शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

मुंबई शहरातील अजून एक माफिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 16:18 IST

मुंबईला त्रास देणारे आजवर अनेक माफिया झाले़ त्यांनी या मायानगरीला पोखरून काढले. भूमाफिया, तेल माफिया, डिझेल माफिया, वाळू माफिया, ही यादी मोठी आहे. या यादीत अजून एका माफियाचा समावेश झाला आहे. 

- विनायक पात्रुडकरमुंबईला त्रास देणारे आजवर अनेक माफिया झाले़ त्यांनी या मायानगरीला पोखरून काढले. भूमाफिया, तेल माफिया, डिझेल माफिया, वाळू माफिया, ही यादी मोठी आहे. या यादीत अजून एका माफियाचा समावेश झाला आहे. तो म्हणजे बांधकाम माफिया. स्वातंत्र्यानंतर रोजगाराच्या शोधात मुंबईत येणा-यांना राहण्यासाठी जागा देणारा म्हणून हा माफिया जन्माला आला. गेल्या सहा दशकात या माफियाने मुंबईला विदु्रप करून टाकले. जागा मिळेल तेथे अनधिकृत बांधकाम, झोपडपट्टी, चाळी, अशी अनेक अवैध बांधकामे या माफियाने उभी केली़ भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते यांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले. आता हे माफिया डोईजड झाल आहेत.  त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्याची दखल घेत अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अवैध बांधकामे नियमित करू नका, असेही न्यायालाने बजावले. मात्र निगरगट भ्रष्ट अधिकारी व राजकीय नेत्यांना ते मान्य होणारे नाही. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण सरकारने आणले. ते न्यायालयाने फेटाळून लावले. त्यानंतर पुन्हा सरकारने नवीन धोरण आणले. तेही न्यायालयाने फेटाळले व अवैध बांधकामे नियमित करू नका, असे सरकारला सांगितले. सरकार काही ऐकले नाही, त्यांनी पुन्हा नवे धोरण तयार केले. हे धोरण सध्या न्यायालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याप्रकरणांच्या याचिकांवर सुनावणीत न्यायालय प्रत्येकवेळी सरकारला फटकारते. नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा एकदा सरकारचे कान टोचले.  शाळेचे बांधकामच अवैध असेल तर तेथे विद्यार्थी काय धडे घेणार, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले. आपल्याकडे मंदीर, मशीदचे बांधकामही अनधिकृतपणे केलेले असते. अशा बांधकामात देव राहतोच कसा?, मला देव भेटला तर त्याला मी हा प्रश्न नक्की विचारेन, असेही न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाला असे म्हणण्याची वेळ आज आली. न्यायालयाच्या टिप्पणीनंतर तरी भ्रष्ट अधिकारी व राजकीय नेत्यांनी थोडे सुधारायला हवे. अनधिकृत बांधकामे रोखणे अशक्य नाही. अनधिकृत बांधकाम नियमित न करण्याची भूमिकाही प्रशासन घेऊ शकते़ कॅम्पा कोलाचे प्रकरण यासाठी उत्तम उदाहरण ठरेल. कॅम्पा कोलाचे रहिवाशी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. त्यावरील सुनावणीत केंद्र व राज्यातील सरकार बदलले तरी या इमारतींचे बांधकात अद्याप नियमित झालेले नाही. नवी मुंबईतील दिघा परिसरातील बांधकाम नियमित करण्यास तेथील प्रशासन तयार नाही. येथील रहिवाश्यांची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.  या दोन ठिकाणचे बांधकाम नियमित  करण्यास प्रशासन तयार नसेल तर संपूर्ण राज्यातील अनधिकृत बांधकामालाही विरोध केला जाऊ शकतो. प्रत्येक स्थानिक प्रशासनाने अशी कठोर भूमिका घ्यायला हवी. तरच या बांधकाम माफियांना आळा बसेल, अन्यथा अनधिकृत बांधकामे वाढतच राहितील. त्यांची चढ्या भावाने विक्री होईल व कालांतराने ती नियमतही होतील. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र