रुपये अनुदान राज्य सरकारने महावितरण कंपनीस द्यावे,

प्रताप होगाडे    सप्टेंबर २०१८ पासून राज्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांच्या बिलामध्ये २० टक्के ते २५ टक्के वाढ झाली. राज्यातील वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेने २५ टक्के ते ४० टक्के जास्त झाले आहेत. परिणामी जागतिक स्पर्धेत टिकाव धरता येत नाही. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रचंड आर्थिक संकट आणि असंतोष निर्माण झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक वीज दरवाढीने होरपळत आहे. ही औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्याची गरज आहे.

त्यासाठी सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या १९ महिन्यांच्या दर फरकापोटी ३४०० कोटी रुपये अनुदान राज्य सरकारने महावितरण कंपनीस द्यावे, अशी आमची मागणी आहे. याकरिता राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांतर्फे नुकतेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे व वीजबिलांची होळी करण्याचे आंदोलन पुकारले. सर्व औद्योगिक संघटनांच्या उत्स्फूर्त सहभागाने राज्यात २० ठिकाणी मोर्चे व वीजबिलांची होळी झाली. कोल्हापूर, सांगली, पिंपरी-चिंचवड, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, चिपळूण, वसई, पालघर, तारापूर, ठाणे, औरंगाबाद, परभणी, अकोला, यवतमाळ, नांदुरा, सिंदखेडराजा, जळगाव जामोद येथे हे आंदोलन झाले. सातारा व सोलापूर येथेही असेच आंदोलन झाले.

या वस्तुस्थितीची व औद्योगिक क्षेत्रातील संकटाची नोंद घेऊन राज्यातील सर्व आमदारांनी विधानसभेत या संदर्भात आवाज उठवावा, हा प्रश्न धसास लावावा, असे आमचे म्हणणे आहे. राज्यातील सर्व आमदारांना वैयक्तिक आवाहनपत्र, निवेदन, संबंधित माहिती महाराष्ट्र चेंबर व समन्वय समितीतर्फे २४ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्यात येणार आहे. अशीच परिस्थिती सप्टेंबर २०१३ मध्ये निर्माण झाली होती. त्या वेळी आताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे हे नाशिक येथे १७ आॅक्टोबर २०१३ रोजी वीजदरवाढीच्या विरोधात वीजबिलांची होळी आंदोलनात सहभागी झाले होते. त्या वेळी फडणवीस यानी भाजपाची सत्ता आल्यानंतर वीजगळती रोखून आणि वीज खरेदी खर्च कमी करून वीजदर कमी केले जातील, असे जाहीर आश्वासन दिले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये तत्कालीन सरकारने राणे समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार जानेवारी २०१४ पासून १० महिने दरमहा ६०० कोटी रुपये अनुदान दिले गेले होते. त्याचप्रमाणे आताच्या सरकारने यापूर्वी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. त्यासाठी सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० या १९ महिन्यांसाठी ३४०० कोटी रुपये अनुदान महावितरणला द्यावे आणि दर स्थिर ठेवावेत, असे सर्व औद्योगिक संघटनांचे म्हणणे आहे. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, यासाठी आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न धसास लावण्याचे आवाहन समन्वय समिती व महाराष्ट्र चेंबरने केले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अधिवेशन काळात सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा वीज दरवाढ पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. अधिवेशन संपेपर्यंत निर्णय न झाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल.( लेखक वीजतज्ज्ञ आहेत )

टॅग्स :electricityवीजMIDCएमआयडीसी